शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकासासाठी स्वतंत्र राज्याचीच गरज

By admin | Updated: October 11, 2015 03:17 IST

विदर्भ हा अनेक गोष्टींमध्ये मागासलेला आहे. रोजगार, कुपोषण आणि नक्षलवादी समस्यांनी ग्रस्त आहे.

बीआरएसपी लढा उभारणार : कस्तूरचंद पार्कवर नेत्यांचा निर्धार नागपूर : विदर्भ हा अनेक गोष्टींमध्ये मागासलेला आहे. रोजगार, कुपोषण आणि नक्षलवादी समस्यांनी ग्रस्त आहे. या समस्या आजही कायम आहेत. त्या केवळ विदर्भाचा विकास झाला नाही म्हणून. यातच शेतकरी आत्महत्यांनी तर विदर्भाच्या जखमा जागतिक पातळीवर पोहोचल्या आहेत. तेव्हा विदर्भाचा सर्वांगीण विकास हा स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा आम्ही तीव्रतेने लढणार आणि तो यशस्वीही करून दाखविणार, असा एल्गार बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या (बीआरएसपी) नेत्यांनी शनिवारी कस्तूरचंद पार्कवर केला. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि बामसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कांशीराम यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त कस्तूरचंद पार्कवर संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘विदर्भातील शेतकरी युवा बेरोजगार, महिला व कामगारांच्या समस्या स्वतंत्र विदर्भ राज्य : समर्थक -विरोधकांच्या भूमिका व उपाय’ या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने उपस्थित होते. सिद्धार्थ पाटील म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आजवर अनेक आंदोलने झालीत. परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही. कारण प्रत्येक आंदोलन हे प्रामाणिकपणे लढलेच गेले नाही. पक्षातून विस्थापित झाल्यावर स्थापित होण्यासाठीच विदर्भ आंदोलनाचा वापर आजवर विविध नेत्यांनी आपापल्यापरीने केला. जोपर्यंत आंबेडकरी समाजासह एकूणच दलित, आदिवासी व मुस्लीम समाज या आंदोलनात सहभागी होत नाही, तोपर्यंत विदर्भाचे आंदोलन हे यशस्वी होऊच शकत नाही हे वास्तव आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात किशोर गजभिये यांनी विदर्भातील विविध समस्यांवर प्रकाश टाकत विदर्भात विविध क्षेत्राचा बॅकलॉग आकडेवारीसह सादर करीत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी हे आंदोलन लावून धरेल आणि आपण स्वतंत्र विदर्भ घेऊच, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुल अन्विकर यांनी संगीतमय प्रबोधन केले. याप्रसंगी अहमद कादर, भूपेंद्र रायपुरे, तौफिक मौलवी, सर्वजित बनसोडे, रमेश जनबंधू आदींनीही मार्गदर्शन केले. समशेर खा पठाण, सुनील खोब्रागडे, असलम खान, विजय तायडे, चेतन पेंदाम, मिलिंद अहीरे, राजेश बोरकर आदी उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. मिलिंद मेश्राम यांनी केले. विशेष फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)