शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भारताचे संविधान हाच जीवन मार्ग

By admin | Updated: February 29, 2016 03:11 IST

जगाचे कोणतेही संविधान माणसाच्या जीवन उत्थानाची व विकासाची हमी देत नाही. पण भारताचे एकमेव संविधान असे आहे की,..

आंबेडकर जयंती महोत्सव : वेदप्रकाश मिश्रा यांचे प्रतिपादननागपूर : जगाचे कोणतेही संविधान माणसाच्या जीवन उत्थानाची व विकासाची हमी देत नाही. पण भारताचे एकमेव संविधान असे आहे की, हे मानवी विकास आणि उन्नतीची हमी देते. भारताचे संविधान यामुळेच जगात सर्वात उच्च स्थानावर मानल्या जाते, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत प्रा. देवीदास घोडेस्वार होते. डॉ. वेदप्रकाश मिश्रा भारताच्या प्रास्ताविकेच्या संदर्भात आपले मत अभिव्यक्त करताना म्हणाले, या प्रास्ताविकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’अशी होते. म्हणजेच सर्वांच्या हिताचे रक्षण, स्वरक्षण व प्रगती सर्व मिळून करण्याची संकल्पना यात प्रामुख्याने दिसते. भारताचे भविष्य व वर्तमान कोणी घडविणार असेल तर ते भारताचे लोक आहेत म्हणून हे संविधान भारतातील लोकांना पूर्णपणे समर्पित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रास्ताविका म्हणजे ‘गागर मे सागर भरने की कला’ होय असे ते म्हणाले. भारताच्या संविधानात दोन हजार वर्षाच्या क्रांतीचे प्रतीक पाहायल मिळते. विविधतेच्या देशात एकता प्रास्तावित करून ठेवणारे जगातील एकमेव संविधान भारताचे आहे. बुद्धकालीन व अशोककालीन शासन व्यवस्थेची झलक भारताच्या प्रास्ताविकेत पहायला मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. देवीदास घोडेस्वार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, संविधानाच्या कलम २५ व २६ नुसार प्रत्येक धर्माला आपआपला प्रचार प्रसाराची मुभा आहे. परंतु ही असताना धर्मपरिवर्तनाच्या अधिकाराला आज आळा घालण्याचे प्रयत्न चालू आहे. ६५ वर्षाच्या काळात भटक्यांच्या जीवनातील परिवर्तन पाहिल्यास आपल्याला संविधानाने घडवून आणलेले परिवर्तन दिसेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंदत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, सदस्य व्ही.टी. चिकाटे, विलास गजघाटे, प्राचार्य पी.सी. पवार, संचालक डॉ. मालती रेड्डी, डॉ. प्रकाश खरात आदी उपस्थित होते. प्रा. संध्या कलमधड यांनी संचालन केले. प्रा. मनोज अंड्रसकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)