शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

सामाजिक कामात सक्रियता वाढवा : शेती विकू नका, कर्ज काढून लग्न करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:48 IST

तिरळे कुणबी समाज हा पालनकर्ता समाज आहे. मात्र, चुकीच्या चालीरीतीमुळे समाज अधोगतीकडे जात आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. आपली शानशौकत मिरविण्यासाठी शेती विकू नका, कर्ज काढून महागडे लग्नसोहळे करू नका. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हा. सामाजिक उपक्रमात, समाजाच्या कामात पुढाकार घ्या, सक्रियता वाढवा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

ठळक मुद्देतिरळे कुणबी समाज मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिरळे कुणबीसमाज हा पालनकर्ता समाज आहे. मात्र, चुकीच्या चालीरीतीमुळे समाज अधोगतीकडे जात आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. आपली शानशौकत मिरविण्यासाठी शेती विकू नका, कर्ज काढून महागडे लग्नसोहळे करू नका. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हा. सामाजिक उपक्रमात, समाजाच्या कामात पुढाकार घ्या, सक्रियता वाढवा, असे आवाहन मान्यवरांनी केले.तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे १० वी व १२ वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी आ. सुधाकर देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, वैशाली सुधाकर कोहळे, नरेंद्र जिचकार, नरेश बरडे, मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे, उपाध्यक्ष कृष्णा बोराटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, एमयूएचएसच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे डायरेक्टर डॉ. संजय चौधरी, एनएमआरडीएचे कार्यकारी सदस्य संजय ठाकरे, अजय बोढारे यांचा नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी आ. देशमुख म्हणाले, कुणबी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप होत होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत तिरळे कुणबी समाजासाठी बिडीपेठ, म्हाळगीनगर चौक येथे समाज भवन मिळवून दिले. सामाजिक चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. संजीव चौधरी यांनी सत्कारासाठी आभार मानत सामाजिक कामासाठी आपण आयुष्यभर पुढाकार घेत राहू, असे आश्वस्त केले. संचालन वैशाली चोपडे यांनी केले. आभार डॉ. रमेश गोरले यांनी मानले.समाजाच्या सक्रियतेमुळेच मंत्रिपद : देशमुखगेल्या काळात कुणबी समाजात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. त्यानंतर कुणबी समाज मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला. समाजाचा एक दबाव राजकीय व्यवस्थेवर पडला. वातावरणनिर्मिती झाली. त्यामुळेच राज्याच्या मंत्रिमंडळात डॉ. परिणय फुके, डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे तर केंद्रात संजय धोत्रे यांच्या रूपात कुणबी समाजाला केंद्रात मंत्रिपद मिळाले, असे मत आ. सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केले.मुलांवर दबाव टाकू नका : फुकेपालकांनी करिअरची निवड करण्यासाठी मुलांवर मानसिक दबाव टाकू नये. त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करावा. डॉक्टर, इंजिनिअर शिवायही अनेक क्षेत्र आहेत, असे सांगत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.समाज भवनासाठी निधी द्या : चोपडेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरळे कुणबी समाजासाठी बिडीपेठ, म्हाळगीनगर चौक येथे समाज भवन उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी नासुप्रकडे मोठा निधी जमा करायचा आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शक्तीनुसार निधी देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे यांनी प्रास्ताविकातून केले. समाज भवनाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. तेथे विविध उपक्रम राबविले जातील. त्याचा समाजाला फायदा होईल. यातून एक सामाजिक चळवळ उभी होईल, असेही त्यांनी सांगितले.सत्कारासाठी हार-बुके नाहीतिरळे कुणबी सेवा मंडळाने या कार्यक्रमात एक आदर्श निर्माण केला. गुणवंत विद्यार्थी तसेच मान्यवरांच्या सत्कारासाठी हार-बुके वापरले नाहीत, तर प्रत्येकाला रोपटे भेट दिले. प्रत्येकाने एक झाड लावून, ते जगवून पर्यावरणाचे संवर्धन करावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

टॅग्स :kunbiकुणबीcommunityसमाज