शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बुबुळाच्या अंधत्वाचे प्रमाण वाढतेय

By admin | Updated: August 25, 2014 01:17 IST

जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबुळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे.

अशोक मदान यांची माहिती : उद्यापासून नेत्रदान पंधरवडा नागपूर : जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबुळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी अशा तीस हजार रुग्णांची भर पडत आहे. नागपुरातील एकट्या मेडिकल रुग्णालयात दरवर्षी ६० नवे रुग्ण आढळून येत आहेत. बुबुळाचे प्रत्यारोपण करून हे अंधत्व टाळता येते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) नेत्र विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी येथे दिली. नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकलच्यावतीने २५ आॅगस्टपासून पंधरवडा पाळला जाणार आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. मदान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, अंधत्व हे केवळ मोतीबिंदूमुळेच येते असे नाही, तर डोळयांना होणाऱ्या विविध आजारांमुळेही अंधत्व येऊ शकते. पारदर्शक पटल अपारदर्शक होणे हा आजार कोणत्याही वयाच्या म्हणजेच लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. डोळ्यांचे अपघात, डोळे येणे, अ-जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे, डोळ्यात कचरा किंवा रासायनिक पदार्थ गेला असल्यास इत्यादींमुळे पारदर्शक पटल खराब झाल्यास अंधत्व येऊ शकते. यावर बुबुळ प्रत्यारोपण करून अंधत्व दूर करता येते. परंतु भारतात दरवर्षी सुमारे ७५ लाख लोक मृत होऊनही फक्त पन्नास हजार नेत्रदान होतात. यातही फक्त १५ हजार बुबुळाचे प्रत्यारोपण होणे शक्य होते. याला कारण नेत्रदानाविषयी योग्य माहिती व जागरूकतेचा अभाव आहे. चांगली दृष्टी असणे हा आपल्या प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये, आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणे, ही काळाची गरज आहे. मरणोत्तर नेत्रदान करून अंध व्यक्तीच्या जीवनातील अंध:कार दूर करण्याचे पवित्र काम प्रत्येक जण करू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोेळ्याचा उपयोग दुसऱ्या अंध व्यक्तीला जग पाहण्यासाठी होत असेल, तर जगातून जाताना दोन अंध व्यक्तींना दृष्टीची अमूल्य भेट द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेत डॉ. दिलीप कुमरे व डॉ. मोना देशमुख उपस्थित होत्या.२२५ नेत्रपेढ्यांमधून ५१ सुरूराज्यात २२५ नेत्रपेढ्या आहेत, परंतु ५१ पेढ्या बंद आहेत. एकट्या नागपुरातील पाच बंद आहेत. मे २०१३ ते जून २०१४ या दरम्यान बुबुळ प्रत्यारोपणाच्या फक्त ६९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. नेत्रदानाची ही चळवळ राबविण्यासाठी शासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे नेत्ररोग विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)