शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

शेणखताच्या मागणीसाेबत दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST

भूषण सुके लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खताचा अताेनात वापर सुरू झाला. त्यामुळे पिकांचा ...

भूषण सुके

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खताचा अताेनात वापर सुरू झाला. त्यामुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादन घटत चालले आहे. यातून जमिनीचा पाेत खालावत चालल्याने शेतकऱ्यांना नवीन समस्येला ताेंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी आता पूर्वीप्रमाणे शेणखताच्या वापरावर भर देत आहेत. एकीकडे गुरांचे प्रमाण कमी झाल्याने व दुसरीकडे मागणी वाढत असल्याने शेणखताला चांगली किंमत मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात साधे शेणखत साडेचार ते पाच हजार रुपये प्रति ट्राॅली मिळत असून, प्रक्रिया केलेले शेणखत १२ हजार ते २० हजार रुपये प्रति ट्राॅली विकले जात आहे.

शेतकरी साधारणत: साधे शेणखत वापरण्यावर भर देतात. त्यामुळे शेतात वाळवी व हुमणी या किडींचा उपद्रव वाढण्याची शक्यता बळावते. हा उपद्रव टाळण्यासाठी शेणखतावर ‘फर्मेन्टेशन’ व ‘रिफर्मेन्टेशन’ ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमुळे शेणखताचे तापमान कमी हाेऊन गंध नाहीसा हाेतो. त्यात नायट्राेजन, फाॅस्फरस, पाेटॅश, झिंक, बाेराॅन, फेरस, मॅग्नेशियम यासह अन्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढत असून, त्यातील वाळवी व हुमणी या किडी, त्यांची अंडी व काेष नष्ट हाेतात.

जमिनीत मित्र जीवाणू व बुरशीचे प्रमाण हळूहळू वाढल्याने तसेच शत्रू बुरशी व जीवाणू नाहीसे हाेत असल्याने पिके राेगांना फारशी बळी पडत नाही. शिवाय, पाण्याचा निचरा व्यवस्थित हाेत असल्याने जमिनीची धूप थांबते व तापमान स्थिर राहण्यास मदत हाेते. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा ‘सामू’ बदलण्यास अडथळा निर्माण हाेत असल्याने शेतजमीन ॲसिडिक, अल्कलाईन किंवा क्षारयुक्त हाेत नाही. जमिनीचे आराेग्य निकाेप ठेवण्यासाठी शेणखतासाेबतच गांडूळ, कम्पाेस्ट व हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

....

रासायनिक खतांचे पिकांवर दुष्परिणाम

रासायनिक व मिश्रखताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावला असून, उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीतील जैवविविधता धाेक्यात आली असून, घातक बुरशी व जीवाणूचे प्रमाण वाढत असल्याने पिकांना धाेका निर्माण हाेताे. घातक बुरशीमुळे जमिनीत पाण्याचा निचरा हाेण्याचे प्रमाण मंदावते. जमिनीच्या तापमानात वाढ हाेत असल्याने त्याचा पिकांवर विपरीत परिणाम हाेताे.

....

शेणखताचा फायदा

शेणखताच्या वापरामुळे जमिनीतील जैवविविधता शाबूत राहत असल्याने पाेत सुधारताे. पाण्याचा व्यवस्थित निचरा हाेताे. मातीचे संवर्धन हाेऊन आराेग्य सुधारते. गांडूळ व हिरवळीच्या खताचा वापर केल्यास जमिनीच्या सुपीकतेत आणखी वाढ हाेते. प्रक्रिया केलेल्या शेणखताचा वापर केल्यास पिकांना आवश्यक असलेले सर्व सूक्ष्म व इतर अन्नद्रव्ये सहज उपलब्ध हाेतात.

.....

रासायनिक आणि शेणखताचे दर

जिल्ह्यात साधे शेणखत प्रति ट्राॅली साडेचार ते पाच हजार रुपयामध्ये मिळते. हेच शेणखत प्रक्रिया अर्थात ‘फर्मेन्टेशन’ केलेले असल्यास त्याची किंमत वाढत असून, ‘रिफर्मेन्टेशन’ केलेले शेणखत २० हजार रुपये ट्राॅलीप्रमाणे विकले जात आहे. युरियाचे दर प्रति क्विंटल ६२० रुपये असून, मिश्रखताचे भाव प्रति क्विंटल १,९०० रुपये ते २,५०० रुपये आहेत.