शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

भारताचा अंतराळ कार्यक्रम समाज विकासासाठी

By admin | Updated: May 14, 2016 03:02 IST

जगभरातील प्रगत देश अंतराळाचा कार्यक्रम हा आपापल्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि मिलिटरीच्या सक्षमतेसह विविध कामासाठी करतात.

राष्ट्रीय तंत्रज्ञानदिन : एसव्हीसी कामेश्वर राव यांचे प्रतिपादननागपूर : जगभरातील प्रगत देश अंतराळाचा कार्यक्रम हा आपापल्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि मिलिटरीच्या सक्षमतेसह विविध कामासाठी करतात. परंतु भारतातील अंतराळ कार्यक्रम हा जगापेक्षा वेगळा आहे. भारतातील इस्रोमार्फत राबविण्यात येत असलेला अंतराळ कार्यक्रम हा पूर्णपणे समाज विकासाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र मध्यचे (इस्रो) मध्यचे महाव्यवस्थापक डॉ. एस.व्ही.सी. कामेश्वर राव यांनी येथे केले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त बुधवारी नीरीतर्फे ‘भारतीय अंतराळ कार्यक्रम’ या विषयावर नीरी सभागृह येथे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नीरीचे कार्यकारी निदेशक डॉ. तपस नंदी होते. डॉ. कामेश्वर राव हणाले, डॉ. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत. भारताचा संपूर्ण अंतराळ कार्यक्रम हा मानव विकासाला केंद्रबिंदू ठरवूनच राहिलेला आहे. गेल्या ४० वर्षांत भारतीय अंतराळ कार्यक्रमाने सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय राष्ट्रीय उपग्रहा(इन्सॅट)ने दूरदर्शन प्रसारण व हवामान सेवा उपलब्ध केली जाते; तर भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रहाद्वारे नैसर्गिक संसाधने, कृषी क्षेत्र, आपत्ती व्यवस्थापनाची सेवा दिली जाते. एकूणच कनेक्टिव्हीटी, कम्युनिकेशन, गव्हर्नन्स, शिक्षण, आरोग्य, कृषी, वन, पर्यावरण, पाणी आदींच्या उपयोगासाठी याचा वापर केला जातो. या सर्वांचा मुख्य केंद्रबिंदू मानवाचा विकास हाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. राव यांनी यावेळी इस्रोचा संपूर्ण कार्यक्रम प्रेझेंटेशनद्वरे समजावून सांगितला. डॉ. तपस नंदी यांनी स्वागतपर भाषण करीत डॉ. राव यांचा परिचय करून दिला. जया सब्जीवाले यांनी संचालन केले. डॉ. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)