शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे संविधान हाच जीवन मार्ग

By admin | Updated: February 29, 2016 03:11 IST

जगाचे कोणतेही संविधान माणसाच्या जीवन उत्थानाची व विकासाची हमी देत नाही. पण भारताचे एकमेव संविधान असे आहे की,..

आंबेडकर जयंती महोत्सव : वेदप्रकाश मिश्रा यांचे प्रतिपादननागपूर : जगाचे कोणतेही संविधान माणसाच्या जीवन उत्थानाची व विकासाची हमी देत नाही. पण भारताचे एकमेव संविधान असे आहे की, हे मानवी विकास आणि उन्नतीची हमी देते. भारताचे संविधान यामुळेच जगात सर्वात उच्च स्थानावर मानल्या जाते, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत प्रा. देवीदास घोडेस्वार होते. डॉ. वेदप्रकाश मिश्रा भारताच्या प्रास्ताविकेच्या संदर्भात आपले मत अभिव्यक्त करताना म्हणाले, या प्रास्ताविकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’अशी होते. म्हणजेच सर्वांच्या हिताचे रक्षण, स्वरक्षण व प्रगती सर्व मिळून करण्याची संकल्पना यात प्रामुख्याने दिसते. भारताचे भविष्य व वर्तमान कोणी घडविणार असेल तर ते भारताचे लोक आहेत म्हणून हे संविधान भारतातील लोकांना पूर्णपणे समर्पित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रास्ताविका म्हणजे ‘गागर मे सागर भरने की कला’ होय असे ते म्हणाले. भारताच्या संविधानात दोन हजार वर्षाच्या क्रांतीचे प्रतीक पाहायल मिळते. विविधतेच्या देशात एकता प्रास्तावित करून ठेवणारे जगातील एकमेव संविधान भारताचे आहे. बुद्धकालीन व अशोककालीन शासन व्यवस्थेची झलक भारताच्या प्रास्ताविकेत पहायला मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. देवीदास घोडेस्वार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, संविधानाच्या कलम २५ व २६ नुसार प्रत्येक धर्माला आपआपला प्रचार प्रसाराची मुभा आहे. परंतु ही असताना धर्मपरिवर्तनाच्या अधिकाराला आज आळा घालण्याचे प्रयत्न चालू आहे. ६५ वर्षाच्या काळात भटक्यांच्या जीवनातील परिवर्तन पाहिल्यास आपल्याला संविधानाने घडवून आणलेले परिवर्तन दिसेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंदत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, सदस्य व्ही.टी. चिकाटे, विलास गजघाटे, प्राचार्य पी.सी. पवार, संचालक डॉ. मालती रेड्डी, डॉ. प्रकाश खरात आदी उपस्थित होते. प्रा. संध्या कलमधड यांनी संचालन केले. प्रा. मनोज अंड्रसकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)