शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

बुबुळाच्या अंधत्वाचे प्रमाण वाढतेय

By admin | Updated: August 25, 2014 01:17 IST

जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबुळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे.

अशोक मदान यांची माहिती : उद्यापासून नेत्रदान पंधरवडा नागपूर : जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबुळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी अशा तीस हजार रुग्णांची भर पडत आहे. नागपुरातील एकट्या मेडिकल रुग्णालयात दरवर्षी ६० नवे रुग्ण आढळून येत आहेत. बुबुळाचे प्रत्यारोपण करून हे अंधत्व टाळता येते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) नेत्र विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी येथे दिली. नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकलच्यावतीने २५ आॅगस्टपासून पंधरवडा पाळला जाणार आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. मदान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, अंधत्व हे केवळ मोतीबिंदूमुळेच येते असे नाही, तर डोळयांना होणाऱ्या विविध आजारांमुळेही अंधत्व येऊ शकते. पारदर्शक पटल अपारदर्शक होणे हा आजार कोणत्याही वयाच्या म्हणजेच लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. डोळ्यांचे अपघात, डोळे येणे, अ-जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे, डोळ्यात कचरा किंवा रासायनिक पदार्थ गेला असल्यास इत्यादींमुळे पारदर्शक पटल खराब झाल्यास अंधत्व येऊ शकते. यावर बुबुळ प्रत्यारोपण करून अंधत्व दूर करता येते. परंतु भारतात दरवर्षी सुमारे ७५ लाख लोक मृत होऊनही फक्त पन्नास हजार नेत्रदान होतात. यातही फक्त १५ हजार बुबुळाचे प्रत्यारोपण होणे शक्य होते. याला कारण नेत्रदानाविषयी योग्य माहिती व जागरूकतेचा अभाव आहे. चांगली दृष्टी असणे हा आपल्या प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये, आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणे, ही काळाची गरज आहे. मरणोत्तर नेत्रदान करून अंध व्यक्तीच्या जीवनातील अंध:कार दूर करण्याचे पवित्र काम प्रत्येक जण करू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोेळ्याचा उपयोग दुसऱ्या अंध व्यक्तीला जग पाहण्यासाठी होत असेल, तर जगातून जाताना दोन अंध व्यक्तींना दृष्टीची अमूल्य भेट द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेत डॉ. दिलीप कुमरे व डॉ. मोना देशमुख उपस्थित होत्या.२२५ नेत्रपेढ्यांमधून ५१ सुरूराज्यात २२५ नेत्रपेढ्या आहेत, परंतु ५१ पेढ्या बंद आहेत. एकट्या नागपुरातील पाच बंद आहेत. मे २०१३ ते जून २०१४ या दरम्यान बुबुळ प्रत्यारोपणाच्या फक्त ६९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. नेत्रदानाची ही चळवळ राबविण्यासाठी शासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे नेत्ररोग विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)