शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

अपुऱ्या पोषक घटकांमुळे बालकांमध्ये संसर्गाचा धोका अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

नागपूर : बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यात भारतात मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. मात्र, मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जीवनसत्वे ...

नागपूर : बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यात भारतात मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. मात्र, मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जीवनसत्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. दरवर्षी जन्माला येणाऱ्या जवळपास २६ दशलक्ष बालकांपैकी सुमारे ७ लाखांपेक्षा अधिक मुले नवजात अवस्थेतूनही पुढे जात नाहीत. त्यातील १२.७ लाख चिमुकल्यांचा अपुऱ्या पोषक घटकांमुळे मृत्यू होत असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. कोरोनाचा संभावित तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता बालकांच्या पोषणघटकांकडे लक्ष देण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञानी दिला आहे.

बालकांच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस त्यांच्या नंतरच्या आयुष्यासाठीचा पाया रचतात. त्याच्या आरोग्याची रचना करतात, त्याला आकार देतात. या कालावधीत पोषक घटकांनी युक्त आहाराचे सेवन अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण यामुळेच शारीरिक वाढ, शिकण्याची क्षमता यांच्याबाबत मुलांची क्षमता वाढते. शिवाय, एक मूल म्हणून आणि प्रौढ म्हणूनही ते आजाराला बळी पडणार नाहीत, याची खातरजमा होते. मात्र, या पोषण घटकांच्या कमतरतेमुळे दरवर्षी हजारो मुले पाचव्या वाढदिवसापूर्वीच जीवनसत्व आणि खनिजांच्या अभावाला बळी पडतात. बालकांमधील मृत्यू आणि अपंगत्व यामागील हे एक मुख्य कारण ठरत आहे. या बालकांमध्ये मृत्यूची प्रमुख कारण कुपोषण हेच असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

-सहा महिन्यानंतर कुपोषणाचा धोका अधिक

बालरोग तज्ज्ञाच्या मते, बालकाच्या वयाच्या सहा महिन्यांनंतर कुपोषणाचा मोठा धोका असतो. या टप्प्यात स्तनपानासोबत पूरक आहार, उदा. जीवनसत्वे आणि खनिज समृद्ध आहार, संतुलित धान्ये, आहार, लोह, बहुजीवनसत्व, ड्रॉप्स पूरक आहार दिल्यास मुलाच्या वाढीव पोषक मागण्या भागवल्या जातात. सहा महिन्यानंतर बाळाला केवळ स्तनपान न देता बाहेरचे अन्नपदार्थ देण्यास सुरुवात होते. याच टप्प्यात पोषक घटक देण्यातील तफावत सर्वाधिक जाणवते. या टप्प्यावर मुलांच्या गरजा वाढलेल्या असतात आणि स्तनपान कमी होते.

-शारीरिक व मेंदूचा वाढीसाठी आहाराची भूमिका महत्त्वाची

बालकांची योग्य वाढ आणि विकासासाठी आहारात पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. बाळाच्या पहिल्या वर्षात शरीराची आणि मेंदूची वाढ होते. यामुळे पहिले सहा महिने आईचे दूध दिल्यानंतर पूरक आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

-डॉ. विजय धोके, अध्यक्ष अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स असोसिएशन