शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ज्ञान केंद्रस्थानी असेल तरच भारत जगात आघाडीवर राहिल, नीती आयाेगाचे सदस्य विजयकुमार सारस्वत

By निशांत वानखेडे | Updated: September 15, 2024 19:32 IST

व्हीएनआयटीचा २२ वा दीक्षांत सोहळा

नागपूर: एकविसावे शतक डेटा अर्थशास्त्राचे आहे आणि अर्थातच आपल्या देशाचे आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी सोहळ्याकडे वाटचाल करताना भारतात नॅनो तंत्रज्ञान, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, सेमीकंडक्टर यासारख्या क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती होत आहे. मात्र ज्ञान केंद्रस्थानी असायला हवे, तरच भारत जगात आघाडीवर राहिल, असे मत माजी डीआरडीओ सचिव व नीती आयोग सदस्य डॉ.विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून व्हीएनआयटीचा २२ वा दीक्षांत सोहळा रविवारी व्हीएनआयटी परिसरात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या प्रशासकीय मंडळाचे संचालक एम.मदन गोपाल, व्हीएनआयटीचे संंचालक प्रेमलाल पटेल उपस्थित होते. डाॅ. सारस्वत म्हणाले, जुन्या काळातील संशोधकांच्या तुलनेने आजच्या काळातील संशोधक, शास्त्रज्ञांपुढील आव्हाने फार वेगळी आहे. आज एखाद्या विषयात केवळ तज्ञ होऊन भागणार नाही तर विविध विषयातील परस्परसंबंधांना ओळखून त्यांना प्रयोगात आणणे काळाची गरज आहे. समाजातील, देशातील व्यावहारिक समस्या सोडविण्यासाठी विज्ञानाच्या विविध शाखांची जोड घालण्याची आवश्यकता आहे. भारताने प्रगती करताना स्वच्छ इंधनाला प्राथमिकता दिली पाहिजे. शाश्वत औद्योगिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामानातील बदलांवर उपाययोजना करता येईल. रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांच्या मदतीने भारताचे शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संचालन डॉ. मैथिली पैकने आणि डॉ. अभिषेक बॅनर्जी यांनी केले. आभार कुलसचिव एस.आर.साठे यांनी मानले.

रोहित चौहान सर विश्वेश्वरय्या सुवर्ण पदकाने सन्मानितअभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी रोहित रमेश चौहान याला बी. टेक. प्रोग्रामच्या सर्व विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल २०२४ चे प्रतिष्ठित "सर विश्वेश्वरय्या सुवर्ण पदक" देऊन सम्मानित करण्यात आले. इतरही गुणवंत विद्यार्थ्यांना पदकाने सन्मानित करण्यात आले. यासह १२२५ पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात ९५ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, २३९ एम.टेक., ६० एम.एससी., ७६५ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, ७३ बॅचलर ऑफ आर्किटेक्ट पदवींचा समावेश होता.

टॅग्स :nagpurनागपूर