शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’वाल्यांना खरा ‘भारत’ दिसावा!

By admin | Updated: March 18, 2017 02:55 IST

पॉश, झगमगाट असलेल्या ‘इंडिया’तील लोकांना अजूनही खरा ‘भारत’ दिसला नाही. हा सामाजिक भेद आमच्या लक्षात आला.

मकरंद अनासपुरेंनी व्यक्त केल्या भावना : ‘नाम’ ही लोकसहभागातून चालविलेली चळवळ गणेश खवसे/अभय लांजेवार   नागपूर पॉश, झगमगाट असलेल्या ‘इंडिया’तील लोकांना अजूनही खरा ‘भारत’ दिसला नाही. हा सामाजिक भेद आमच्या लक्षात आला. त्यामुळे ही दरी दूर करण्याची खूणगाठ बांधली. त्यातूनच ‘नाम’ फाऊंडेशनने आकार घेतला. ती आता लोकसहभागाची चळवळ झाली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ‘नाम’ झटत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आम्हाला दिसून आले. हे कार्य ‘नाम’ फाऊंडेशन पुरस्कारासाठी करीत नाही आणि ‘नाम’ ही कुणाची खासगी मालमत्तासुद्धा नाही. काम करणाऱ्या प्रत्येक माणसांची ‘नाम’ आहे. समाज नेहमीच वाईट प्रवृत्तींवर तोंडसुख घेतो. मात्र चांगल्या कामांवरही चर्चा व्हायलाच पाहिजे, असे मत हास्यअभिनेता मकरंद अनासपुरे याने व्यक्त केले. मकरंद हा नागपुरात आला असता ‘नाम’ फाऊंडेशनबाबतच्या कामाची माहिती जाणून घेण्यासाठी भेट घेतली असता त्याने दिलखुलास चर्चा केली. अन्नदात्यापासूनच सुरू झालेली चर्चा अन्नदात्यांवरच संपली. कुही तालुक्यातील टाकळी येथे ‘नाम’च्या वतीने आकाराला आलेले तलावाचे काम आम्ही बघितले म्हणताच मकरंदच्या चेहऱ्यावर आनंद अभिव्यक्त झाला. ‘कसं वाटतय... स्पॉट बघितला का, शेतकऱ्यांना फायदा झाला का...’ अशी लागलीच आपुलकीची विचारणाही सुरू झाली. यवतमाळातील घाटंजीला काम सुरू आहे. वर्धा, अमरावतीला लवकरच काम सुरू करणार आहोत आणि मी सध्या पोकलॅन्ड मिळविण्याच्या मागे आहे, कुणी असेल तर सांगा असेही सांगण्यास मकरंद विसरला नाही. चंदेरी दुनियेत काम करताना ‘नाम’बाबत कसे सुचले या प्रश्नावर मकरंद म्हणाला, आमच्या क्षेत्रात खूप ग्लॅमर आहे. खूप पार्ट्या चालातात, समारंभांचा थाट असतो. सर्वत्र झगमगाट असतो. परंतु मला हे सर्व किळसवाणं वाटतंय. आतापर्यंत माझ्या कलेला रसिक, प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. लोकांनी जे दिले ते या माध्यमातून परत करायचे आहे. आपण सोशल मीडियावर गप्पा मारण्यात वस्ताद आहोत. प्रत्यक्षात काम करण्यात कमी. म्हणून ठरवले कुणावर टीका करण्यापेक्षा, बोलण्यापेक्षा आपण स्वत: उतरायचे. यादरम्यान ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ आणि दुष्काळ परिस्थितीवर आधारित शेतकऱ्यांच्या समस्येला हात घालणाऱ्या चित्रपटात भूमिका केल्या. नाना पाटेकर यांच्यामुळे इंटरेस्ट वाढला. गंभीरतनेने लक्ष दिले तर ही एक चांगली मोहीम होऊ शकेल, असा विश्वास आम्हाला वाटला. इंडियातील लोकांना भारतातील समस्याच माहीत नाही, असाही सामाजिक भेद आमच्या ध्यानात आला. पक्की खूणगाठ बांधली. त्यातून ‘नाम’ आकाराला आले. या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लोकसहभागातून चळवळ राबविण्यात येत आहे, असेही मकरंदने सांगितले. मी उपवास करणार! अन्नदात्यांसाठी १९ मार्चला असंख्य नागरिक उपवास करणार आहेत. अन्नदात्यांच्या संघर्षमयी आयुष्यात खंबीरतेने सोबतीला आहोत अशीच हाक सर्वत्र ऐकू येत आहे. याबाबत काय वाटते असे विचारताच ‘होय, मला ही बाब कळली. मी सुद्धा दिवसभर उपवास करणार आहे’ असा संकल्प मकरंदने बोलून दाखविला. सर्वच संपलेले नाही, विझलेसुद्धा नाही, असा विश्वास आणि ऊर्जा शेतकऱ्यांमध्ये तुम्ही - आम्ही साऱ्यांनीच देण्याची गरज असल्याचीही बाब व्यक्त केली. मला देवत्व नकोय कोकण, सिंधुदुर्ग, पश्विम महाराष्ट्र आणि विदर्भात कामाचा आवाका वाढवलेला आहे. लोकसहभागातून रस्ते, तलावाचे खोलीकरण, बंधारे आदी महत्त्वपूर्ण कामांचा धुमधडाका सुरू आहे. जिथे वाळवंट होते; तिथे पिके डोलत आहेत. फळांच्या बागा फुलत आहेत. लातूरनजीक पाखरसावंगी या गावात लोकसहभागातून १२५ रस्ते बांधले. लोकार्पणासाठी सारखा आग्रह होता. मुद्दाम समारंभ टाळतो. काम फत्ते झाले की आम्हास आनंद मिळतो. आम्हाला देवत्व नकोय. जिथे काम सुरू करायचे आहे तिथे जात असतो कारण तिथे काही घडलेले नसते. काम पूर्णत्वाला आले तिथे त्या कामाला लोकांनीच पुढे रेटायचे. आम्हाला यातून काही मिळावे, ही अपेक्षा नाही. सध्याचे काम हे ज्योत असेल तर उद्या त्याची मशाल होईल. त्यासाठी लोकांनी एकत्रित येणे अपरिहार्य आहे, हे सांगण्यासही मकरंद विसरला नाही.