शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अमेरिकेपुढे जाण्याची भारत, चीनला संधी, राष्ट्रसंघाचे सद्भावना राजदूत पवन सुखदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:48 IST

भारत आणि चीनसाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेपुढे जाण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे, असे मत राष्ट्रसंघाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाचे सद्भावना राजदूत पवन सुखदेव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- उदय अंधारे नागपूर : अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम पाहता भारत आणि चीनसाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेपुढे जाण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे, असे मत राष्ट्रसंघाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाचे सद्भावना राजदूत पवन सुखदेव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.नीरी येथील एका कार्यक्रमानिमित्त पवन सुखदेव येथे आले होते. ते म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान कराराची खिल्ली उडवणे चुकीचे आहे. पॅरिस कराराचे लक्ष्य गाठण्यासाठी भारत व चीन हे देश अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात ई-तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील अर्थव्यवस्थेचा सतत विकास होत जाईल. या करारातून बाहेर पडणे म्हणजे पेट्रोलियम उत्पादनांवर अवलंबून राहणे, होय. ही बाब देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी व विकासाचे लक्ष्य कठीण करण्यास कारणीभूत ठरेल असे सुखदेव यांनी सांगितले.पर्यावरण प्रदूषित करणाºया पारंपरिक पदार्थांपेक्षा ई-वेस्ट अधिक धोकादायक आहे काय, अशी विचारणा केली असता सुखदेव म्हणाले, सुमारे ७० टक्के ई-वेस्टपासून पुनर्निर्मिती करता येते. त्यामुळे पर्यावरण व हवामानावर त्याचा कमी परिणाम होतो. बुलडोजर व ट्रॅक्टर निर्मिती करणारी कॅटरपिलर कंपनी त्यांच्याकडील ७८ टक्के ई-वेस्टपासून पुनर्निर्मिती करीत आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी आपल्याला आता विविध समस्यांवर खर्चाला परवडणारे व दीर्घ काळ चालणारे उपाय शोधण्याची गरज आहे.