शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

विदर्भ विकासासाठी स्वतंत्र राज्याचीच गरज

By admin | Updated: October 11, 2015 03:17 IST

विदर्भ हा अनेक गोष्टींमध्ये मागासलेला आहे. रोजगार, कुपोषण आणि नक्षलवादी समस्यांनी ग्रस्त आहे.

बीआरएसपी लढा उभारणार : कस्तूरचंद पार्कवर नेत्यांचा निर्धार नागपूर : विदर्भ हा अनेक गोष्टींमध्ये मागासलेला आहे. रोजगार, कुपोषण आणि नक्षलवादी समस्यांनी ग्रस्त आहे. या समस्या आजही कायम आहेत. त्या केवळ विदर्भाचा विकास झाला नाही म्हणून. यातच शेतकरी आत्महत्यांनी तर विदर्भाच्या जखमा जागतिक पातळीवर पोहोचल्या आहेत. तेव्हा विदर्भाचा सर्वांगीण विकास हा स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा आम्ही तीव्रतेने लढणार आणि तो यशस्वीही करून दाखविणार, असा एल्गार बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या (बीआरएसपी) नेत्यांनी शनिवारी कस्तूरचंद पार्कवर केला. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि बामसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कांशीराम यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त कस्तूरचंद पार्कवर संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘विदर्भातील शेतकरी युवा बेरोजगार, महिला व कामगारांच्या समस्या स्वतंत्र विदर्भ राज्य : समर्थक -विरोधकांच्या भूमिका व उपाय’ या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने उपस्थित होते. सिद्धार्थ पाटील म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आजवर अनेक आंदोलने झालीत. परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही. कारण प्रत्येक आंदोलन हे प्रामाणिकपणे लढलेच गेले नाही. पक्षातून विस्थापित झाल्यावर स्थापित होण्यासाठीच विदर्भ आंदोलनाचा वापर आजवर विविध नेत्यांनी आपापल्यापरीने केला. जोपर्यंत आंबेडकरी समाजासह एकूणच दलित, आदिवासी व मुस्लीम समाज या आंदोलनात सहभागी होत नाही, तोपर्यंत विदर्भाचे आंदोलन हे यशस्वी होऊच शकत नाही हे वास्तव आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात किशोर गजभिये यांनी विदर्भातील विविध समस्यांवर प्रकाश टाकत विदर्भात विविध क्षेत्राचा बॅकलॉग आकडेवारीसह सादर करीत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी हे आंदोलन लावून धरेल आणि आपण स्वतंत्र विदर्भ घेऊच, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुल अन्विकर यांनी संगीतमय प्रबोधन केले. याप्रसंगी अहमद कादर, भूपेंद्र रायपुरे, तौफिक मौलवी, सर्वजित बनसोडे, रमेश जनबंधू आदींनीही मार्गदर्शन केले. समशेर खा पठाण, सुनील खोब्रागडे, असलम खान, विजय तायडे, चेतन पेंदाम, मिलिंद अहीरे, राजेश बोरकर आदी उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. मिलिंद मेश्राम यांनी केले. विशेष फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)