शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी; केंद्र सरकारचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 12:10 IST

महाराष्ट्राला कावळे कमिटीच्या अहवालाची प्रतीक्षा

कमल शर्मा

नागपूर : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या सातत्याने वाढणाऱ्या वीज बिलाच्या थकबाकीने चिंतेत असलेल्या केंद्र सरकारने आता कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज वितरण कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये सुधारित बिल आणण्याची तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात या दिशेने आधीच सुरुवात झालेली आहे.

कृषी ग्राहकांच्या समस्यांसदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने माजी ऊर्जा सचिव जयंत कावळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठण केले होते. या समितीला स्वतंत्र कंपनीबाबतही विचार करायचा होता. माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे म्हणणे आहे की, विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळी वीज वितरण कंपनी गठीत करण्याचा त्यांचा विचार होता. नंतर सत्ता परिवर्तन झाले. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने कावळे समितीला मुदतवाढ दिली आहे. सरकार समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या समितीच्या अहवालानंतर स्वतंत्र कंपनीच्या विचाराला गती दिली जाईल.

महाराष्ट्रातील ४२ लाखांपेक्षा अधिक कृषी ग्राहकांवर ४५,७०० कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. यासोबतच केंद्र सरकारची सर्वांनाच कृषी कनेक्शनला मीटर देण्याची तयारी आहे.

कामगार संघटनांचा विरोध

ऊर्जा क्षेत्रातील कामगार संघटनांनी मात्र कृषीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास विरोध दर्शविला आहे. वर्कर्स फेडरेशनचे मोहन शर्मा व कृष्णा भोयर यांनी सांगितले की, वितरण यंत्रणेचे खासगीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. तोट्यातील कंपनी सरकार चालवेल आणि नफा कमावणारी कंपनी खासगी क्षेत्राच्या वाट्याला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना सबसिडीचा लाभ देणेही कठीण होईल. कामगार संघटनांनी केंद्र सरकारला पत्र लिहून याला विरोध दर्शविला आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीजCentral Governmentकेंद्र सरकार