शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भारत हिंदू राष्ट्रच आहे आणि राहिलही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:08 IST

देश अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देविष्णू कोकजे यांचा लोकमतशी संवाददेश संक्रमण काळातून जातोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे आरोप होत आहेत. मात्र देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची वेगळी आवश्यकता नाही. देश अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आले आहे, तेव्हापासून देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आरोपांशी आपण सहमत आहात का ?माझे हे स्पष्ट मत आहे की देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची अजिबा आवश्यकता नाही. संविधानातील सर्व तत्त्वेदेखील हिंदू धर्मातीलच आहेत. असे एक तरी तत्व दाखवून द्या, जे हिंदू धर्मातील नाही. आपले संविधान व हिंदू धर्म यात काहीच फरक नाही. हिंदू राष्ट्राबाबत बोलणे म्हणजेच संविधानानुसार भारतातील प्रणाली चालविणे असेच आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना काही लोकांकडून ‘जुमला’ म्हणूनच वापरण्यात येत आहे.

आपल्या नजरेत सध्या देशाची परिस्थिती कशी आहे ?सद्यस्थितीत देश संक्रमण काळातून जात आहे. जो समाज विकासाकडे अग्रेसर असतो त्यात काही अडथळे येतातच. मागील ५०-६० वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. हिंदू समाज अस्पृश्यतेच्या जोखडातून बाहेर आला आहे. समाज बदलतो आहे. महिलादेखील स्वतंत्र व आत्मनिर्भर होत आहेत. हा निश्चितच ‘डार्क’ कालखंड नाही. जर कुणाला हा खराब कालखंड वाटत असेल तर तो त्याचा विचार आहे. अशा व्यक्तीला जाणुनबुजून विकास व बदल जाणून घ्यायचा नसेल.

काही माजी सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे की देशात अंध:कार युग आहे. यावर आपण काय म्हणाल ?काही निवृत्त सनदी अधिकारी देशात अंध:कार युग असल्याचा दावा करत आहेत. मात्र या व्यक्तींनी ३४ ते ४० वर्ष नोकरी केली. त्यावेळी त्यांनी प्रगती किंवा कायदा-सुव्यवस्था याचा विचार का केला नाही? ती त्यांची जबाबदारी नव्हती का ? यातील अनेक टीकाकार तर अंथरुणाला खिळले आहेत. उठूदेखील शकत नाही. तेथूनच ते प्रसिद्धीसाठी वाट्टेल तशी वक्तव्ये देत आहेत.

अगोदर आपण न्यायमूर्ती म्हणून निष्पक्ष व निर्विकार होता. मात्र आता एका विशिष्ट विचारधारेशी जुळला आहात. हे कसे काय ?मी अगोदर न्यायमूर्ती होतो व आता विशिष्ट विचारधारेशी जुळलो आहे, यावर अनेकांना आक्षेप आहेत. कुठलीही व्यक्ती निष्पक्ष नसते, प्रत्येक व्यक्तीचे आपले विचार असतात. परंतु संवैधिनिक पदांवर काम करता असताना ते विचार कामाच्या आड येऊ दिले जात नाहीत. जर एखादी व्यक्ती हिंदू विचारांनी प्रेरित आहे तर ती नेहमी न्यायच करेल. मी लहानपणापासूनच स्वयंसेवक आहे. मी न्यायमूर्ती झालो तेव्हादेखील लोकांना माझी विचारसरणी माहिती होती.

विहिंपला एक आक्रमक संघटना म्हणून संबोधण्यात येते. आपल्या हाती सूत्रे आल्यानंतरदेखील विहिंपचा हा स्वभाव कायम राहील का ?विहिंपला आक्रमक संघटना असे संबोधण्यात येते. मुळात हिंदुत्व आणि आक्रमकता या दोन्ही बाबी परस्परविरोधी आहेत. जो कट्टर हिंदू असतो तो आक्रमक कधीच नसतो. विहिंपवर आक्रमकतेचे आरोप लावणे अयोग्य आहे. आमची विचारधारा शांततेची आहे.

 राममंदिराचे निर्माण झाले पाहिजे हाच विहिंपचा सर्वात मोठा अजेंडा आहे का ?राममंदिर अयोध्येतील नियोजित स्थळीच होणार हा आम्हाला विश्वास आहे. न्यायालयातदेखील आमच्याच बाजूने निकाल येईल. मात्र आमच्या अजेंड्यावर केवळ राममंदिरच नाही. विहिंपची स्थापना १९६४ साली झाली व तेव्हा तर राममंदिराचा मुद्दा नव्हताच. रामजन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी, काशी येथे झालेल्या अतिक्रमणाला पाहून समाजातील लोक दु:खी होत होते व त्यांच्या भावनेतूनच राममंदिराची मागणी समोर आली.

टॅग्स :Hinduismहिंदुइझम