शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

‘आक्रोश’ दडपण्यासाठी गर्दीचे ‘टार्गेट’ वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:53 IST

काँग्रेसमधील गटबाजी टोकाला गेली असून चंद्रपूरमध्ये ६ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी काँग्रेसचे दोन वेगवेगळे मेळावे होत आहे.

ठळक मुद्देचंद्रपूरच्या मेळाव्यासाठी तयारी जोरात : चव्हाण समर्थक सरसावले

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसमधील गटबाजी टोकाला गेली असून चंद्रपूरमध्ये ६ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी काँग्रेसचे दोन वेगवेगळे मेळावे होत आहे. माजी खा. नरेश पुगलिया यांनी आयोजित केलेल्या रॅलीत व्यक्त होणारा असंतुष्टांचा ‘आक्रोश’ दडपण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित ‘जनआक्रोश मेळाव्यात’ गर्दी वाढविण्याचे नवे टार्गेट सहाही जिल्ह्यातील नेत्यांना देण्यात आले आहे. यासाठी बैठकांचे सत्र जोरात सुरू असून विशेष टीम कामी लावण्यात आल्या आहेत.नरेश पुगलिया यांनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या बॅनरखाली शेतकरी व कामगार रॅली आयोजित केली आहे. या रॅलीत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड यांच्यासह काही नेते सहभागी होणार असल्याचा दावा पुगलिया यांनी केला आहे. ही रॅली एक प्रकारे प्रदेश काँग्रेसच्या मेळाव्याला आव्हानच मानली जात आहे. त्यामुळे पुगलियांच्या रॅलीसमोर ‘जनआक्रोश मेळावा’ फिका ठरू नये यासाठी प्रदेश काँग्रेसच्या आयोजक नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशच्या मेळाव्यात जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी अशोक चव्हाण समर्थक नेत्यांना नवे टार्गेट देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून आणण्यात येणाºया लोकांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यासाटी जिल्हानिहाय बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तयारीसाठी भंडारा येथे आज बैठक झाली. बैठकीला सर्व प्रमुख नेते, जि.प. सदस्य, ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते. या वेळी दोन ते अडीच हजार लोकांचे सुधारित टार्गेट देण्यात आले. नागपूर शहरातून दोन हजार लोक आणण्याचे नियोजन होते. त्यातही वाढ करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणमधील उमरेड, कुही, बुटीबोटी, हिंगणा या भागातून अधिकाधिक लोक नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी वर्धा येथे आढावा बैठक होत आहे. गोंदिया व गडचिरोलीच्या बैठका पूर्वीच आटोपल्या असल्या तरी त्यांनाही नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक लोकांची गर्दी जमविण्यासाठी चंद्रपूर शहर व ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सर्व नियोजनासाठी नागपूर विभागातील प्रमुख नेत्यांची चमू चंद्रपूर येथे तीन दिवस मुक्कामी असणार आहे.चंद्रपूरच्या जनआक्रोश मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवारी रविभवन येथे बैठक झाली होती. तीत माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे आदी उपस्थित होते. या बैठकीत मोघे यांनी माजी खा. नरेश पुगलिया यांच्यासह नाराज असलेल्या जुन्या नेत्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले जावे, अशी सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुगलिया व इतर नेते संतप्त झाले, असा दावा पुगलिया समर्थकांकडून केला जात आहे.आधीच विश्वासात घेतले असते तर आज ही वेळ आली नसती, अशी भूमिका त्यांच्याकडून मांडली जात आहे. वडेट्टीवार यांनी पुगलिया यांचे हे आंदोलन भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत पुगलिया यांची कुठलीही मनधरणी केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूरमध्ये होणाºया दोन वेगवेगळ्या मेळाव्यात काँग्रेसमधील अंतर्गत आक्रोश पहायला मिळण्याची चिन्हे आहेत.चव्हाणांकडून वडेट्टीवारांना निरोप ?चंद्रपूरमध्ये दोन मेळावे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादाची दखल प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. हा वाद थांबविण्यासाठी नमते घेण्याचा निरोप चव्हाण यांच्याकडून वडेट्टीवार यांना देण्यात आला आहे, असा दावा पुगलिया समर्थकांनी केला आहे. मात्र, आयोजक गटाने असा निरोप आल्याचे नाकारले आहे.