शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

विदर्भातील शेती भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 22:36 IST

Nagpur News शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले.

ठळक मुद्देसुधीर भोंगळे यांना ‘डॉ. सी.डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार’ प्रदान

नागपूर : शेतकऱ्यांनी आता परंपरागत पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असे सांगत विदर्भातील शेतीचा प्रवास आता भाताकडून उसाकडे नेण्याचे संकेत, मान्यवरांच्या भाषणातून मिळाले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा विदर्भात होणार असल्याचे सांगत या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.

कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे पत्रकार व लेखक डॉ. सुधीर भोंगळे यांना शुक्रवारी पवार यांच्या हस्ते ‘डॉ. सी.डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार’ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, रमेश बंग, माजी खा. विकास महात्मे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम काळे यांनी कार्याचा आढावा सादर केला. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले. नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

जलसंधारण व ऊर्जेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे मोठे योगदान : योगेश

- कृषीच्या क्षेत्रात भारत आज स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर दिसून येतो. यात देशातील सर्वसामान्य शेतकरी व वैज्ञानिकांसोबतच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. बाबासाहेबांनी जलसंधारण व ऊर्जेच्या क्षेत्रात केलेल्या कामामुळेच हे शक्य होऊ शकले, असे पवार यांनी सांगितले.

नदी जोड प्रकल्पांवर काम होण्याची गरज -गडकरी

नितीन गडकरी म्हणाले, देशात तांदूळ, गहू, मका अतिरक्त आहे. त्यामुळे त्यावर कितीही भर दिला तरी फायदा नाही. त्यामुळे पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. पाण्याचा प्रश्न हा संपूर्ण देशाचा नाही, तर अर्ध्या भागाचा आहे. ही समस्या नदी जोड प्रकल्पाने दूर होऊ शकते. गंगा ते कावेरी ८६ प्रकल्प आहेत. हे काम कठीण आहे; परंतु अशक्य नाही.

भाताच्या शेतीतून बाहेर पडा -सुधीर भोंगळे

आपल्या सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉ. सुधीर भोंगळे यांनी शेतकऱ्यांना भाताच्या शेतीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पीक पद्धती बदलण्याची गरज असून, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीagricultureशेती