शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

भारताचा अंतराळ कार्यक्रम समाज विकासासाठी

By admin | Updated: May 14, 2016 03:02 IST

जगभरातील प्रगत देश अंतराळाचा कार्यक्रम हा आपापल्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि मिलिटरीच्या सक्षमतेसह विविध कामासाठी करतात.

राष्ट्रीय तंत्रज्ञानदिन : एसव्हीसी कामेश्वर राव यांचे प्रतिपादननागपूर : जगभरातील प्रगत देश अंतराळाचा कार्यक्रम हा आपापल्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि मिलिटरीच्या सक्षमतेसह विविध कामासाठी करतात. परंतु भारतातील अंतराळ कार्यक्रम हा जगापेक्षा वेगळा आहे. भारतातील इस्रोमार्फत राबविण्यात येत असलेला अंतराळ कार्यक्रम हा पूर्णपणे समाज विकासाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र मध्यचे (इस्रो) मध्यचे महाव्यवस्थापक डॉ. एस.व्ही.सी. कामेश्वर राव यांनी येथे केले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त बुधवारी नीरीतर्फे ‘भारतीय अंतराळ कार्यक्रम’ या विषयावर नीरी सभागृह येथे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नीरीचे कार्यकारी निदेशक डॉ. तपस नंदी होते. डॉ. कामेश्वर राव हणाले, डॉ. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत. भारताचा संपूर्ण अंतराळ कार्यक्रम हा मानव विकासाला केंद्रबिंदू ठरवूनच राहिलेला आहे. गेल्या ४० वर्षांत भारतीय अंतराळ कार्यक्रमाने सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय राष्ट्रीय उपग्रहा(इन्सॅट)ने दूरदर्शन प्रसारण व हवामान सेवा उपलब्ध केली जाते; तर भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रहाद्वारे नैसर्गिक संसाधने, कृषी क्षेत्र, आपत्ती व्यवस्थापनाची सेवा दिली जाते. एकूणच कनेक्टिव्हीटी, कम्युनिकेशन, गव्हर्नन्स, शिक्षण, आरोग्य, कृषी, वन, पर्यावरण, पाणी आदींच्या उपयोगासाठी याचा वापर केला जातो. या सर्वांचा मुख्य केंद्रबिंदू मानवाचा विकास हाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. राव यांनी यावेळी इस्रोचा संपूर्ण कार्यक्रम प्रेझेंटेशनद्वरे समजावून सांगितला. डॉ. तपस नंदी यांनी स्वागतपर भाषण करीत डॉ. राव यांचा परिचय करून दिला. जया सब्जीवाले यांनी संचालन केले. डॉ. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)