शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:19 IST

राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल.

ठळक मुद्देभूषणकुमार उपाध्याय : सरकारी फंडातून होणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल. त्यात प्रशिक्षित मनुष्यबळ असेल. या यंत्रणेवर केला जाणारा खर्च शासनाकडून मिळणाºया फंडातून केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांना दिली.डॉ. उपाध्याय गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आहेत. भायखळा कारागृहात मंजुळा शेट्ये तसेच त्यानंतर नागपूर कारागृहात आयुष पुगलियाच्या हत्याकांडाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली.विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या खतरनाक गुन्हेगारांना सांभाळण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनावर असते. कोणत्या गुन्हेगाराच्या मनात काय सुरू आहे, ते कळणे शक्य नाही. प्रत्येक गुन्हेगारावर लक्ष ठेवणे अपुºया मनुष्यबळामुळे शक्य होत नाही. त्यामुळे अशा घटनांवर किंवा नेहमी होणाºया हाणामाºयांवर लक्ष ठेवणे शक्य नाही. हे सर्व लक्षात घेता पोलिसांप्रमाणेच कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारण्याची तयारी चालविली आहे. सध्या कारागृह प्रशासनात कैद्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि त्यांना सांभाळण्याची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचाºयांचे संख्याबळ फारच तोकडे आहे. सुरक्षेच्या मानकानुसार सात कैद्यांना सांभाळण्यासाठी एक सुरक्षा रक्षक असावा. मात्र, सध्या एक सुरक्षा रक्षक २० ते २५ कैद्यांना सांभाळत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कारागृहातील कैद्यांच्या भानगडींवर लक्ष ठेवणे शक्य नाही. अशा स्थितीत गुप्तचर यंत्रणेसाठी स्वतंत्र आणि प्रशिक्षित कर्मचारीच नेमावे लागणार आहे. त्यासाठी येणारा खर्च सरकारने उपलब्ध करून द्यावा, असा विनंतीवजा प्रस्ताव आम्ही सरकारला पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असून, लवकरच राज्यातील कारागृहात गुप्तचर यंत्रणा कार्यरत होणार आहे. कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांमधील वाद तसेच अन्य प्रकारावर ही यंत्रणा लक्ष ठेवेल. तसा दैनंदिन अहवाल ते कारागृह प्रशासनाला कळवतील. त्यामुळे कारागृहात घडू पाहणारे संभाव्य गुन्हे टाळता येतील, असेही ते म्हणाले.अनेक गुन्हे टळलेप्रायोगिक स्तरावर काही कारागृहात गुप्तचर पेरण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हे टळल्याचा दावाही डॉ. उपाध्याय यांनी केला. हे गुन्हे टळल्यामुळे ते चर्चेला आले नाही, असे सांगतानाच घटना घडल्या की त्याची चर्चा होते, मात्र घटना घडलीच नाही तर त्याची चर्चा होण्याचा प्रश्नच नाही, अशी पुष्टी त्यांनी आपल्या दाव्याला जोडली.सुरक्षेसाठी प्लास्टिकचा वापरमंजुळा शेट्येची हत्या झाली मात्र काही कटकारस्थान करून झालेली नाही. अचानक घडलेली ही घटना आहे. काही अधिकारी-कर्मचाºयांच्या चुकीमुळे हे घडले, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. यापुढे असा प्रकार घडणार नाही, त्यासाठी आम्ही समुपदेशनावर भर देणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.आयुष पुगलियाची हत्या आणि अन्य काही ठिकाणी झालेल्या हाणामाºयात कैद्यांनी अ‍ॅल्युमिनियमच्या ताटाचा, अन्य भांड्याचा शस्त्रासारखा वापर केला आहे. ते लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये आता कैद्यांना जेवणासाठी ताट (प्लेट) आणि वाट्या तसेच ग्लासदेखील प्लास्टिकचेच वापरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.