शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

पाकिस्तानप्रमाणे इंडिया आघाडीचा पराभव करू: रामदास आठवले

By आनंद डेकाटे | Updated: October 23, 2023 16:19 IST

संविधान बदलणार ही निव्वळ अफवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विरोधकांनी तयार केलेली इंडिया आघाडी ही मोदींना हरवण्याचे स्वप्न पााहत आहेत. परंतु त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. क्रिकेटच्या सामन्यात ज्याप्रमाणे भारत पाकिस्तानचा पराभव करतो. त्याचप्रमाणे आोेम्ही इंडिया आघाडीचाही पराभव करू, असा विश्वास रिपाइं (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला.

सोमवारी ते नागपुरात आले असता रविभवन येथे पत्रपरिषदेत बोलत होते. आठवले म्हणाले, विरोधी पक्षाच्या आघाडीला इंडिया नाव देणे योग्य नाही. आमच्या पक्षाच्या नावातही इंडिया शब्द आहे. त्यामुळे त्यांनी हा शब्द वापरू नये, अशी आमची मागणी असून त्यासंदर्भात न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. इंडिया आघाडीत सर्वच नेते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. प्रत्येकालाच पंतप्रधान व्हायचे त्यामुळे त्यांच्यातच एकवाक्यता नाही. संविधान बदलणार ही निव्वळ अफवा आहे. विरोध पक्ष ही अफवा जाणीवपूर्वक पसरवत आहे, असेही ते म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला आहे. तो तातडीने व्हावा आणि त्यात आमच्या पक्षालाही एक मंत्रीपद मिळावे. यासोबतच दोन महामंडळ व कमिट्यांची नियुक्ती सुद्धा लवकरात लवकर व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, दयाल बहादुरे. एड. विजय आगलावे, राजन वाघमारे, विनोद थुल उपस्थित होते.

- प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय रिपाइं ऐक्य अशक्यरिपाइंचे एक्य व्हावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. अनेकदा तो प्रयत्नही झाला. परंतु प्रकाश आंबेड़कर यांच्याशिवाय रिपाइंचे एक्य शक्य नाही. त्यांना वगळून रिपाइंचे झालेले ऐक्य हे यशस्वी ठरत नाही, असा अनुभव आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून रिपाइंचे नेतृत्व स्वीकारावे. मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले