शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:19 IST

राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल.

ठळक मुद्देभूषणकुमार उपाध्याय : सरकारी फंडातून होणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल. त्यात प्रशिक्षित मनुष्यबळ असेल. या यंत्रणेवर केला जाणारा खर्च शासनाकडून मिळणाºया फंडातून केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांना दिली.डॉ. उपाध्याय गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आहेत. भायखळा कारागृहात मंजुळा शेट्ये तसेच त्यानंतर नागपूर कारागृहात आयुष पुगलियाच्या हत्याकांडाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली.विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या खतरनाक गुन्हेगारांना सांभाळण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनावर असते. कोणत्या गुन्हेगाराच्या मनात काय सुरू आहे, ते कळणे शक्य नाही. प्रत्येक गुन्हेगारावर लक्ष ठेवणे अपुºया मनुष्यबळामुळे शक्य होत नाही. त्यामुळे अशा घटनांवर किंवा नेहमी होणाºया हाणामाºयांवर लक्ष ठेवणे शक्य नाही. हे सर्व लक्षात घेता पोलिसांप्रमाणेच कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारण्याची तयारी चालविली आहे. सध्या कारागृह प्रशासनात कैद्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि त्यांना सांभाळण्याची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचाºयांचे संख्याबळ फारच तोकडे आहे. सुरक्षेच्या मानकानुसार सात कैद्यांना सांभाळण्यासाठी एक सुरक्षा रक्षक असावा. मात्र, सध्या एक सुरक्षा रक्षक २० ते २५ कैद्यांना सांभाळत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कारागृहातील कैद्यांच्या भानगडींवर लक्ष ठेवणे शक्य नाही. अशा स्थितीत गुप्तचर यंत्रणेसाठी स्वतंत्र आणि प्रशिक्षित कर्मचारीच नेमावे लागणार आहे. त्यासाठी येणारा खर्च सरकारने उपलब्ध करून द्यावा, असा विनंतीवजा प्रस्ताव आम्ही सरकारला पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असून, लवकरच राज्यातील कारागृहात गुप्तचर यंत्रणा कार्यरत होणार आहे. कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांमधील वाद तसेच अन्य प्रकारावर ही यंत्रणा लक्ष ठेवेल. तसा दैनंदिन अहवाल ते कारागृह प्रशासनाला कळवतील. त्यामुळे कारागृहात घडू पाहणारे संभाव्य गुन्हे टाळता येतील, असेही ते म्हणाले.अनेक गुन्हे टळलेप्रायोगिक स्तरावर काही कारागृहात गुप्तचर पेरण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हे टळल्याचा दावाही डॉ. उपाध्याय यांनी केला. हे गुन्हे टळल्यामुळे ते चर्चेला आले नाही, असे सांगतानाच घटना घडल्या की त्याची चर्चा होते, मात्र घटना घडलीच नाही तर त्याची चर्चा होण्याचा प्रश्नच नाही, अशी पुष्टी त्यांनी आपल्या दाव्याला जोडली.सुरक्षेसाठी प्लास्टिकचा वापरमंजुळा शेट्येची हत्या झाली मात्र काही कटकारस्थान करून झालेली नाही. अचानक घडलेली ही घटना आहे. काही अधिकारी-कर्मचाºयांच्या चुकीमुळे हे घडले, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. यापुढे असा प्रकार घडणार नाही, त्यासाठी आम्ही समुपदेशनावर भर देणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.आयुष पुगलियाची हत्या आणि अन्य काही ठिकाणी झालेल्या हाणामाºयात कैद्यांनी अ‍ॅल्युमिनियमच्या ताटाचा, अन्य भांड्याचा शस्त्रासारखा वापर केला आहे. ते लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये आता कैद्यांना जेवणासाठी ताट (प्लेट) आणि वाट्या तसेच ग्लासदेखील प्लास्टिकचेच वापरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.