शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ : नितीन बरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:24 IST

ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. सध्या थंडीचा कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकोरडेपणा, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदींचे रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. सध्या थंडीचा कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्वचा कोरडी पडणे, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदी समस्या घेऊन रुग्ण येत आहेत. हिवाळ्यात जर निरोगी, सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असा सल्ला प्रसिद्ध त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी दिला.उन्हाळ्यात त्वचा घामाला नियमितपणे शरीराबाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या तक्रारी उद्भवत नाहीत. घामामुळे त्वचेची रंध्रे उघडी राहतात. विशेषत: आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो. त्यांचा तेलकटपणा रंध्रातून बाहेर पडतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. परंतु, हिवाळ्यात त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया मंदावते किंवा बंद होत जाते. त्यामुळे त्वचेचे विकार वाढत असल्याचे डॉ. बरडे यांचे म्हणणे आहे.त्वचा ‘ड्राय’ होणार नाही याची काळजी घ्याडॉ. बरडे म्हणाले, बदलत्या वातावरणामुळे अनेकवेळा थंडी जाणवत नाही. परंतु थंडीमुळे त्वचा ‘ड्राय’ होते. पर्यायी बरेचसे त्वचेचे आजार होण्याचा धोका असतो. म्हणून साबणाचा वापर केल्यानंतर लगेच त्वचेवर मोश्चरायजर लावायला हवे. अंघोळीनंतर त्वचेला टॉवेलने रगडू नये. साबणाऐवजी ‘क्लिंजर’ वापरावा. ‘स्क्रब’ क्रिमचा वापर टाळावा. ‘हिटर’मुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे याबाबत अधिक काळजी घ्यावी.हिवाळ्यातही सनस्क्रीनचा वापर कराहिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, म्हणून सनस्क्रीन लावले नाही तरी चालते, असा अनेकांचा समज असतो. परंतु हे चुकीचे आहे. उलट हिवाळ्यामध्ये अतिनील किरणे जास्त प्रमाणात सक्रिय असतात. यामुळे सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्लाही डॉ. बरडे यांनी दिला.गजकर्ण व सोरायसिस विकाराची विशेष काळजी घ्यावीज्यांना आधिपासून गजकर्ण व सोरायसिस आजार आहेत, त्यांना हिवाळ्यात अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांनी आधीपासूनच नियमित त्वचेला मोश्चरायजर लावावे, सोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते. याकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार उफाळून येत असल्याचेही डॉ. बरडे म्हणाले.‘अ‍ॅलर्जी’कडे दुर्लक्ष नकोहिवाळ्यातील उन्हामुळे ‘अ‍ॅलर्जी’ निर्माण होऊ शकते. यात उन्ह लागणाऱ्या शरीराच्या भागावर लाल पुरळ येऊन खाज सुटते, अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यायला हवे. शिवाय, उलन किंवा इतर उबदार कपडे वापरताना आत सुतीचे कपडे घालणे आवश्यक असते.ओठांची विशेष काळजी घ्याहिवाळ्यात ओठांचा ओलसरपणा टिकून ठेवणे आवश्यक आहे. ओठाची त्वचा खूप नाजूक असल्याने त्यावर हवा आणि थंड वातावरणाचा थेट प्रभाव पडतो. यामुळे वारंवार ओठांना जीभ लावू नये.ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठ फूटण्यापूर्वी व्हॅसलिन किंवा ‘लिप बाम’चा वापर नियमित करायला हवा, असेही डॉ. बरडे म्हणाले.भरपूर पाणी प्याहिवाळ्यात आहाराकडेही योग्य लक्ष द्यायला हवे. आहारात स्निग्ध पदार्थ, भरपूर ताजी फळे, शहाळाचे पाणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचा समावेश करायला हवा असे सांगत डॉ. बरडे म्हणाले, थंडीमुळे अनेक जण पाणी कमी पितात. याचा परिणाम आरोग्यावर होता. यामुळे ऋतु कुठलाही असो त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यायला हवे.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीdoctorडॉक्टर