शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

वाहन परवान्याची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 02:49 IST

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८च्या तरतुदीप्रमाणे पक्क्या वाहन परवान्याची (परमनंट लायसन्स) मर्यादा ही ५० वर्षांपर्यंत आहे.

जनमंचची मागणी : वाहनचालकांना माराव्या लागतात चकरानागपूर : केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८च्या तरतुदीप्रमाणे पक्क्या वाहन परवान्याची (परमनंट लायसन्स) मर्यादा ही ५० वर्षांपर्यंत आहे. त्यानंतर दर पाच वर्षानंतर परवान्याची मुदत वाढविली जाते. परिणामी, या वयोगटातील वाहनचालकांना वारंवार आरटीओच्या चकरा माराव्या लागतात. याचा फायदा दलालही घेतात. हे थांबविण्यासाठी पक्क्या वाहन परवान्याची मर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढविण्याची मागणी जनमंचने केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे माणसाचे वयोमान वाढले आहे. उत्कृष्ठ जीवनशैलीमुळे वयाच्या सत्तरीनंतरही चांगले आयुष्य जगता येते. यामुळेच शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र ५० वर्षापर्यंतचा मर्यादेचा नियम अनेकांना अडचणीत आणत आहे. जनमंचच्या मते, या नियमाचे पालन जनतेची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी होत आहे.ज्या चालकाला वाहन चालविणे शक्य नाही तो पाच वर्षानंतर परवान्याचे नुतनीकरण करणार नाही. यामुळे हा नियम शिथिल करणे काळाची गरज आहे. असे झाल्यास, आरटीओ कार्यालयात या निमित्ताने पडणारा कामाचा बोझा कमी होण्यास मदत होईल. जनमंचने या समस्येला घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. शासनाने हा नियम शिथिल करून वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत वाढवावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर आणि उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)