शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

Independence Day 2018; स्वातंत्र्यदिनी जन्मलेले झाड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 11:04 IST

शहरातील मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटचा परिसर. येथील तंत्र सहसंचालक कार्यालय परिसरात ब्रिटिश रेसिडेंटची इमारत होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी येथे स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील काही वृक्ष आजही डोलात उभे आहेत.

ठळक मुद्देअन् इतिहास उलगडला तो हिरवा जोश अद्यापही कायम

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटचा परिसर. येथील तंत्र सहसंचालक कार्यालय परिसरात ब्रिटिश रेसिडेंटची इमारत होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी येथे स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यातील काही वृक्ष आजही डोलात उभे आहेत. त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दांत.एक नवं झाड दुसऱ्या अनुभवी वृक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतं. अनेक उन्हाळे-पावसाळे बघितलेल्या वृक्षाच्या ते लक्षातच आलं नाही, म्हणून ते शांतच! तोच वाऱ्याची झुळूक आली. त्याची पानं हलली. मॉरिस कॉलेजच्या टी-पॉर्इंटजवळ एक सत्तरी गाठलेला वृद्ध सायकलवर तिरंगा विकताना दिसला. तोच त्या सिनिअर वृक्षाला एकदम ‘क्लिक’ झालं. एवढ्या वर्षांत कुणीच कशा आपल्याला शुभेच्छा दिल्या नाहीत, साधी आठवणही काढली नाही... त्याला आश्चर्यच वाटलं. ७१ वर्षांपूर्वींचा जन्माचा काळ आठवला. ‘इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय’च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या... १५ आॅगस्ट १९४७! स्वातंत्र्यदिन! पानांची सळसळ अधिकच वाढली.वृक्ष सांगू लागला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. १५ आॅगस्ट १९४७ रोजी या परिसरात वृक्षारोपण करण्याचं ठरलं. तोरण-पताकांनी हा परिसर सजला. सत्तेचं प्रतीक असलेल्या इंग्रज रेसिडेन्सी इमारतीसमोरच वृक्षारोपण करण्यात येणार होतं. त्यावेळी मॉरिस कॉलेजचे संचालक सिन्हा नावाचे गृहस्थ होते. त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. वृक्षारोपण ‘प्रधानमंत्री’ पंडित रविशंकर शुक्ला (त्यावेळी मुख्यमंत्र्यांना ‘प्रधानमंत्री’ म्हटले जात) यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रम सुरू झाला. एक एक रोपटं लावलं जात होतं. त्यात माझाही समावेश होता.त्या रेसिडेन्सी इमारतीसमोर आम्ही सर्वच होतो. ‘भारत माता की जय’, ‘महात्मा गांधी की जय’ असा जयघोष सुरू होता. स्वातंत्र्यदिनाच्या त्या पहिल्या कार्यक्रमाचे आम्ही साक्षीदार होतो. त्या काळी हा भाग वर्दळीचा होता. इमारतीसमोरील उद्यान विविध फुलांच्या ताटव्यांनी भरलेलं असायचं. कारंजी थुईथुई करीत असायची. टी-पॉर्इंट परिसर प्रशस्त होता. रांगेत झाडे लावण्यात आली होती. काही झाडे उद्यानातही लावण्यात आली. आज सर्वच बदललेले. रस्ता रुंदीकरणात काही झाडे तोडली गेली. काल-परवा मेट्रो रेल्वेच्या कामात झाडे तोडली. अनेक वर्षांपासून हा भाग सुनसान आहे. या शांततेत माझं ‘मीपण’ हरवल्यासारखं झालं आहे. आज या नव्या मित्रानं-एका नव्या झाडानं वाढदिवसाची आठवण करून दिली. म्हणून आठवणी ताज्या झाल्या. मित्रा, तुलाही स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस