शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मराठी साहित्य महामंडळाच्या प्रयत्नांमुळेच वाढले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:40 IST

शासन संमेलनासाठी जो २५ लाखांचा निधी देते त्यात मागच्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वस्तूत: आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम एक कोटी असायला हवी, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने या संपूर्ण पाठपुराव्याचा अभ्यास करून अनुदानाची ही रक्कम ५० लाख करण्याचा निर्णय घेतला व बडोदा संमेलनाच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली. हे वाढीव अनुदान पुढच्या वर्षीपासून दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे साहित्य महामंडळाने स्वागत केले असून हे अनुदान वाढविल्याबद्दल शासनाचे आभारही मानले आहेत.

ठळक मुद्देसातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश : मराठी साहित्य संमेलनाला मिळणार ५० लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या अनुदानात दुप्पटीने वाढ करीत पुढील वषार्पासून ते ५० लाख रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बडोदा येथे ९१ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात केली. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा मराठी साहित्य महामंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश आहे. राज्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या साहित्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, महागाईमुळे संमेलनासाठी २५ लाख पुरेसे नाही. त्यामुळे संमेलनाचे अनुदान वाढविण्यात यावे, असा प्रस्ताव महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारकडे पाठवला होता. परंतु त्यावर सुरुवातीला काहीच सकारात्मक प्रतिसाद लाभला नाही. पण, म्हणून महामंडळाने आपले प्रयत्न सोडले नाहीत. या प्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा करणारा पत्रव्यवहार सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी केला गेला. शासन संमेलनासाठी जो २५ लाखांचा निधी देते त्यात मागच्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वस्तूत: आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम एक कोटी असायला हवी, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने या संपूर्ण पाठपुराव्याचा अभ्यास करून अनुदानाची ही रक्कम ५० लाख करण्याचा निर्णय घेतला व बडोदा संमेलनाच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली. हे वाढीव अनुदान पुढच्या वर्षीपासून दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे साहित्य महामंडळाने स्वागत केले असून हे अनुदान वाढविल्याबद्दल शासनाचे आभारही मानले आहेत.ही घोेषणा सांस्कृतिक परिवर्तनाची द्योतकसंमेलनाचे अनुदान वाढवून मिळावे, यासाठी विदर्भ साहित्य संघाने नेहमीच प्रयत्न केले. साहित्य महामंडळाचे कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे आल्यामुळे या मागणीला आणखी बळ मिळाले. हे निश्चितच महामंडळाच्या प्रयत्नाचे यश आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी जो मनाचा मोठेपणा दाखवला त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.डॉ. इंद्रजित ओरकेकार्यवाह, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळमराठी साहित्य संमेलनासाठी शासन मागच्या २५ वर्षांपासून २५ लाखांचा निधी देत होते. परंतु सध्याच्या बाजारभावानुसार ही रक्कम एक कोटी इतकी हवी. म्हणूनच महामंडळ मागच्या एक वर्षापासून सातत्याने ही मागणी करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बडोद्यात हे अनुदान ५० लाख करीत असल्याची घोषणा केली. या घोषणेचा आनंद आहेच व त्यासाठी मी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. परंतु संमेलनाचे स्वरूप बघता हा निधी अजूनही कमीच आहे. यात पुन्हा ५० लाखांची भर घातली जावी, अशी महामंडळाची अपेक्षा आहे.डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशीअध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळमराठी विद्यापीठाचा प्रश्नही मार्गी लागणारमराठी भाषेच्या संदर्भातील अनेक मागण्यांचा अनुशेष सरकारकडे कायम आहे. यात मराठी विद्यापीठाचाही समावेश आहे. ही मागणी तशी ८४ वर्षे जुनी आहे. आता कुठे शासन याबाबतीत सकारात्मक दिसत आहे. बडोदा साहित्य संमेलनाच्या मंचावर मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतही दिले आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे. यासोबतच मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत मुख्यमंत्र्यांच्या पुढकाराने साहित्यिकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, अशी माहिती डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य