शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाल कर्करोग ९५ टक्के बरा होत असताना मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:10 IST

सुमेध वाघमारे नागपूर : लहान मुलांचा कर्करोग हा साधारण ९५ टक्के बरा होणारा आहे. परंतु कर्करोगाच्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत ...

सुमेध वाघमारे

नागपूर : लहान मुलांचा कर्करोग हा साधारण ९५ टक्के बरा होणारा आहे. परंतु कर्करोगाच्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेल्या चिमुकल्यांसाठी मेडिकलमधील सोयी अपुऱ्या पडतात. मेडिकल प्रशासनाने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु तरीही बाल कर्करोगात मृत्यूचे प्रमाण सुमारे ४० ते ५० टक्के आहे.

वयस्क लोकांच्या तुलनेत बालपणात आढळणारे कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या केवळ तीन ते चार टक्के आहे. बालपणातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात १६.२३ टक्के एवढे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विकिरणोपचार व कर्करोगशास्त्र विभागात बाल कर्करोग रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात विविध कॅन्सरच्या ३५० चिमुकल्यांची नोंद झाली होती. यातील जवळपास ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड नाही

बाल कर्करोगाच्या रुग्णांसाठी मेडिकलमध्ये स्वतंत्र वॉर्ड नाही. या रुग्णांना बालरोग विभागाच्या वॉर्डात ठेवले जाते. यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता अधिक असते. दरम्यानच्या काळात या रोगाच्या विशेष उपचारासाठी बालरोग विभागात १० खाटांचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे.

-बाल कर्करोग रुग्णांना भरावे लागते शुल्क

कर्करोगाच्या रुग्णांना किमोथेरपी व रेडिओथेरपीच्या दरम्यान दर आठवड्यात रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात. उपचारापेक्षा तपासण्यांचा खर्च जास्त असतो. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत रक्ताच्या तपासण्या नि:शुल्क केल्या असतानाही रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याच्या काही रुग्णांच्या तक्रारी आहेत.

-‘कॅनकिड्स’संस्थेशी सामंजस्य करार

जागरुकतेचा अभाव, उशिरा निदान, अपुऱ्या उपचारांच्या सोयी, अवाक्याबाहेरचा खर्च व अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. मात्र याचा फायदा किती रुग्णांना झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

-बाल रुग्णांचा कर्करोगावर उपचार करणे हे सरकारचे कर्तव्य

लहान मुलांचा कर्करोग हा ९५ ते ९८ टक्क्यांपर्यंत बरा होणारा आहे. परंतु नागपुरातील शासकीय रुग्णालयात ती सोय नाही. मुंबई, दिल्लीमध्ये बाल रुग्णांसाठी कर्करोगाचे स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे. मात्र अनेक रुग्णांना तिथे जाणे, राहणे व उपचार घेणे अशक्य आहे. विदर्भाच्या रुग्णांसाठी आशेचे किरण असलेल्या मेडिकलमध्येही ही सोय असायलाच हवी. बालकांचा कर्करोग बरा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बाल कर्करोगाच्या मृत्यूमागे उशिरा होत असलेले निदान, मेडिकलमध्ये ऑकोलॉजिस्ट तज्ज्ञाचा अभाव, महागडा औषधोपचार, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव ही कारणे आहेत.

-माजी आ. डॉ. मिलिंद माने, बालरोग तज्ज्ञ

बालवयातील कॅन्सर व त्यांचे प्रमाण

रक्ताचा कॅन्सर-३९.७ टक्के

लिम्फोमा- १२ टक्के

मेंदूचा कॅन्सर - ११.४ टक्के

हाडाचा कॅन्सर- ७.६ टक्के

मांसपेशीचा कॅन्सर- ४.४ टक्के

गुर्दा किडनी- ३.५ टक्के

डोळ्याचा कॅन्सर - २.५ टक्के