शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

समाजात जातीयवाद वाढतोय

By admin | Updated: October 1, 2014 00:50 IST

सध्याचा काळ हा गंभीर चिंतनाचा आहे की नाही, अशी शंका होऊ लागली आहे. सर्वकाही वरवर सुरू आहे. वादळामध्ये दिवा सांभाळण्याचा हा प्रयत्न वाटतो. परंतु तोच दिवा पुढे देशाला वाचवू शकेल.

स्व. भा. ल. भोळे स्मृती व्याख्यान : अमर हबीब यांचे प्रतिपादननागपूर : सध्याचा काळ हा गंभीर चिंतनाचा आहे की नाही, अशी शंका होऊ लागली आहे. सर्वकाही वरवर सुरू आहे. वादळामध्ये दिवा सांभाळण्याचा हा प्रयत्न वाटतो. परंतु तोच दिवा पुढे देशाला वाचवू शकेल. अलीकडे पूर्वीपेक्षा आंतरजातीय विवाह वाढले आहेत. परंतु त्याचवेळी जातीवादही वाढला आहे. सामाजिक बदलातील हा तिढा आज सोडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व आधार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भा. ल. भोळे स्मृतिप्रीत्यर्थ ‘सामाजिक बदलांचे नवे संदर्भ’ या विषयावर मंगळवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी होते. मंचावर आधार संस्थेचे अविनाश रोडे व विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे रमेश बोरकुटे उपस्थित होते. शंकरनगर चौकातील बाबुराव धनवटे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. हबीब पुढे म्हणाले, सध्या समाजात जो हा बदल घडत आहे. त्यामागे तशीच कारणेही आहेत. पूर्वी शेती हा कुटुंबाचा व्यवसाय होता. संयुक्त कुटुंब पद्घती होती. त्या स्थितीत आंतरजातीय विवाह कठीण होते. परंतु अलीकडे कामाचे स्वरूप बदलले आहे. तरुण-तरुणी एकत्र काम करू लागले आहेत. यातून त्यांना जोडीदार निवडण्याच्या संधी मिळत आहे. आणि म्हणूनच आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढत आहे. मात्र याचा अर्थ जातीयवाद कमी झाला असे म्हणता येणार नाही. जातीयवादी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. त्यांना आपली माणसे हातून जाण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे ते त्यांना हाताशी धरून ठेवण्यासाठी धडपड करीत आहे. परंतु त्याचवेळी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जाती, धर्म नष्ट करण्यासाठी अनुकूल वातावरणही तयार होऊ लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक शोषणाविषयी बोलताना, त्यांनी नवनिर्मिती करणारा हा नेहमीच शोषित राहिला असल्याचे ते म्हणाले. साहित्यातून नवनवीन कल्पना पुढे आल्या पाहिजे. परंतु अलीकडे या क्षेत्राला शिक्षिकी पेशाची वाळवी लागली असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. गिरीश गांधी यांनी अध्यक्षीय भाषणातून सध्या एकिकडे देशाचा विकास होत आहे, पण दुसरीकडे समाज चळवळीचाही विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. संचालन व आभार प्रदर्शन शुभदा फडणवीस यांनी केले.(प्रतिनिधी)