शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Independence Day 2018; स्वातंत्र्यदिनी जन्मलेले झाड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 11:04 IST

शहरातील मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटचा परिसर. येथील तंत्र सहसंचालक कार्यालय परिसरात ब्रिटिश रेसिडेंटची इमारत होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी येथे स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील काही वृक्ष आजही डोलात उभे आहेत.

ठळक मुद्देअन् इतिहास उलगडला तो हिरवा जोश अद्यापही कायम

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटचा परिसर. येथील तंत्र सहसंचालक कार्यालय परिसरात ब्रिटिश रेसिडेंटची इमारत होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी येथे स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील काही वृक्ष आजही डोलात उभे आहेत. त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दांत.एक नवं झाड दुसऱ्या अनुभवी वृक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतं. अनेक उन्हाळे-पावसाळे बघितलेल्या वृक्षाच्या ते लक्षातच आलं नाही, म्हणून ते शांतच! तोच वाऱ्याची झुळूक आली. त्याची पानं हलली. मॉरिस कॉलेजच्या टी-पॉर्इंटजवळ एक सत्तरी गाठलेला वृद्ध सायकलवर तिरंगा विकताना दिसला. तोच त्या सिनिअर वृक्षाला एकदम ‘क्लिक’ झालं. एवढ्या वर्षांत कुणीच कशा आपल्याला शुभेच्छा दिल्या नाहीत, साधी आठवणही काढली नाही... त्याला आश्चर्यच वाटलं. ७१ वर्षांपूर्वींचा जन्माचा काळ आठवला. ‘इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय’च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या... १५ आॅगस्ट १९४७! स्वातंत्र्यदिन! पानांची सळसळ अधिकच वाढली.वृक्ष सांगू लागला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. १५ आॅगस्ट १९४७ रोजी या परिसरात वृक्षारोपण करण्याचं ठरलं. तोरण-पताकांनी हा परिसर सजला. सत्तेचं प्रतीक असलेल्या इंग्रज रेसिडेन्सी इमारतीसमोरच वृक्षारोपण करण्यात येणार होतं. त्यावेळी मॉरिस कॉलेजचे संचालक सिन्हा नावाचे गृहस्थ होते. त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. वृक्षारोपण ‘प्रधानमंत्री’ पंडित रविशंकर शुक्ला (त्यावेळी मुख्यमंत्र्यांना ‘प्रधानमंत्री’ म्हटले जात) यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रम सुरू झाला. एक एक रोपटं लावलं जात होतं. त्यात माझाही समावेश होता.त्या रेसिडेन्सी इमारतीसमोर आम्ही सर्वच होतो. ‘भारत माता की जय’, ‘महात्मा गांधी की जय’ असा जयघोष सुरू होता. स्वातंत्र्यदिनाच्या त्या पहिल्या कार्यक्रमाचे आम्ही साक्षीदार होतो. त्या काळी हा भाग वर्दळीचा होता. इमारतीसमोरील उद्यान विविध फुलांच्या ताटव्यांनी भरलेलं असायचं. कारंजी थुईथुई करीत असायची. टी-पॉर्इंट परिसर प्रशस्त होता. रांगेत झाडे लावण्यात आली होती. काही झाडे उद्यानातही लावण्यात आली. आज सर्वच बदललेले. रस्ता रुंदीकरणात काही झाडे तोडली गेली. काल-परवा मेट्रो रेल्वेच्या कामात झाडे तोडली. अनेक वर्षांपासून हा भाग सुनसान आहे. या शांततेत माझं ‘मीपण’ हरवल्यासारखं झालं आहे. आज या नव्या मित्रानं-एका नव्या झाडानं वाढदिवसाची आठवण करून दिली. म्हणून आठवणी ताज्या झाल्या. मित्रा, तुलाही स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस