शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

भारताला ‘एनजीओ’ची गरजच नाही

By admin | Updated: February 26, 2017 02:32 IST

स्वयंसेवी संस्था ज्यांना आम्ही आधुनिक भाषेत ‘एनजीओ’ म्हणतो त्यांची भारतीय समाजाला काहीच गरज नाही.

एस. गुरुमूर्ती : सेतूबंधन कार्यक्रमाचा समारोप नागपूर : स्वयंसेवी संस्था ज्यांना आम्ही आधुनिक भाषेत ‘एनजीओ’ म्हणतो त्यांची भारतीय समाजाला काहीच गरज नाही. कारण, दातृत्व हे भारतीयांच्या रक्तातच आहे. या देशातील ७९ टक्के कुटुंबे आजच्या व्यावसायिक युगातही दानधर्म करतात. असे दान करणाऱ्या २५ टक्के कुटुंबांचे मासिक उत्पन्न आठ हजारांपेक्षाही कमी आहे, असे विचार ज्येष्ठ पत्रकार व अर्थततज्ज्ञ स्वामीनाथन गुरुमूर्ती यांनी व्यक्त केले. रेशीमबाग येथे आयोजित सेतूबंधन या कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विदर्भ वैभवचे अध्यक्ष हेमंत चाफले आणि उद्योजक हकिमुद्दीन अली उपस्थित होते. देशात वेगाने वाढणाऱ्या चुकीच्या प्रवृत्तीवर एस. गुरुमूर्ती यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, भारत हा गौरवशाली परंपरा लाभलेला देश आहे. परंतु आपल्या देशातीलच काही लोक आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात राजकीय पुढारी आणि आमच्या मीडियाचाही समावेश आहे. दिल्लीत निर्भया कांड घडले तेव्हा मीडियाने असे चित्र उभे केले जणू भारत ही बलात्काराची राजधानी बनली आहे. जेव्हा की भारताच्या तुलनेत कितीतरी अधिक बलात्काराच्या घटना अमेरिकेत होतात. परंतु तेथे अशा नकारात्मक बातम्यांना जागा दिली जात नाही. या देशात अनेक चांगल्या गोष्टी घडतात त्यांना अशी आक्रमक प्रसिद्धी दिली जात नाही, हे आमचे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ६० स्वयंसेवी संस्थांच्या कार्याबाबत गोळा केलेल्या माहितीची एक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. समाजहिताचे कार्य करणाऱ्या काही सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीचे धनादेशही पाहुण्यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.(प्रतिनिधी) कॉर्पोरेटस्चा पैसा व्हाया एनजीओ दहशतवाद्यांकडे भारतातील काही स्वयंसेवी संस्थांचे ध्येयच पैसा कमावणे आहे. त्यांना समाजहिताशी काही घेणेदेणे नाही. अशा संस्था कॉर्पोरेटस् संस्थांमधील काळा पैसा पांढरा करीत आहेत. ‘सीएसआर’च्या नावावर आर्थिक गैरव्यहार घडत आहेत. काही स्वयंसेवी संस्था तर हा पैसा कट्टरवाद व दहतवादाला खतपाणी घालणाऱ्या संस्थांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत, असा गंभीर आरोपही यावेळी एस. गुरुमूर्ती यांनी आपल्या भाषणात केला.