शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्याची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 02:49 IST

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८च्या तरतुदीप्रमाणे पक्क्या वाहन परवान्याची (परमनंट लायसन्स) मर्यादा ही ५० वर्षांपर्यंत आहे.

जनमंचची मागणी : वाहनचालकांना माराव्या लागतात चकरानागपूर : केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८च्या तरतुदीप्रमाणे पक्क्या वाहन परवान्याची (परमनंट लायसन्स) मर्यादा ही ५० वर्षांपर्यंत आहे. त्यानंतर दर पाच वर्षानंतर परवान्याची मुदत वाढविली जाते. परिणामी, या वयोगटातील वाहनचालकांना वारंवार आरटीओच्या चकरा माराव्या लागतात. याचा फायदा दलालही घेतात. हे थांबविण्यासाठी पक्क्या वाहन परवान्याची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढविण्याची मागणी जनमंचने केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे माणसाचे वयोमान वाढले आहे. उत्कृष्ठ जीवनशैलीमुळे वयाच्या सत्तरीनंतरही चांगले आयुष्य जगता येते. यामुळेच शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र ५० वर्षापर्यंतचा मर्यादेचा नियम अनेकांना अडचणीत आणत आहे. जनमंचच्या मते, या नियमाचे पालन जनतेची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी होत आहे.ज्या चालकाला वाहन चालविणे शक्य नाही तो पाच वर्षानंतर परवान्याचे नुतनीकरण करणार नाही. यामुळे हा नियम शिथिल करणे काळाची गरज आहे. असे झाल्यास, आरटीओ कार्यालयात या निमित्ताने पडणारा कामाचा बोझा कमी होण्यास मदत होईल. जनमंचने या समस्येला घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. शासनाने हा नियम शिथिल करून वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर आणि उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)