शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ज्ञान केंद्रस्थानी असेल तरच भारत जगात आघाडीवर राहिल, नीती आयाेगाचे सदस्य विजयकुमार सारस्वत

By निशांत वानखेडे | Updated: September 15, 2024 19:32 IST

व्हीएनआयटीचा २२ वा दीक्षांत सोहळा

नागपूर: एकविसावे शतक डेटा अर्थशास्त्राचे आहे आणि अर्थातच आपल्या देशाचे आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी सोहळ्याकडे वाटचाल करताना भारतात नॅनो तंत्रज्ञान, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, सेमीकंडक्टर यासारख्या क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती होत आहे. मात्र ज्ञान केंद्रस्थानी असायला हवे, तरच भारत जगात आघाडीवर राहिल, असे मत माजी डीआरडीओ सचिव व नीती आयोग सदस्य डॉ.विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून व्हीएनआयटीचा २२ वा दीक्षांत सोहळा रविवारी व्हीएनआयटी परिसरात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या प्रशासकीय मंडळाचे संचालक एम.मदन गोपाल, व्हीएनआयटीचे संंचालक प्रेमलाल पटेल उपस्थित होते. डाॅ. सारस्वत म्हणाले, जुन्या काळातील संशोधकांच्या तुलनेने आजच्या काळातील संशोधक, शास्त्रज्ञांपुढील आव्हाने फार वेगळी आहे. आज एखाद्या विषयात केवळ तज्ञ होऊन भागणार नाही तर विविध विषयातील परस्परसंबंधांना ओळखून त्यांना प्रयोगात आणणे काळाची गरज आहे. समाजातील, देशातील व्यावहारिक समस्या सोडविण्यासाठी विज्ञानाच्या विविध शाखांची जोड घालण्याची आवश्यकता आहे. भारताने प्रगती करताना स्वच्छ इंधनाला प्राथमिकता दिली पाहिजे. शाश्वत औद्योगिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामानातील बदलांवर उपाययोजना करता येईल. रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांच्या मदतीने भारताचे शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संचालन डॉ. मैथिली पैकने आणि डॉ. अभिषेक बॅनर्जी यांनी केले. आभार कुलसचिव एस.आर.साठे यांनी मानले.

रोहित चौहान सर विश्वेश्वरय्या सुवर्ण पदकाने सन्मानितअभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी रोहित रमेश चौहान याला बी. टेक. प्रोग्रामच्या सर्व विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल २०२४ चे प्रतिष्ठित "सर विश्वेश्वरय्या सुवर्ण पदक" देऊन सम्मानित करण्यात आले. इतरही गुणवंत विद्यार्थ्यांना पदकाने सन्मानित करण्यात आले. यासह १२२५ पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात ९५ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, २३९ एम.टेक., ६० एम.एससी., ७६५ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, ७३ बॅचलर ऑफ आर्किटेक्ट पदवींचा समावेश होता.

टॅग्स :nagpurनागपूर