शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अपुऱ्या पोषक घटकांमुळे बालकांमध्ये संसर्गाचा धोका अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

नागपूर : बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यात भारतात मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. मात्र, मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जीवनसत्वे ...

नागपूर : बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यात भारतात मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. मात्र, मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जीवनसत्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. दरवर्षी जन्माला येणाऱ्या जवळपास २६ दशलक्ष बालकांपैकी सुमारे ७ लाखांपेक्षा अधिक मुले नवजात अवस्थेतूनही पुढे जात नाहीत. त्यातील १२.७ लाख चिमुकल्यांचा अपुऱ्या पोषक घटकांमुळे मृत्यू होत असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. कोरोनाचा संभावित तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता बालकांच्या पोषणघटकांकडे लक्ष देण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञानी दिला आहे.

बालकांच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस त्यांच्या नंतरच्या आयुष्यासाठीचा पाया रचतात. त्याच्या आरोग्याची रचना करतात, त्याला आकार देतात. या कालावधीत पोषक घटकांनी युक्त आहाराचे सेवन अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण यामुळेच शारीरिक वाढ, शिकण्याची क्षमता यांच्याबाबत मुलांची क्षमता वाढते. शिवाय, एक मूल म्हणून आणि प्रौढ म्हणूनही ते आजाराला बळी पडणार नाहीत, याची खातरजमा होते. मात्र, या पोषण घटकांच्या कमतरतेमुळे दरवर्षी हजारो मुले पाचव्या वाढदिवसापूर्वीच जीवनसत्व आणि खनिजांच्या अभावाला बळी पडतात. बालकांमधील मृत्यू आणि अपंगत्व यामागील हे एक मुख्य कारण ठरत आहे. या बालकांमध्ये मृत्यूची प्रमुख कारण कुपोषण हेच असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

-सहा महिन्यानंतर कुपोषणाचा धोका अधिक

बालरोग तज्ज्ञाच्या मते, बालकाच्या वयाच्या सहा महिन्यांनंतर कुपोषणाचा मोठा धोका असतो. या टप्प्यात स्तनपानासोबत पूरक आहार, उदा. जीवनसत्वे आणि खनिज समृद्ध आहार, संतुलित धान्ये, आहार, लोह, बहुजीवनसत्व, ड्रॉप्स पूरक आहार दिल्यास मुलाच्या वाढीव पोषक मागण्या भागवल्या जातात. सहा महिन्यानंतर बाळाला केवळ स्तनपान न देता बाहेरचे अन्नपदार्थ देण्यास सुरुवात होते. याच टप्प्यात पोषक घटक देण्यातील तफावत सर्वाधिक जाणवते. या टप्प्यावर मुलांच्या गरजा वाढलेल्या असतात आणि स्तनपान कमी होते.

-शारीरिक व मेंदूचा वाढीसाठी आहाराची भूमिका महत्त्वाची

बालकांची योग्य वाढ आणि विकासासाठी आहारात पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. बाळाच्या पहिल्या वर्षात शरीराची आणि मेंदूची वाढ होते. यामुळे पहिले सहा महिने आईचे दूध दिल्यानंतर पूरक आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

-डॉ. विजय धोके, अध्यक्ष अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स असोसिएशन