शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

शेणखताच्या मागणीसाेबत दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST

भूषण सुके लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खताचा अताेनात वापर सुरू झाला. त्यामुळे पिकांचा ...

भूषण सुके

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या नादात रासायनिक खताचा अताेनात वापर सुरू झाला. त्यामुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादन घटत चालले आहे. यातून जमिनीचा पाेत खालावत चालल्याने शेतकऱ्यांना नवीन समस्येला ताेंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी आता पूर्वीप्रमाणे शेणखताच्या वापरावर भर देत आहेत. एकीकडे गुरांचे प्रमाण कमी झाल्याने व दुसरीकडे मागणी वाढत असल्याने शेणखताला चांगली किंमत मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात साधे शेणखत साडेचार ते पाच हजार रुपये प्रति ट्राॅली मिळत असून, प्रक्रिया केलेले शेणखत १२ हजार ते २० हजार रुपये प्रति ट्राॅली विकले जात आहे.

शेतकरी साधारणत: साधे शेणखत वापरण्यावर भर देतात. त्यामुळे शेतात वाळवी व हुमणी या किडींचा उपद्रव वाढण्याची शक्यता बळावते. हा उपद्रव टाळण्यासाठी शेणखतावर ‘फर्मेन्टेशन’ व ‘रिफर्मेन्टेशन’ ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमुळे शेणखताचे तापमान कमी हाेऊन गंध नाहीसा हाेतो. त्यात नायट्राेजन, फाॅस्फरस, पाेटॅश, झिंक, बाेराॅन, फेरस, मॅग्नेशियम यासह अन्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढत असून, त्यातील वाळवी व हुमणी या किडी, त्यांची अंडी व काेष नष्ट हाेतात.

जमिनीत मित्र जीवाणू व बुरशीचे प्रमाण हळूहळू वाढल्याने तसेच शत्रू बुरशी व जीवाणू नाहीसे हाेत असल्याने पिके राेगांना फारशी बळी पडत नाही. शिवाय, पाण्याचा निचरा व्यवस्थित हाेत असल्याने जमिनीची धूप थांबते व तापमान स्थिर राहण्यास मदत हाेते. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा ‘सामू’ बदलण्यास अडथळा निर्माण हाेत असल्याने शेतजमीन ॲसिडिक, अल्कलाईन किंवा क्षारयुक्त हाेत नाही. जमिनीचे आराेग्य निकाेप ठेवण्यासाठी शेणखतासाेबतच गांडूळ, कम्पाेस्ट व हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

....

रासायनिक खतांचे पिकांवर दुष्परिणाम

रासायनिक व मिश्रखताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पाेत खालावला असून, उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीतील जैवविविधता धाेक्यात आली असून, घातक बुरशी व जीवाणूचे प्रमाण वाढत असल्याने पिकांना धाेका निर्माण हाेताे. घातक बुरशीमुळे जमिनीत पाण्याचा निचरा हाेण्याचे प्रमाण मंदावते. जमिनीच्या तापमानात वाढ हाेत असल्याने त्याचा पिकांवर विपरीत परिणाम हाेताे.

....

शेणखताचा फायदा

शेणखताच्या वापरामुळे जमिनीतील जैवविविधता शाबूत राहत असल्याने पाेत सुधारताे. पाण्याचा व्यवस्थित निचरा हाेताे. मातीचे संवर्धन हाेऊन आराेग्य सुधारते. गांडूळ व हिरवळीच्या खताचा वापर केल्यास जमिनीच्या सुपीकतेत आणखी वाढ हाेते. प्रक्रिया केलेल्या शेणखताचा वापर केल्यास पिकांना आवश्यक असलेले सर्व सूक्ष्म व इतर अन्नद्रव्ये सहज उपलब्ध हाेतात.

.....

रासायनिक आणि शेणखताचे दर

जिल्ह्यात साधे शेणखत प्रति ट्राॅली साडेचार ते पाच हजार रुपयामध्ये मिळते. हेच शेणखत प्रक्रिया अर्थात ‘फर्मेन्टेशन’ केलेले असल्यास त्याची किंमत वाढत असून, ‘रिफर्मेन्टेशन’ केलेले शेणखत २० हजार रुपये ट्राॅलीप्रमाणे विकले जात आहे. युरियाचे दर प्रति क्विंटल ६२० रुपये असून, मिश्रखताचे भाव प्रति क्विंटल १,९०० रुपये ते २,५०० रुपये आहेत.