शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अद्ययावत जळित कक्षाअभावी मृत्यूचा वाढतोय धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:48 IST

जळालेल्या रुग्णांवर प्रभावी उपचारासाठी मेडिकलच्या जळीत कक्षात पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नाहीत. हा कक्ष अद्ययावत करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षी ९४ जळालेल्या रुग्णांचा मृत्यू ‘नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट आॅफ बर्न इन्जुरिज’ प्रकल्पाची प्रतीक्षा

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जळालेल्या रुग्णांवर प्रभावी उपचारासाठी मेडिकलच्या जळीत कक्षात पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नाहीत. हा कक्ष अद्ययावत करण्याची गरज आहे. या संदर्भात आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०१७ मध्ये ‘नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट आॅफ बर्न इन्जुरिज’ या प्रकल्पास मान्यता दिली. या प्रकल्पासाठी ३.११४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यातील ६० टक्के वाटा केंद्राने तर ४० टक्के वाटा राज्य शासनाने उचलायचा आहे. मात्र वर्षे होऊनही या प्रकल्पाला घेऊन केंद्र व राज्य शासन यांच्यातील करार रखडलेलाच आहे. परिणामी, अद्ययावत जळीत कक्षाअभावी रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका वाढतो आहे. गेल्या वर्षी मेडिकलमध्ये ९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.उन्हाळ्याच्याच दिवसात नव्हे तर दिवाळी व इतरही दिवसांत मेडिकलमध्ये जळालेले रुग्ण मोठ्या संख्येत येतात. यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड नाही. शल्यचिकित्सा विभागाच्या वॉर्ड क्र. ४ मध्येच या रुग्णांची सोय करण्यात आली आहे. एकाच वॉर्डात पुरुष, महिला व लहान मुलांना ठेवले जाते. जळाल्यामुळे झालेल्या जखमांची खूप आग होते, हवेची हलकी झुळूकही या जखमांवरून गेली की वेदनेचा स्फोट होतो. यामुळे या वॉर्डात कायम किंकाळ्या, आक्र ोश पाहायला मिळतात. अशा वेळी नातेवाईकांनाही आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत थांबणे कठीण होऊन बसते. परिचारिका आणि डॉक्टरांनाही काम करणे सोयीचे होत नाही. याचा परिणाम इतर रुग्णांवरही पडतो. विशेष म्हणजे या रुग्णांना आवश्यक सोयीही येथे उपलब्ध नाही. यामुळे जंतू संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असते. अनेकवेळा या कारणांमुळे यांचा जीव वाचविण्यास डॉक्टरांचे प्रयत्नही अपुरे पडतात. जळालेल्या रु ग्णांची विशेष काळजी घ्यावी लागत असल्याने २०१७ मध्ये आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्लीने केंद्र शासनाच्या १२व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत ‘नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट आॅफ बर्न इन्जुरिज’ (एनपीपीएमबी) या प्रकल्पासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) निवड केली. या प्रकल्पासाठी ३.११४ कोटी रुपयांची तरतूदही केली. यातील ६० टक्के वाटा केंद्राने तर ४० टक्के वाटा राज्य शासनाने उचलायचा होता. या संदर्भात करार करण्यासाठी मेडिकल प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला आतापर्यंत चार वेळा प्रस्ताव पाठविले. परंतु अद्यापही करारच न झाल्याने प्रकल्पाच्या मार्गात खंड पडला आहे.

स्वतंत्र इमारत व ३५ मनुष्यबळ‘एनपीपीएमबी’ संदर्भात करार झाल्यास एक बर्न सर्जन, दोन बधिरीकरण तज्ज्ञ, चार वैद्यकीय अधिकारी, १२ परिचारिका, एक शस्त्रक्रिया कक्ष तंत्रज्ञ, दोन ड्रेसर्स, दहा मल्टीपल वर्कर्स, दोन मल्टीपल रिहॅबिलिटेशन व एक डाटा एन्ट्री असे मिळून ३५ मनुष्यबळ उपलब्ध होणार, शिवाय दोन मजल्याच्या स्वतंत्र इमारतीत तीन शस्त्रक्रियागृह, एक स्किन बँक असणार असल्याने जळालेल्या रुग्णांना अद्ययावत सोयी मिळतील.

प्रस्ताव पाठविला आहेकेंद्र शासनाशी संबंधित अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. ‘नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट आॅफ बर्न इन्जुरिज’ या प्रकल्पाशी संबंधित करार करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. लवकरच याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Nagpur Government Medical College and Hospitalनागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय