शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांनी ‘इस्रायल’चे अनुकरण करावे

By admin | Updated: October 3, 2016 02:43 IST

आपल्या देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती आहे. परंतु युद्धाच्या प्रसंगी प्रत्यक्ष रणभूमीवर लढण्यासाठी सगळेच तयार होतील असे नाही.

शांताक्का यांचे प्रतिपादन : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी महोत्सव साजरानागपूर : आपल्या देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती आहे. परंतु युद्धाच्या प्रसंगी प्रत्यक्ष रणभूमीवर लढण्यासाठी सगळेच तयार होतील असे नाही. ‘इस्रायल’मध्ये सामान्य नागरिकदेखील सैनिक प्रशिक्षण घेतात व राष्ट्रावर संकट आले असता देशाच्या संरक्षणासाठी उभे होतात. भारतीयांदेखील ‘इस्रायल’च्या नागरिकांच्या राष्ट्रसमर्पण भावनेचे अनुकरण केले पाहिजे, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. नागरिकांनी पहिले प्राधान्य देशालाच दिले पाहिजे. यासाठी लहानपणापासूनच तसे संस्कार देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने जागरुक नागरिक झाले पाहिजे व यात महिलांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे महिलांमध्ये जागृती आणायला हवी, असे शांताक्का म्हणाल्या. आपल्या देशात सणांची परंपरा आहे. प्रत्येक सण हा मौलिक संदेश देत असतो व खऱ्या अर्थाने हे सण सकारात्मक वातावरण निर्मिती करतात, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. ्नराष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या सोहळ्याला नागपुरातील निरनिराळ्या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती. शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर सेविकांनी दाखविलेल्या खड्गाच्या प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. या कार्यक्रमाला समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, महानगर कार्यवाहिका करुणा साठे या उपस्थित होत्या. या सोहळ्याचे ‘युट्यूब’ तसेच वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. (प्रतिनिधी)मराठा आंदोलनावर अप्रत्यक्ष टीकादेशात विविध जातपंथामध्ये दुरावा दिसून येत आहे. विविध जाती विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. परंतु यामुळे समाजाचे विघटन होत आहे. यासाठीच सामाजिक समरसतेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी कुठल्याही समाजाचे नाव घेतले नाही. परंतु सध्याची सामाजिक व राजकीय स्थिती लक्षात घेता त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलनाकडेच होता.