शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भारत हिंदू राष्ट्रच आहे आणि राहिलही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:08 IST

देश अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देविष्णू कोकजे यांचा लोकमतशी संवाददेश संक्रमण काळातून जातोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे आरोप होत आहेत. मात्र देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची वेगळी आवश्यकता नाही. देश अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आले आहे, तेव्हापासून देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आरोपांशी आपण सहमत आहात का ?माझे हे स्पष्ट मत आहे की देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची अजिबा आवश्यकता नाही. संविधानातील सर्व तत्त्वेदेखील हिंदू धर्मातीलच आहेत. असे एक तरी तत्व दाखवून द्या, जे हिंदू धर्मातील नाही. आपले संविधान व हिंदू धर्म यात काहीच फरक नाही. हिंदू राष्ट्राबाबत बोलणे म्हणजेच संविधानानुसार भारतातील प्रणाली चालविणे असेच आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना काही लोकांकडून ‘जुमला’ म्हणूनच वापरण्यात येत आहे.

आपल्या नजरेत सध्या देशाची परिस्थिती कशी आहे ?सद्यस्थितीत देश संक्रमण काळातून जात आहे. जो समाज विकासाकडे अग्रेसर असतो त्यात काही अडथळे येतातच. मागील ५०-६० वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. हिंदू समाज अस्पृश्यतेच्या जोखडातून बाहेर आला आहे. समाज बदलतो आहे. महिलादेखील स्वतंत्र व आत्मनिर्भर होत आहेत. हा निश्चितच ‘डार्क’ कालखंड नाही. जर कुणाला हा खराब कालखंड वाटत असेल तर तो त्याचा विचार आहे. अशा व्यक्तीला जाणुनबुजून विकास व बदल जाणून घ्यायचा नसेल.

काही माजी सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे की देशात अंध:कार युग आहे. यावर आपण काय म्हणाल ?काही निवृत्त सनदी अधिकारी देशात अंध:कार युग असल्याचा दावा करत आहेत. मात्र या व्यक्तींनी ३४ ते ४० वर्ष नोकरी केली. त्यावेळी त्यांनी प्रगती किंवा कायदा-सुव्यवस्था याचा विचार का केला नाही? ती त्यांची जबाबदारी नव्हती का ? यातील अनेक टीकाकार तर अंथरुणाला खिळले आहेत. उठूदेखील शकत नाही. तेथूनच ते प्रसिद्धीसाठी वाट्टेल तशी वक्तव्ये देत आहेत.

अगोदर आपण न्यायमूर्ती म्हणून निष्पक्ष व निर्विकार होता. मात्र आता एका विशिष्ट विचारधारेशी जुळला आहात. हे कसे काय ?मी अगोदर न्यायमूर्ती होतो व आता विशिष्ट विचारधारेशी जुळलो आहे, यावर अनेकांना आक्षेप आहेत. कुठलीही व्यक्ती निष्पक्ष नसते, प्रत्येक व्यक्तीचे आपले विचार असतात. परंतु संवैधिनिक पदांवर काम करता असताना ते विचार कामाच्या आड येऊ दिले जात नाहीत. जर एखादी व्यक्ती हिंदू विचारांनी प्रेरित आहे तर ती नेहमी न्यायच करेल. मी लहानपणापासूनच स्वयंसेवक आहे. मी न्यायमूर्ती झालो तेव्हादेखील लोकांना माझी विचारसरणी माहिती होती.

विहिंपला एक आक्रमक संघटना म्हणून संबोधण्यात येते. आपल्या हाती सूत्रे आल्यानंतरदेखील विहिंपचा हा स्वभाव कायम राहील का ?विहिंपला आक्रमक संघटना असे संबोधण्यात येते. मुळात हिंदुत्व आणि आक्रमकता या दोन्ही बाबी परस्परविरोधी आहेत. जो कट्टर हिंदू असतो तो आक्रमक कधीच नसतो. विहिंपवर आक्रमकतेचे आरोप लावणे अयोग्य आहे. आमची विचारधारा शांततेची आहे.

 राममंदिराचे निर्माण झाले पाहिजे हाच विहिंपचा सर्वात मोठा अजेंडा आहे का ?राममंदिर अयोध्येतील नियोजित स्थळीच होणार हा आम्हाला विश्वास आहे. न्यायालयातदेखील आमच्याच बाजूने निकाल येईल. मात्र आमच्या अजेंड्यावर केवळ राममंदिरच नाही. विहिंपची स्थापना १९६४ साली झाली व तेव्हा तर राममंदिराचा मुद्दा नव्हताच. रामजन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी, काशी येथे झालेल्या अतिक्रमणाला पाहून समाजातील लोक दु:खी होत होते व त्यांच्या भावनेतूनच राममंदिराची मागणी समोर आली.

टॅग्स :Hinduismहिंदुइझम