शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वाहन परवान्याची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 02:49 IST

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८च्या तरतुदीप्रमाणे पक्क्या वाहन परवान्याची (परमनंट लायसन्स) मर्यादा ही ५० वर्षांपर्यंत आहे.

जनमंचची मागणी : वाहनचालकांना माराव्या लागतात चकरानागपूर : केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८च्या तरतुदीप्रमाणे पक्क्या वाहन परवान्याची (परमनंट लायसन्स) मर्यादा ही ५० वर्षांपर्यंत आहे. त्यानंतर दर पाच वर्षानंतर परवान्याची मुदत वाढविली जाते. परिणामी, या वयोगटातील वाहनचालकांना वारंवार आरटीओच्या चकरा माराव्या लागतात. याचा फायदा दलालही घेतात. हे थांबविण्यासाठी पक्क्या वाहन परवान्याची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढविण्याची मागणी जनमंचने केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे माणसाचे वयोमान वाढले आहे. उत्कृष्ठ जीवनशैलीमुळे वयाच्या सत्तरीनंतरही चांगले आयुष्य जगता येते. यामुळेच शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र ५० वर्षापर्यंतचा मर्यादेचा नियम अनेकांना अडचणीत आणत आहे. जनमंचच्या मते, या नियमाचे पालन जनतेची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी होत आहे.ज्या चालकाला वाहन चालविणे शक्य नाही तो पाच वर्षानंतर परवान्याचे नुतनीकरण करणार नाही. यामुळे हा नियम शिथिल करणे काळाची गरज आहे. असे झाल्यास, आरटीओ कार्यालयात या निमित्ताने पडणारा कामाचा बोझा कमी होण्यास मदत होईल. जनमंचने या समस्येला घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. शासनाने हा नियम शिथिल करून वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर आणि उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)