शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांनी ‘इस्रायल’चे अनुकरण करावे

By admin | Updated: October 3, 2016 02:43 IST

आपल्या देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती आहे. परंतु युद्धाच्या प्रसंगी प्रत्यक्ष रणभूमीवर लढण्यासाठी सगळेच तयार होतील असे नाही.

शांताक्का यांचे प्रतिपादन : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी महोत्सव साजरानागपूर : आपल्या देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती आहे. परंतु युद्धाच्या प्रसंगी प्रत्यक्ष रणभूमीवर लढण्यासाठी सगळेच तयार होतील असे नाही. ‘इस्रायल’मध्ये सामान्य नागरिकदेखील सैनिक प्रशिक्षण घेतात व राष्ट्रावर संकट आले असता देशाच्या संरक्षणासाठी उभे होतात. भारतीयांदेखील ‘इस्रायल’च्या नागरिकांच्या राष्ट्रसमर्पण भावनेचे अनुकरण केले पाहिजे, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. नागरिकांनी पहिले प्राधान्य देशालाच दिले पाहिजे. यासाठी लहानपणापासूनच तसे संस्कार देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने जागरुक नागरिक झाले पाहिजे व यात महिलांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे महिलांमध्ये जागृती आणायला हवी, असे शांताक्का म्हणाल्या. आपल्या देशात सणांची परंपरा आहे. प्रत्येक सण हा मौलिक संदेश देत असतो व खऱ्या अर्थाने हे सण सकारात्मक वातावरण निर्मिती करतात, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. ्नराष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या सोहळ्याला नागपुरातील निरनिराळ्या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती. शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर सेविकांनी दाखविलेल्या खड्गाच्या प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. या कार्यक्रमाला समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, महानगर कार्यवाहिका करुणा साठे या उपस्थित होत्या. या सोहळ्याचे ‘युट्यूब’ तसेच वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. (प्रतिनिधी)मराठा आंदोलनावर अप्रत्यक्ष टीकादेशात विविध जातपंथामध्ये दुरावा दिसून येत आहे. विविध जाती विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. परंतु यामुळे समाजाचे विघटन होत आहे. यासाठीच सामाजिक समरसतेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी कुठल्याही समाजाचे नाव घेतले नाही. परंतु सध्याची सामाजिक व राजकीय स्थिती लक्षात घेता त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलनाकडेच होता.