शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेती भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 22:36 IST

Nagpur News शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले.

ठळक मुद्देसुधीर भोंगळे यांना ‘डॉ. सी.डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार’ प्रदान

नागपूर : शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा विदर्भात होणार असल्याचे सांगत या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.

कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे पत्रकार व लेखक डॉ. सुधीर भोंगळे यांना शुक्रवारी पवार यांच्या हस्ते ‘डॉ. सी.डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार’ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, रमेश बंग, माजी खा. विकास महात्मे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम काळे यांनी कार्याचा आढावा सादर केला. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले. नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

जलसंधारण व ऊर्जेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे मोठे योगदान : योगेश

- कृषीच्या क्षेत्रात भारत आज स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर दिसून येतो. यात देशातील सर्वसामान्य शेतकरी व वैज्ञानिकांसोबतच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. बाबासाहेबांनी जलसंधारण व ऊर्जेच्या क्षेत्रात केलेल्या कामामुळेच हे शक्य होऊ शकले, असे पवार यांनी सांगितले.

नदी जोड प्रकल्पांवर काम होण्याची गरज -गडकरी

नितीन गडकरी म्हणाले, देशात तांदूळ, गहू, मका अतिरक्त आहे. त्यामुळे त्यावर कितीही भर दिला तरी फायदा नाही. त्यामुळे पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. पाण्याचा प्रश्न हा संपूर्ण देशाचा नाही, तर अर्ध्या भागाचा आहे. ही समस्या नदी जोड प्रकल्पाने दूर होऊ शकते. गंगा ते कावेरी ८६ प्रकल्प आहेत. हे काम कठीण आहे; परंतु अशक्य नाही.

भाताच्या शेतीतून बाहेर पडा -सुधीर भोंगळे

आपल्या सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉ. सुधीर भोंगळे यांनी शेतकऱ्यांना भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पीक पद्धती बदलण्याची गरज असून, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीagricultureशेती