शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

भारतीय भूमी समानतेचा संदेश देणारी

By admin | Updated: September 17, 2016 03:22 IST

वडील भारतीय असताना अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्यानंतर तेथे त्यांचा प्रेमविवाह झाला.

टॉम अल्टर : ‘युनिटी इन डायव्हर्सिटी-द जॉय, द चॅलेंज’ विषयावर व्याख्याननागपूर : वडील भारतीय असताना अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्यानंतर तेथे त्यांचा प्रेमविवाह झाला. परंतु पुढे आईवडिलांनी भारतात परतण्याचा निर्णय घेऊन ते माझ्या मोठ्या बहिणीसह भारतात परतले. लहानपणापासून मी स्वामी विवेकानंदांच्या अमेरिकेतील शिकागो येथील परिषदेतील भाषणामुळे प्रभावीत झालो. त्यांच्याच भूमीत माझा जन्म व्हावा यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट नसून भारतीय भूमी समानतेचा संदेश देणारी आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील चित्रपट कलावंत पद्मश्री टॉम अल्टर यांनी आज येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमालेत ‘युनिटी इन डायव्हर्सिटी-द जॉय, द चॅलेंज’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, मस्जिद पारेख यांची उपस्थिती होती. टॉम अल्टर म्हणाले, लहानपणापासून माझ्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा पगडा आहे. अमेरीकेतील शिकागो येथील त्यांच्या भाषणाला माझ्या आईचे आजोबा उपस्थित होते. त्यामुळे आईला ते नेहमी स्वामी विवेकानंदांच्या आठवणी सांगत. स्वामी विवेकानंदांच्या भूमीत माझा जन्म व्हावा हे माझे भाग्य आहे. भारताची भूमी ही सर्वसमावेशक आहे. येथे सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान स्थान आहे. भारताच्या भूमीने सर्वांना वारसाने खूप काही दिले आहे. ते कसे जोपासावे ही ज्याची त्याची जबाबदारी आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. वडील उर्दु भाषेत बायबलचे वाचन करीत असल्यामुळे उर्दु भाषा शिकायला मिळाली. संसदेने हिंदी राष्ट्रभाषा जाहीर केल्यानंतर हिंदी भाषाही शिकल्याचे त्यांनी सांगून भारतीय असल्याची जबाबदारी प्रत्येकाने मिळून पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. मस्जिद पारेख म्हणाले, समाजातील जबाबदार व्यक्तीच समाजातील वाईट स्थितीस कारणीभूत आहेत. सर्व धर्म त्यांच्या धर्मग्रंथांना सोडून अंधश्रद्धा, वाईट गोष्टींच्या मागे लागल्यामुळे जातीय तेढ वाढत असून धार्मिक भावना दूर ठेवून मानवतेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी भारतात अनेक प्रकारची विविधता असूनही सर्वजण एकत्र राहून एकतेचा परिचय देत असल्याचे सांगितले. यावेळी उदय चंद्र यांनी शिकागो परिषदेतील स्वामी विवेकानंदांचे भाषण सादर केले. संचालन प्रमोद शर्मा यांनी केले. आभार कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)घंटी, अजान आणि प्रार्थनेची जुगलबंदीकार्यक्रमाच्या सुरुवातीला टॉम अल्टर आणि त्यांचे मित्र उदय चंद्रा यांनी भारतभूमीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण कसे आहे याचे एक उत्तम उदाहरण सादर केले. टॉम अल्टर यांच्या वडिलांनी १९५४ मध्ये राजपूरमध्ये एक आश्रम स्थापन केला होता. या आश्रमाच्या परिसरात मंदिर, मशीद खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे घंटी, अजान यांचे आवाज खूप ऐकू येत. त्यावर त्यांनी तेथील वातावरण कसे होते याचे सादरीकरण केले. उदय चंद्रा यांनी कुराणातील अजान सादर केल्या, तर टॉम अल्टर यांनी गिरजाघरातील प्रार्थना आणि सोबतच मंदिरातील घंटी वाजवून मंदिर, मशीद आणि गिरजाघर एकाच ठिकाणी असल्याचा भास घडविला. या उदाहरणानंतर अशा प्रकारचे ध्वनी जगात केवळ भारतातच ऐकावयास मिळू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.