शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

-तर ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार

By admin | Updated: March 21, 2017 01:53 IST

ग्रामीण भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पंचायत समितीनिहाय संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून,

पाणीटंचाईबाबतची मंजूर कामे ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करा : पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश नागपूर : ग्रामीण भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पंचायत समितीनिहाय संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, ज्या गावात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण होईल अशा गावांमध्ये आराखड्यानुसार तसेच अतिरिक्त उपाययोजनांद्वारे ३० एप्रिलपूर्वी संपूर्ण कामे पूर्ण करून पाणी पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. तसेच पाणीटंचाई आराखड्यानुसार आवश्यकतेनुसार खासगी विहीर अधिग्रहण व टँकरद्वारा पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे, अशा उपाययोजनांसंदर्भात दोन दिवसात प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल. तसेच मंजूर आराखड्यानुसार कामे पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांच्या सेवापुस्तकात नोंद घेऊन दोन वेतनवाढी थांबविण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीण तसेच हिंगणा तालुक्यातील पाणी पुरवठा आढावा बैठकीत सांगितले.जिल्हा परिषदेच्या खेडकर सभागृहात नागपूर ग्रामीण व हिंगणा तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा व पाणीटंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाऱ्या आराखड्यासंदर्भात सरपंच व ग्रामसेवकांनी संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार समीर मेघे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद सदस्य रूपराव शिंगणे, शुभांगी गायधने तसेच पंचायत समिती सदस्य, उपविभागीय महसूल अधिकारी बाबासाहेब कोळेकर, तहसीलदार सुशांत बन्सोडे, गटविकास अधिकारी कोवे आदी उपस्थित होते.नागपूर ग्रामीण तसेच हिंगणा तालुक्यातील गावनिहाय पाणीटंचाईसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मंजूर आराखड्यानुसार व अतिरिक्त मंजूर योजनेनुसार ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, अशा गावांसाठी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तात्काळ तयार करून जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठवा, तसेच टँकरद्वारा पाणी पुरवठा आवश्यक असलेल्या गावांचा प्रस्तावही तात्काळ मंजूर करा. पाणीटंचाई निवारणासाठी विहीर खोलीकरण करताना संपूर्ण उन्हाळ्यात पिण्याचे पाणी पुरेल यादृष्टीने खोलीकरणाचे प्रस्ताव तयार करा, तसेच विंधन विहिरी घेताना टंचाई असलेल्या भागाला प्राधान्य द्या, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.पाणीटंचाईसंदर्भात तीन टप्प्यात उपाययोजना राबविण्यात येणार असून, यामध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, सार्वजनिक विहीर खोलीकरण, टँकरद्वारे पाणी पुरवठा, खासगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना राबविण्यात येणार असून, या संपूर्ण उपाययोजनांद्वारे ३० जूनपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. प्रस्तावित उपाययोजनेनुसार १८८ गावांसाठी ३५२ उपाययोजना मंजूर करण्यात आल्या असून, त्यापैकी १३५ गावातील २३० उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. नागपूर ग्रामीण तसेच हिंगणा तालुक्यासाठी विंधन विहिरी दुरुस्तीसाठी असलेले युनिट अपूर्ण असल्यामुळे अतिरिक्त युनिट देण्यासंदर्भात यावेळी सूचना करण्यात आल्या. पाणीटंचाईसंदर्भात प्रस्ताव सादर करताना भूजल सर्वेक्षण यंत्रणेने ३१ मार्चअखेरपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे तसेच ५ एप्रिलपर्यंत टंचाई आराखड्यानुसार प्रत्येक कामाचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेऊन १० एप्रिलपासून कामांना सुरुवात करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.आमदार समीर मेघे यांनी हिंगणा तालुक्यातील गावनिहाय कामांचा आढावा घेताना ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे अशा गावांमध्ये प्राधान्याने खासगी विहिरींचे अधिग्रहण करा, अशा सूचना दिल्या. उन्हाळ्यामध्ये कुठल्याही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, यादृष्टीने सरपंच आणि ग्रामसेवकांनी संयुक्तपणे बसून नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाणीटंचाई मंजूर आराखडा व संभाव्य पाणी पुरवठा आराखड्याची अंमलबजावणी १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत करावयाची असल्यामुळे प्रत्येक गावात प्रस्तावित केलेल्या योजनानिहाय कामांचे नियोजन करून कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा, अशा सूचना दिल्या. पंचायत समिती नागपूरअंतर्गत २६ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सरपंच व ग्रामसेवकांनी टंचाई आराखड्यानुसार गावात प्रस्तावित असलेली कामे अतिरिक्त नियोजन तसेच पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसंदर्भात बैठकीत माहिती दिली. गटविकास अधिकारी कोवे यांनी प्रास्ताविकात पाणीटंचाई आराखड्यासंदर्भात माहिती दिली.(प्रतिनिधी)१७ गावांमध्ये ३८ टँकरद्वारे पाणी पुरवठानागपूर ग्रामीण तसेच शहरालगतच्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी १७ गावात ३८ टँकरद्वारा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये बेसा-बेलतरोडी, गोधनी, बोखारा, बुटीबोरी, सुराबर्डी, शंकरपूर, बोथली, लावा आदी भागांचा समावेश आहे. बेसा व बेलतरोडी या भागाला अतिरिक्त १० विंधन विहिरी तसेच १० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिल्या.