शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

चीनला पर्याय होण्याची भारतात क्षमता  : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:50 IST

जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘कोरोना’च्या संकटाचे संधीत रूपांतर हवे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या संकटामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. जपान, अमेरिकेसारखे देश चीनमधील त्यांचे उद्योग दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्याच्या विचारात आहेत. इतरही देश असे पाऊल उचलू शकतात. अशास्थितीत जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. सोमवारी सायंकाळी भारतीय शिक्षण मंडळाच्या ‘फेसबुक पेज’वर गडकरी यांनी ‘कोरोनानंतरच्या औद्योगिक संधी व आव्हाने’ या विषयावर भाष्य केले.‘कोरोना’मुळे युरोप, अमेरिकेत तर चिंताजनक स्थिती आहे. या देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती नियंत्रणात आहे. परंतु अद्याप संकट संपलेले नाही. या संकटाचा काही दिवस सामना करावा लागेल. येत्या महिनाभरात स्थिती नक्कीच सुधारेल, हा विश्वास आहे. ‘कोरोना’च्या संकटाचा दोन भागात विचार करायला हवा. केंद्र शासनाने जारी केलेल्या नव्या धोरणांमुळे औषधांचा कच्चा माल चीनकडून मागविण्याची आवश्यकता राहणार नाही. आपल्याकडेच त्याचे उत्पादन होऊ शकेल. शिवाय देशात चार वैद्यकीय उपकरणांचे ‘पार्क’ उभारण्यात येणार असून, त्यामुळे ही उपकरणे देशातच बनू शकतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘कोरोना’नंतर काय, यासंदर्भात आतापासूनच नियोजन आवश्यक आहे. जगाला विविध गोष्टींचे निर्यात करणारा भारत ‘हब’ बनू शकतो. या माध्यमातून आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येऊ शकते व निर्यात वाढू शकते. यासाठी भविष्याला डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधांचा विकास, उद्योगक्षेत्रातील आव्हाने यावर भर देण्याची गरज आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Gadkariनितीन गडकरी