शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

भारतीय भूमी समानतेचा संदेश देणारी

By admin | Updated: September 17, 2016 03:22 IST

वडील भारतीय असताना अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्यानंतर तेथे त्यांचा प्रेमविवाह झाला.

टॉम अल्टर : ‘युनिटी इन डायव्हर्सिटी-द जॉय, द चॅलेंज’ विषयावर व्याख्याननागपूर : वडील भारतीय असताना अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्यानंतर तेथे त्यांचा प्रेमविवाह झाला. परंतु पुढे आईवडिलांनी भारतात परतण्याचा निर्णय घेऊन ते माझ्या मोठ्या बहिणीसह भारतात परतले. लहानपणापासून मी स्वामी विवेकानंदांच्या अमेरिकेतील शिकागो येथील परिषदेतील भाषणामुळे प्रभावीत झालो. त्यांच्याच भूमीत माझा जन्म व्हावा यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट नसून भारतीय भूमी समानतेचा संदेश देणारी आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील चित्रपट कलावंत पद्मश्री टॉम अल्टर यांनी आज येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमालेत ‘युनिटी इन डायव्हर्सिटी-द जॉय, द चॅलेंज’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, मस्जिद पारेख यांची उपस्थिती होती. टॉम अल्टर म्हणाले, लहानपणापासून माझ्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा पगडा आहे. अमेरीकेतील शिकागो येथील त्यांच्या भाषणाला माझ्या आईचे आजोबा उपस्थित होते. त्यामुळे आईला ते नेहमी स्वामी विवेकानंदांच्या आठवणी सांगत. स्वामी विवेकानंदांच्या भूमीत माझा जन्म व्हावा हे माझे भाग्य आहे. भारताची भूमी ही सर्वसमावेशक आहे. येथे सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान स्थान आहे. भारताच्या भूमीने सर्वांना वारसाने खूप काही दिले आहे. ते कसे जोपासावे ही ज्याची त्याची जबाबदारी आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. वडील उर्दु भाषेत बायबलचे वाचन करीत असल्यामुळे उर्दु भाषा शिकायला मिळाली. संसदेने हिंदी राष्ट्रभाषा जाहीर केल्यानंतर हिंदी भाषाही शिकल्याचे त्यांनी सांगून भारतीय असल्याची जबाबदारी प्रत्येकाने मिळून पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. मस्जिद पारेख म्हणाले, समाजातील जबाबदार व्यक्तीच समाजातील वाईट स्थितीस कारणीभूत आहेत. सर्व धर्म त्यांच्या धर्मग्रंथांना सोडून अंधश्रद्धा, वाईट गोष्टींच्या मागे लागल्यामुळे जातीय तेढ वाढत असून धार्मिक भावना दूर ठेवून मानवतेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी भारतात अनेक प्रकारची विविधता असूनही सर्वजण एकत्र राहून एकतेचा परिचय देत असल्याचे सांगितले. यावेळी उदय चंद्र यांनी शिकागो परिषदेतील स्वामी विवेकानंदांचे भाषण सादर केले. संचालन प्रमोद शर्मा यांनी केले. आभार कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)घंटी, अजान आणि प्रार्थनेची जुगलबंदीकार्यक्रमाच्या सुरुवातीला टॉम अल्टर आणि त्यांचे मित्र उदय चंद्रा यांनी भारतभूमीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण कसे आहे याचे एक उत्तम उदाहरण सादर केले. टॉम अल्टर यांच्या वडिलांनी १९५४ मध्ये राजपूरमध्ये एक आश्रम स्थापन केला होता. या आश्रमाच्या परिसरात मंदिर, मशीद खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे घंटी, अजान यांचे आवाज खूप ऐकू येत. त्यावर त्यांनी तेथील वातावरण कसे होते याचे सादरीकरण केले. उदय चंद्रा यांनी कुराणातील अजान सादर केल्या, तर टॉम अल्टर यांनी गिरजाघरातील प्रार्थना आणि सोबतच मंदिरातील घंटी वाजवून मंदिर, मशीद आणि गिरजाघर एकाच ठिकाणी असल्याचा भास घडविला. या उदाहरणानंतर अशा प्रकारचे ध्वनी जगात केवळ भारतातच ऐकावयास मिळू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.