शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

‘आक्रोश’ दडपण्यासाठी गर्दीचे ‘टार्गेट’ वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:53 IST

काँग्रेसमधील गटबाजी टोकाला गेली असून चंद्रपूरमध्ये ६ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी काँग्रेसचे दोन वेगवेगळे मेळावे होत आहे.

ठळक मुद्देचंद्रपूरच्या मेळाव्यासाठी तयारी जोरात : चव्हाण समर्थक सरसावले

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसमधील गटबाजी टोकाला गेली असून चंद्रपूरमध्ये ६ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी काँग्रेसचे दोन वेगवेगळे मेळावे होत आहे. माजी खा. नरेश पुगलिया यांनी आयोजित केलेल्या रॅलीत व्यक्त होणारा असंतुष्टांचा ‘आक्रोश’ दडपण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित ‘जनआक्रोश मेळाव्यात’ गर्दी वाढविण्याचे नवे टार्गेट सहाही जिल्ह्यातील नेत्यांना देण्यात आले आहे. यासाठी बैठकांचे सत्र जोरात सुरू असून विशेष टीम कामी लावण्यात आल्या आहेत.नरेश पुगलिया यांनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या बॅनरखाली शेतकरी व कामगार रॅली आयोजित केली आहे. या रॅलीत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड यांच्यासह काही नेते सहभागी होणार असल्याचा दावा पुगलिया यांनी केला आहे. ही रॅली एक प्रकारे प्रदेश काँग्रेसच्या मेळाव्याला आव्हानच मानली जात आहे. त्यामुळे पुगलियांच्या रॅलीसमोर ‘जनआक्रोश मेळावा’ फिका ठरू नये यासाठी प्रदेश काँग्रेसच्या आयोजक नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशच्या मेळाव्यात जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी अशोक चव्हाण समर्थक नेत्यांना नवे टार्गेट देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून आणण्यात येणाºया लोकांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यासाटी जिल्हानिहाय बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तयारीसाठी भंडारा येथे आज बैठक झाली. बैठकीला सर्व प्रमुख नेते, जि.प. सदस्य, ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते. या वेळी दोन ते अडीच हजार लोकांचे सुधारित टार्गेट देण्यात आले. नागपूर शहरातून दोन हजार लोक आणण्याचे नियोजन होते. त्यातही वाढ करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणमधील उमरेड, कुही, बुटीबोटी, हिंगणा या भागातून अधिकाधिक लोक नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी वर्धा येथे आढावा बैठक होत आहे. गोंदिया व गडचिरोलीच्या बैठका पूर्वीच आटोपल्या असल्या तरी त्यांनाही नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक लोकांची गर्दी जमविण्यासाठी चंद्रपूर शहर व ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सर्व नियोजनासाठी नागपूर विभागातील प्रमुख नेत्यांची चमू चंद्रपूर येथे तीन दिवस मुक्कामी असणार आहे.चंद्रपूरच्या जनआक्रोश मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवारी रविभवन येथे बैठक झाली होती. तीत माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे आदी उपस्थित होते. या बैठकीत मोघे यांनी माजी खा. नरेश पुगलिया यांच्यासह नाराज असलेल्या जुन्या नेत्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले जावे, अशी सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुगलिया व इतर नेते संतप्त झाले, असा दावा पुगलिया समर्थकांकडून केला जात आहे.आधीच विश्वासात घेतले असते तर आज ही वेळ आली नसती, अशी भूमिका त्यांच्याकडून मांडली जात आहे. वडेट्टीवार यांनी पुगलिया यांचे हे आंदोलन भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत पुगलिया यांची कुठलीही मनधरणी केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूरमध्ये होणाºया दोन वेगवेगळ्या मेळाव्यात काँग्रेसमधील अंतर्गत आक्रोश पहायला मिळण्याची चिन्हे आहेत.चव्हाणांकडून वडेट्टीवारांना निरोप ?चंद्रपूरमध्ये दोन मेळावे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादाची दखल प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. हा वाद थांबविण्यासाठी नमते घेण्याचा निरोप चव्हाण यांच्याकडून वडेट्टीवार यांना देण्यात आला आहे, असा दावा पुगलिया समर्थकांनी केला आहे. मात्र, आयोजक गटाने असा निरोप आल्याचे नाकारले आहे.