शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

भारतीयांनी ‘इस्रायल’चे अनुकरण करावे

By admin | Updated: October 3, 2016 02:43 IST

आपल्या देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती आहे. परंतु युद्धाच्या प्रसंगी प्रत्यक्ष रणभूमीवर लढण्यासाठी सगळेच तयार होतील असे नाही.

शांताक्का यांचे प्रतिपादन : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी महोत्सव साजरानागपूर : आपल्या देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती आहे. परंतु युद्धाच्या प्रसंगी प्रत्यक्ष रणभूमीवर लढण्यासाठी सगळेच तयार होतील असे नाही. ‘इस्रायल’मध्ये सामान्य नागरिकदेखील सैनिक प्रशिक्षण घेतात व राष्ट्रावर संकट आले असता देशाच्या संरक्षणासाठी उभे होतात. भारतीयांदेखील ‘इस्रायल’च्या नागरिकांच्या राष्ट्रसमर्पण भावनेचे अनुकरण केले पाहिजे, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. नागरिकांनी पहिले प्राधान्य देशालाच दिले पाहिजे. यासाठी लहानपणापासूनच तसे संस्कार देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने जागरुक नागरिक झाले पाहिजे व यात महिलांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे महिलांमध्ये जागृती आणायला हवी, असे शांताक्का म्हणाल्या. आपल्या देशात सणांची परंपरा आहे. प्रत्येक सण हा मौलिक संदेश देत असतो व खऱ्या अर्थाने हे सण सकारात्मक वातावरण निर्मिती करतात, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. ्नराष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या सोहळ्याला नागपुरातील निरनिराळ्या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती. शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर सेविकांनी दाखविलेल्या खड्गाच्या प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. या कार्यक्रमाला समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, महानगर कार्यवाहिका करुणा साठे या उपस्थित होत्या. या सोहळ्याचे ‘युट्यूब’ तसेच वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. (प्रतिनिधी)मराठा आंदोलनावर अप्रत्यक्ष टीकादेशात विविध जातपंथामध्ये दुरावा दिसून येत आहे. विविध जाती विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. परंतु यामुळे समाजाचे विघटन होत आहे. यासाठीच सामाजिक समरसतेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी कुठल्याही समाजाचे नाव घेतले नाही. परंतु सध्याची सामाजिक व राजकीय स्थिती लक्षात घेता त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलनाकडेच होता.