शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ओझोनचा वाढलेला स्तर, फटाके, थंडीमुळे दमा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 20:11 IST

Nagpur News वातावरणातील बदल, वाढणारी थंडी, ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढणारे ओझोनचे प्रमाण, फटाके व अन्य वायुप्रदूषण अशा श्वसनरोगास कारणीभूत दमा (अस्थमा), सीओपीडी व अन्य फुप्फुस विकारांच्या रुग्णांना दुप्पट धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकाळजी न घेतल्यास श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये होणार वाढ

नागपूर : कोविडनंतर प्रथमच दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र, वातावरणातील बदल, वाढणारी थंडी, ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढणारे ओझोनचे प्रमाण, फटाके व अन्य वायुप्रदूषण अशा श्वसनरोगास कारणीभूत दमा (अस्थमा), सीओपीडी व अन्य फुप्फुस विकारांच्या रुग्णांना दुप्पट धोका निर्माण झाला आहे. या दरम्यान योग्य काळजी घेतली नाही तर नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी भीती ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केली.

दिवाळीनिमित्त घरातील साफसफाईसह रंगरंगोटी, अगरबत्ती, मेणबत्ती व दिव्यांच्या धुरामुळे सर्दी-खोकला व दम्याचा रुग्णांना याचा त्रास होतो. दमा व श्वसनविकार असलेल्यांनी या दुर्लक्षित प्रदूषणाबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. याशिवाय वातावरणातील प्रदूषण हे सातत्याने वाढत आहे. कारखाने व इंडस्ट्रीज, मोठी मोठी बांधकाम यामुळे कणांचे प्रदूषण वाढते. फुप्फुसांच्या आरोग्यासाठी हे हानिकारक असल्याचेही डॉ. अरबट म्हणाले.

- फटाक्यांचा धुराचा सर्वाधिक त्रास

फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड आणि अन्य विषारी वायू असतात. त्यामुळे सर्दी-खोकला, दमा, सीओपीडी, इंटरस्टेशियल लंग्स डिसिज, ज्यांना कोविड होऊन गेलाय असे रुग्ण, कोविड फायब्रोसिसचे रुग्ण, अशा फुप्फुसाची व श्वसनाशी संबंधित रुग्णांना सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे त्यांनी या धुरापासून दूर राहिले पाहिजे.

- ओझोन वायूचा वाढतो स्तर

सध्या वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. अधून-मधून ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे वातावरणात ओझोन वायूचा स्तर वाढतो. त्यामुळे डोळ्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसून येतात. पयार्याने त्याचे रूपांतर सर्दी-खोकला-ताप यामध्ये होते.

- श्वसनासंबंधी आजाराकडे लक्ष द्या 

जेव्हा ऋतू बदलतो, तेव्हा शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. या दरम्यान श्वसनाशी संबंधित आजार बळावतात. दम्यासह व्हायरल फीवर, ताप, अंगदुखी, सर्दी यांचेही प्रमाण वाढते. लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम पडतो. यामुळे वेळीच लक्ष देऊन काळजी घ्यावी.

- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ