शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

भारतीय उड्ड्यण क्षेत्र ‘टॉप’३ मध्ये येणार

By admin | Updated: October 17, 2015 03:32 IST

गेल्या अनेक वर्षांत भारतीय उड्ड्यण क्षेत्राने अनेक चढउतार अनुभवले आहेत. परंतु भारतीय बाजारामध्ये प्रचंड क्षमता आहे. आज जगभरात भारतीय उड्ड्यण क्षेत्राचा पाचवा क्रमांक लागतो.

दिनेश केसकर : नागपुरातील ‘एमआरओ’चे जागतिक स्तरावर ‘मार्केटिंग’ व्हावेनागपूर : गेल्या अनेक वर्षांत भारतीय उड्ड्यण क्षेत्राने अनेक चढउतार अनुभवले आहेत. परंतु भारतीय बाजारामध्ये प्रचंड क्षमता आहे. आज जगभरात भारतीय उड्ड्यण क्षेत्राचा पाचवा क्रमांक लागतो.परंतु येत्या २० वर्षात देशाचा समावेश ‘टॉप’ ३ देशांमध्ये असेल असा विश्वास ‘बोईंग इंटरनॅशनल’चे उपाध्यक्ष डॉ.दिनेश केसकर यांनी व्यक्त केला. ‘व्हीएनआयटी’मध्ये (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) आयोजित ‘अ‍ॅक्सिस’ या तांत्रिक महोत्सवाच्या उद्घाटनसाठी मुख्य अतिथी म्हणून ते आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.मागणी-पुरवठ्याचे संतुलित प्रमाण व इंधनाचे जागतिक बाजारात घटलेले दर यामुळे भारताच्या नागरी उड्ड्यण क्षेत्राला बऱ्यापैकी स्थैर्य आले आहे. पुढील २० वर्षांत भारताला १ हजार ७४० विमानांची गरज भासणार आहे असे ते म्हणाले. उपराजधानीतील ‘एमआरओ’संदर्भातदेखील त्यांनी भाष्य केले. ‘एअर इंडिया’सोबत झालेल्या करारानुसार ‘बोईंग’ने जागतिक दर्जाचा ‘एमआरओ’ उभारला. परंतु ‘बोईंग’चे मुख्य काम विमानांचे ‘मेन्टेनन्स’ करणे नव्हे तर त्यांना तयार करणे हे आहे. त्यामुळे करारानुसार ‘एमआरओ’ एअर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आला. तसेही ‘एमआरओ’चे संचालन करणे हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरले नसते असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ देशातील उड्ड्यण क्षेत्रावर जर ‘एमआरओ’ अवलंबून राहिला तर त्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. या ‘एमआरओ’मध्ये कुशल मनुष्यबळाची संख्या वाढवून जगभरात याचे योग्य पद्धतीने ‘मार्केटिंग’ झाले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.(प्रतिनिधी)‘मिहान’मध्ये कंपन्या येणे आवश्यकनागपूरला ‘मिहान’च्या माध्यमातून विकासाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. येथे जास्तीत जास्त प्रमाणात नामांकित कंपन्या येणे आवश्यक आहे. ‘बोईंग’ला येथे ‘एमआरओ’ स्थापन करताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. तसे होऊ नये व जास्तीत जास्त कंपन्या याव्या यादृष्टीने उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत डॉ.केसकर यांनी व्यक्त केले.‘आॅनलाईन’ अभ्यासक्रम सुरू व्हावेतभारतातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. प्राध्यापकांसोबतच ‘गुगल’ त्यांचा गुरू झाला आहे. उद्योग क्षेत्र व बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन अभ्यासक्रमांमध्येदेखील त्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक आहे. यादृष्टीने धोरण आखले पाहिजे. शिवाय जगातील नामांकित विद्यापीठांप्रमाणे ‘आॅनलाईन’ अभ्यासक्रमांवरदेखील भर देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.केसकर यांनी प्रतिपादन केले.नील आर्मस्ट्रॉंग ठरले प्रेरणास्थानचंद्रावर सर्वात अगोदर पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्रॉंग हे डॉ.दिनेश केसकर यांचे ‘पीएचडी’चे मार्गदर्शक होते. १९६९ साली ज्या दिवशी त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले त्यावेळी मी अमरावतीला रेडिओवरून वृत्तांकन ऐकले होते व तेव्हापासूनच त्यांना भेटण्याची सुप्त इच्छा मनात होती. नागपुरातून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांच्यासोबतच काम करण्याची संधी मिळाली. आर्मस्ट्रॉंग हे अतिशय शांत व तितकेच हुशार व्यक्ती होते. त्यांनी कधीही पुस्तकातून शिकविले नाही. चंद्रावर पाऊल ठेवणारा प्रथम मनुष्य म्हणून त्यांची निवड झाली नव्हती हेदेखील मला त्यांच्याकडूनच कळले होते असे डॉ.केसकर यांनी सांगितले.