शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:59 IST

राज्यासह नागपूर शहरात कोविडचे संकट नियंत्रणाबाहेर चालले आहे. शासकीय यंत्रणा व नागपूर महापालिका प्रशासन सद्यस्थिती हाताळण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ होत चालली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ठळक मुद्दे चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप : मनपा रुग्णालयांचा उपयोग काय ?

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यासह नागपूर शहरात कोविडचे संकट नियंत्रणाबाहेर चालले आहे. शासकीय यंत्रणा व नागपूर महापालिका प्रशासन सद्यस्थिती हाताळण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ होत चालली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.बावनकुळे म्हणाले, लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले पॉझिटिव्ह रुग्णाना वास्तविकता गृह-विलगीकरणात ठेवायला हवे असे दिशानिर्देश न्यायालयानेसुद्धा दिले आहेत. कोविड रुग्णालयांनी तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची देखभाल करणे अपेक्षित असताना नागपूर महापालिका आपल्या संसाधनांवर अनावश्यकरीत्या ताण देऊन लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात भरती करून जनतेच्या पैशांचा अपव्यय करीत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांचे नविनीकरण व कोविड तयारीबाबत प्रसार माध्यमांतून बरीच प्रसिद्धी केली. पुढे काय झाले हे कुणालाच माहीत नाही. या रुग्णालयात कोविडचे रुग्ण का म्हणून दाखल करून घेण्यात येत नाहीत, या रुग्णालयांच्या पुनर्विकासावर किती रक्कम खर्च करण्यात आली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. काटोल रोडवर राधास्वामी सत्संगच्या जागेत पाच हजार खाटा तयार करण्यात आल्या होत्या. त्याचीही बरीच प्रसिद्धी करण्यात आली. जेव्हा या सुविधांचा वापरच करण्यात आला नाही तर जनतेच्या पैशांचा झालेल्या अपव्ययाला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला.रहिवासी क्षेत्रातील खासगी रुग्णालये ही फक्त कोविड व्यतिरिक्त आजाराच्या रुग्णांसाठी राखीव ठेवावीत. एखाद्या खासगी रुग्णालयाचा भाग जरी कोविड रुग्णालय म्हणून वापरला तर इतर रुग्ण भीतीपोटी त्या रुग्णालयाच्या नॉन-कोविड भागात जाणारसुद्धा नाहीत. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णामुळे जर कोविड रहिवासी क्षेत्रात पसरला तर पुढे उत्पन्न होणाऱ्या विपत्तीला जबाबदार कोण राहणार? असले विसंगत निर्णय कोण घेत आहे, असे प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेcorona virusकोरोना वायरस बातम्या