शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वेदशक्तीमुळे जगाचे लक्ष भारताकडे : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:34 IST

विज्ञान जे सिद्ध करते तेच अंतिम सत्य आहे असे जग ग्राह्य धरत होते. त्यामुळे आपण सर्व जाणतो, असेच जगाला वाटत होते. त्याच गोष्टीला जीवन जगण्याची संपूर्ण कला मानले गेले व या अहंकारात २००० वर्षे निघून गेली. मात्र अशा जगण्यातून जे हवे होते, ते मिळाले नाही. युद्धाचे संकट आहे, कलह आहे आणि दु:ख आहे. या गोष्टी समजायला लागल्या आणि हे जगणे अपूर्ण असल्याचे समजले. मग जगण्याची पूर्ण कला कोणती हा विचार सुरू झाला तेव्हा जगाचे लक्ष भारताकडे गेले. कारण भारताची ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ वेदांमुळे परिपूर्ण झालेली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेद पाठशाळा व वेद संशोधन केंद्र प्रतिकृतीचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विज्ञान जे सिद्ध करते तेच अंतिम सत्य आहे असे जग ग्राह्य धरत होते. त्यामुळे आपण सर्व जाणतो, असेच जगाला वाटत होते. त्याच गोष्टीला जीवन जगण्याची संपूर्ण कला मानले गेले व या अहंकारात २००० वर्षे निघून गेली. मात्र अशा जगण्यातून जे हवे होते, ते मिळाले नाही. युद्धाचे संकट आहे, कलह आहे आणि दु:ख आहे. या गोष्टी समजायला लागल्या आणि हे जगणे अपूर्ण असल्याचे समजले. मग जगण्याची पूर्ण कला कोणती हा विचार सुरू झाला तेव्हा जगाचे लक्ष भारताकडे गेले. कारण भारताची ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ वेदांमुळे परिपूर्ण झालेली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

दि आर्टऑफ लिव्हींग आणि वैदिक धर्म संस्थान यांच्यावतीने दहेगाव, कळमेश्वर रोड येथे निर्माण होणाऱ्या श्री श्री गुरुकुल वेद पाठशाळा व वैदिक संशोधन केंद्राच्या प्रतिकृतीच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित अनावरण कार्यक्रमात कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, महापौर नंदा जिचकार, स्वामी हरिहर, चैतन्य स्वामी व वैदिक धर्म संस्थानचे ट्रस्टी प्रशांत कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. भागवत पुढे म्हणाले, स्वत:मध्ये डोकावण्याची दृष्टी वेदांमधून मिळते. आपण ज्या नियमाने चालतो तोच धर्म होय. ही सृष्टी स्वत:च्या नियमाने चालते. त्यातील काही आपल्याला माहीत आहे. माहीत नसले तरी सृष्टी चालत आहे. सृष्टी चालण्याचे तत्त्व वेदांमध्ये समाविष्ट आहे. वेद हे ऋषींच्या अंतस्फूर्तीमधून निर्माण झाले आहेत. त्यामुळे वेदांचे अध्ययन आणि संशोधन आवश्यक आहे. वेदांची संहिता सुरक्षित ठेवणे, लुप्त झालेल्या वेदांच्या शाखांचा पुनर्विष्कार करणे व त्या प्रचलित करणे गरजेचे आहे. वेदांचे संशोधन, जतन हे सृष्टीच्या कल्याणासाठी आवश्यक आहेत. हे काम वेद विद्यालयांनी करावे. हे करताना वेद अध्ययन व संशोधन करणाऱ्या वेदांच्या सर्व शाखांना एकत्रित जोडण्याचे आवाहन डॉ. भागवत यांनी केले. यावेळी प्रा. वरखेडी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशांत कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर नवीन खानोरकर यांनी आभार मानले.प्रतिकृती अनावरणानंतर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भास्कर दास यांनी बासुरी आणि सत्यंद्रसिंग सोलंकी यांनी संतुरच्या स्वरांनी आर्ट ऑफ लिव्हींगच्या सभागृहात उपस्थित सदस्यांना श्रवणानंद दिला. यावेळी गौतम डबीर यांनी सुमेरू संध्या सादर केली.वेदशाळेत संपूर्ण वेदशाखांचा अभ्यास व संशोधनकळमेश्वर रोडवरील दहेगाव येथे आर्ट ऑफ लिव्हींगची ही वेदशाळा सात एकर जागेत तयार होणार आहे. वेदशाळेच्या प्रवेशद्वारावर यज्ञशाळा असणार आहे. मध्ये श्रीनगरच्या शंकराचार्य मंदिरासारखे शिव मंदिर साकारले जाणार आहे. हे शिवमंदिर ओम आकाराच्या जलविहाराने वेढलेले असेल. जलतलावात देशातील प्रमुख सात नद्यांचे पाणी असेल. शंकराचार्य मंदिराप्रमाणे येथील शिवलिंगावर वर्षातून एकदा सूर्याची किरणे पडतील, अशी रचना केली जाणार आहे. परिसरात ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेदाचा अभ्यास पुरातन काळातील गुरुकुलप्रमाणे निर्मिती स्वतंत्र कुटींमध्ये केला जाणार आहे. ही वेद पाठशाळा देशातील सर्वात मोठी वेद शाळा असेल, ज्यामध्ये जगभरातील वेदतज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंग