शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

भारताचे संविधान हाच जीवन मार्ग

By admin | Updated: February 29, 2016 03:11 IST

जगाचे कोणतेही संविधान माणसाच्या जीवन उत्थानाची व विकासाची हमी देत नाही. पण भारताचे एकमेव संविधान असे आहे की,..

आंबेडकर जयंती महोत्सव : वेदप्रकाश मिश्रा यांचे प्रतिपादननागपूर : जगाचे कोणतेही संविधान माणसाच्या जीवन उत्थानाची व विकासाची हमी देत नाही. पण भारताचे एकमेव संविधान असे आहे की, हे मानवी विकास आणि उन्नतीची हमी देते. भारताचे संविधान यामुळेच जगात सर्वात उच्च स्थानावर मानल्या जाते, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत प्रा. देवीदास घोडेस्वार होते. डॉ. वेदप्रकाश मिश्रा भारताच्या प्रास्ताविकेच्या संदर्भात आपले मत अभिव्यक्त करताना म्हणाले, या प्रास्ताविकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’अशी होते. म्हणजेच सर्वांच्या हिताचे रक्षण, स्वरक्षण व प्रगती सर्व मिळून करण्याची संकल्पना यात प्रामुख्याने दिसते. भारताचे भविष्य व वर्तमान कोणी घडविणार असेल तर ते भारताचे लोक आहेत म्हणून हे संविधान भारतातील लोकांना पूर्णपणे समर्पित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रास्ताविका म्हणजे ‘गागर मे सागर भरने की कला’ होय असे ते म्हणाले. भारताच्या संविधानात दोन हजार वर्षाच्या क्रांतीचे प्रतीक पाहायल मिळते. विविधतेच्या देशात एकता प्रास्तावित करून ठेवणारे जगातील एकमेव संविधान भारताचे आहे. बुद्धकालीन व अशोककालीन शासन व्यवस्थेची झलक भारताच्या प्रास्ताविकेत पहायला मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. देवीदास घोडेस्वार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, संविधानाच्या कलम २५ व २६ नुसार प्रत्येक धर्माला आपआपला प्रचार प्रसाराची मुभा आहे. परंतु ही असताना धर्मपरिवर्तनाच्या अधिकाराला आज आळा घालण्याचे प्रयत्न चालू आहे. ६५ वर्षाच्या काळात भटक्यांच्या जीवनातील परिवर्तन पाहिल्यास आपल्याला संविधानाने घडवून आणलेले परिवर्तन दिसेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंदत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, सदस्य व्ही.टी. चिकाटे, विलास गजघाटे, प्राचार्य पी.सी. पवार, संचालक डॉ. मालती रेड्डी, डॉ. प्रकाश खरात आदी उपस्थित होते. प्रा. संध्या कलमधड यांनी संचालन केले. प्रा. मनोज अंड्रसकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)