शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

बाल कर्करोग ९५ टक्के बरा होत असताना मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:10 IST

सुमेध वाघमारे नागपूर : लहान मुलांचा कर्करोग हा साधारण ९५ टक्के बरा होणारा आहे. परंतु कर्करोगाच्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत ...

सुमेध वाघमारे

नागपूर : लहान मुलांचा कर्करोग हा साधारण ९५ टक्के बरा होणारा आहे. परंतु कर्करोगाच्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेल्या चिमुकल्यांसाठी मेडिकलमधील सोयी अपुऱ्या पडतात. मेडिकल प्रशासनाने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु तरीही बाल कर्करोगात मृत्यूचे प्रमाण सुमारे ४० ते ५० टक्के आहे.

वयस्क लोकांच्या तुलनेत बालपणात आढळणारे कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या केवळ तीन ते चार टक्के आहे. बालपणातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात १६.२३ टक्के एवढे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विकिरणोपचार व कर्करोगशास्त्र विभागात बाल कर्करोग रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात विविध कॅन्सरच्या ३५० चिमुकल्यांची नोंद झाली होती. यातील जवळपास ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड नाही

बाल कर्करोगाच्या रुग्णांसाठी मेडिकलमध्ये स्वतंत्र वॉर्ड नाही. या रुग्णांना बालरोग विभागाच्या वॉर्डात ठेवले जाते. यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता अधिक असते. दरम्यानच्या काळात या रोगाच्या विशेष उपचारासाठी बालरोग विभागात १० खाटांचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे.

-बाल कर्करोग रुग्णांना भरावे लागते शुल्क

कर्करोगाच्या रुग्णांना किमोथेरपी व रेडिओथेरपीच्या दरम्यान दर आठवड्यात रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात. उपचारापेक्षा तपासण्यांचा खर्च जास्त असतो. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत रक्ताच्या तपासण्या नि:शुल्क केल्या असतानाही रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या काही रुग्णांच्या तक्रारी आहेत.

-‘कॅनकिड्स’संस्थेशी सामंजस्य करार

जागरुकतेचा अभाव, उशिरा निदान, अपुऱ्या उपचारांच्या सोयी, अवाक्याबाहेरचा खर्च व अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. मात्र याचा फायदा किती रुग्णांना झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

-बाल रुग्णांचा कर्करोगावर उपचार करणे हे सरकारचे कर्तव्य

लहान मुलांचा कर्करोग हा ९५ ते ९८ टक्क्यांपर्यंत बरा होणारा आहे. परंतु नागपुरातील शासकीय रुग्णालयात ती सोय नाही. मुंबई, दिल्लीमध्ये बाल रुग्णांसाठी कर्करोगाचे स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे. मात्र अनेक रुग्णांना तिथे जाणे, राहणे व उपचार घेणे अशक्य आहे. विदर्भाच्या रुग्णांसाठी आशेचे किरण असलेल्या मेडिकलमध्येही ही सोय असायलाच हवी. बालकांचा कर्करोग बरा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बाल कर्करोगाच्या मृत्यूमागे उशिरा होत असलेले निदान, मेडिकलमध्ये ऑकोलॉजिस्ट तज्ज्ञाचा अभाव, महागडा औषधोपचार, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव ही कारणे आहेत.

-माजी आ. डॉ. मिलिंद माने, बालरोग तज्ज्ञ

बालवयातील कॅन्सर व त्यांचे प्रमाण

रक्ताचा कॅन्सर-३९.७ टक्के

लिम्फोमा- १२ टक्के

मेंदूचा कॅन्सर - ११.४ टक्के

हाडाचा कॅन्सर- ७.६ टक्के

मांसपेशीचा कॅन्सर- ४.४ टक्के

गुर्दा किडनी- ३.५ टक्के

डोळ्याचा कॅन्सर - २.५ टक्के