शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताला ‘एनजीओ’ची गरजच नाही

By admin | Updated: February 26, 2017 02:32 IST

स्वयंसेवी संस्था ज्यांना आम्ही आधुनिक भाषेत ‘एनजीओ’ म्हणतो त्यांची भारतीय समाजाला काहीच गरज नाही.

एस. गुरुमूर्ती : सेतूबंधन कार्यक्रमाचा समारोप नागपूर : स्वयंसेवी संस्था ज्यांना आम्ही आधुनिक भाषेत ‘एनजीओ’ म्हणतो त्यांची भारतीय समाजाला काहीच गरज नाही. कारण, दातृत्व हे भारतीयांच्या रक्तातच आहे. या देशातील ७९ टक्के कुटुंबे आजच्या व्यावसायिक युगातही दानधर्म करतात. असे दान करणाऱ्या २५ टक्के कुटुंबांचे मासिक उत्पन्न आठ हजारांपेक्षाही कमी आहे, असे विचार ज्येष्ठ पत्रकार व अर्थततज्ज्ञ स्वामीनाथन गुरुमूर्ती यांनी व्यक्त केले. रेशीमबाग येथे आयोजित सेतूबंधन या कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विदर्भ वैभवचे अध्यक्ष हेमंत चाफले आणि उद्योजक हकिमुद्दीन अली उपस्थित होते. देशात वेगाने वाढणाऱ्या चुकीच्या प्रवृत्तीवर एस. गुरुमूर्ती यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, भारत हा गौरवशाली परंपरा लाभलेला देश आहे. परंतु आपल्या देशातीलच काही लोक आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात राजकीय पुढारी आणि आमच्या मीडियाचाही समावेश आहे. दिल्लीत निर्भया कांड घडले तेव्हा मीडियाने असे चित्र उभे केले जणू भारत ही बलात्काराची राजधानी बनली आहे. जेव्हा की भारताच्या तुलनेत कितीतरी अधिक बलात्काराच्या घटना अमेरिकेत होतात. परंतु तेथे अशा नकारात्मक बातम्यांना जागा दिली जात नाही. या देशात अनेक चांगल्या गोष्टी घडतात त्यांना अशी आक्रमक प्रसिद्धी दिली जात नाही, हे आमचे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ६० स्वयंसेवी संस्थांच्या कार्याबाबत गोळा केलेल्या माहितीची एक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. समाजहिताचे कार्य करणाऱ्या काही सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीचे धनादेशही पाहुण्यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.(प्रतिनिधी) कॉर्पोरेटस्चा पैसा व्हाया एनजीओ दहशतवाद्यांकडे भारतातील काही स्वयंसेवी संस्थांचे ध्येयच पैसा कमावणे आहे. त्यांना समाजहिताशी काही घेणेदेणे नाही. अशा संस्था कॉर्पोरेटस् संस्थांमधील काळा पैसा पांढरा करीत आहेत. ‘सीएसआर’च्या नावावर आर्थिक गैरव्यहार घडत आहेत. काही स्वयंसेवी संस्था तर हा पैसा कट्टरवाद व दहतवादाला खतपाणी घालणाऱ्या संस्थांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत, असा गंभीर आरोपही यावेळी एस. गुरुमूर्ती यांनी आपल्या भाषणात केला.