शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शेणखताच्या मागणीसाेबत दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST

भूषण सुके लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खताचा अताेनात वापर सुरू झाला. त्यामुळे पिकांचा ...

भूषण सुके

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खताचा अताेनात वापर सुरू झाला. त्यामुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादन घटत चालले आहे. यातून जमिनीचा पाेत खालावत चालल्याने शेतकऱ्यांना नवीन समस्येला ताेंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी आता पूर्वीप्रमाणे शेणखताच्या वापरावर भर देत आहेत. एकीकडे गुरांचे प्रमाण कमी झाल्याने व दुसरीकडे मागणी वाढत असल्याने शेणखताला चांगली किंमत मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात साधे शेणखत साडेचार ते पाच हजार रुपये प्रति ट्राॅली मिळत असून, प्रक्रिया केलेले शेणखत १२ हजार ते २० हजार रुपये प्रति ट्राॅली विकले जात आहे.

शेतकरी साधारणत: साधे शेणखत वापरण्यावर भर देतात. त्यामुळे शेतात वाळवी व हुमणी या किडींचा उपद्रव वाढण्याची शक्यता बळावते. हा उपद्रव टाळण्यासाठी शेणखतावर ‘फर्मेन्टेशन’ व ‘रिफर्मेन्टेशन’ ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमुळे शेणखताचे तापमान कमी हाेऊन गंध नाहीसा हाेतो. त्यात नायट्राेजन, फाॅस्फरस, पाेटॅश, झिंक, बाेराॅन, फेरस, मॅग्नेशियम यासह अन्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढत असून, त्यातील वाळवी व हुमणी या किडी, त्यांची अंडी व काेष नष्ट हाेतात.

जमिनीत मित्र जीवाणू व बुरशीचे प्रमाण हळूहळू वाढल्याने तसेच शत्रू बुरशी व जीवाणू नाहीसे हाेत असल्याने पिके राेगांना फारशी बळी पडत नाही. शिवाय, पाण्याचा निचरा व्यवस्थित हाेत असल्याने जमिनीची धूप थांबते व तापमान स्थिर राहण्यास मदत हाेते. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा ‘सामू’ बदलण्यास अडथळा निर्माण हाेत असल्याने शेतजमीन ॲसिडिक, अल्कलाईन किंवा क्षारयुक्त हाेत नाही. जमिनीचे आराेग्य निकाेप ठेवण्यासाठी शेणखतासाेबतच गांडूळ, कम्पाेस्ट व हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

....

रासायनिक खतांचे पिकांवर दुष्परिणाम

रासायनिक व मिश्रखताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावला असून, उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीतील जैवविविधता धाेक्यात आली असून, घातक बुरशी व जीवाणूचे प्रमाण वाढत असल्याने पिकांना धाेका निर्माण हाेताे. घातक बुरशीमुळे जमिनीत पाण्याचा निचरा हाेण्याचे प्रमाण मंदावते. जमिनीच्या तापमानात वाढ हाेत असल्याने त्याचा पिकांवर विपरीत परिणाम हाेताे.

....

शेणखताचा फायदा

शेणखताच्या वापरामुळे जमिनीतील जैवविविधता शाबूत राहत असल्याने पाेत सुधारताे. पाण्याचा व्यवस्थित निचरा हाेताे. मातीचे संवर्धन हाेऊन आराेग्य सुधारते. गांडूळ व हिरवळीच्या खताचा वापर केल्यास जमिनीच्या सुपीकतेत आणखी वाढ हाेते. प्रक्रिया केलेल्या शेणखताचा वापर केल्यास पिकांना आवश्यक असलेले सर्व सूक्ष्म व इतर अन्नद्रव्ये सहज उपलब्ध हाेतात.

.....

रासायनिक आणि शेणखताचे दर

जिल्ह्यात साधे शेणखत प्रति ट्राॅली साडेचार ते पाच हजार रुपयामध्ये मिळते. हेच शेणखत प्रक्रिया अर्थात ‘फर्मेन्टेशन’ केलेले असल्यास त्याची किंमत वाढत असून, ‘रिफर्मेन्टेशन’ केलेले शेणखत २० हजार रुपये ट्राॅलीप्रमाणे विकले जात आहे. युरियाचे दर प्रति क्विंटल ६२० रुपये असून, मिश्रखताचे भाव प्रति क्विंटल १,९०० रुपये ते २,५०० रुपये आहेत.