शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी; केंद्र सरकारचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 12:10 IST

महाराष्ट्राला कावळे कमिटीच्या अहवालाची प्रतीक्षा

कमल शर्मा

नागपूर : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या सातत्याने वाढणाऱ्या वीज बिलाच्या थकबाकीने चिंतेत असलेल्या केंद्र सरकारने आता कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज वितरण कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये सुधारित बिल आणण्याची तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात या दिशेने आधीच सुरुवात झालेली आहे.

कृषी ग्राहकांच्या समस्यांसदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने माजी ऊर्जा सचिव जयंत कावळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठण केले होते. या समितीला स्वतंत्र कंपनीबाबतही विचार करायचा होता. माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे म्हणणे आहे की, विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळी वीज वितरण कंपनी गठीत करण्याचा त्यांचा विचार होता. नंतर सत्ता परिवर्तन झाले. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने कावळे समितीला मुदतवाढ दिली आहे. सरकार समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या समितीच्या अहवालानंतर स्वतंत्र कंपनीच्या विचाराला गती दिली जाईल.

महाराष्ट्रातील ४२ लाखांपेक्षा अधिक कृषी ग्राहकांवर ४५,७०० कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. यासोबतच केंद्र सरकारची सर्वांनाच कृषी कनेक्शनला मीटर देण्याची तयारी आहे.

कामगार संघटनांचा विरोध

ऊर्जा क्षेत्रातील कामगार संघटनांनी मात्र कृषीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास विरोध दर्शविला आहे. वर्कर्स फेडरेशनचे मोहन शर्मा व कृष्णा भोयर यांनी सांगितले की, वितरण यंत्रणेचे खासगीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. तोट्यातील कंपनी सरकार चालवेल आणि नफा कमावणारी कंपनी खासगी क्षेत्राच्या वाट्याला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना सबसिडीचा लाभ देणेही कठीण होईल. कामगार संघटनांनी केंद्र सरकारला पत्र लिहून याला विरोध दर्शविला आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीजCentral Governmentकेंद्र सरकार