शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाने दिले बळ

By admin | Updated: June 12, 2016 02:43 IST

एखाद्यावर ओढवलेले अपंगत्व म्हणजे त्याचा केवळ एक अवयव निकामी होत नाही तर अपंगत्व म्हणजे त्या व्यक्तीची ...

उद्धारने ३००० अपंगांना दिला आधार : शिबिराचा लाभ घ्यावा नागपूर : एखाद्यावर ओढवलेले अपंगत्व म्हणजे त्याचा केवळ एक अवयव निकामी होत नाही तर अपंगत्व म्हणजे त्या व्यक्तीची जगण्याची उमेद आणि जीवनातील उत्साहच हरविण्याचा क्षण ठरतो. अशा मनातून खचलेल्या दिव्यांगांना गरज आहे ती समाजाने मानसिक आधार देण्याची. नागपूरच्या ‘उद्धार’ या सेवाभावी संस्थेने दिव्यांगांना भक्कम मानसिक आधार देण्याचा वसा उचलला आहे. गेल्या २७ वर्षात संस्थेने तीन हजार पेक्षा जास्त दिव्यांगांना कृत्रिम पायाचा आधार देत सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगण्याचे बळ दिले आहे.उद्धारचे संस्थापक कुंजबिहारी अग्रवाल यांनी १९८९ मध्ये त्यांच्या वडिलांचे सेवाकार्य पुढे चालविण्यासाठी या संस्थेची स्थापना केली. सभोवताल दिसणाऱ्या अपंगांचे दु:ख समजून त्यांना कृ त्रिम अवयवांचे बळ देण्याचे ध्येयच त्यांनी मनाशी बाळगले आहे. गेल्या २७ वर्षापासून त्यांचे हे सेवाकार्य अहोरात्र सुरू आहे. त्यांची पत्नी व संस्थेच्या अध्यक्ष कुमकुम अग्रवाल यांची त्यांना साथ मिळाले. या कार्यात कृत्रिम पाय तयार करणाऱ्या कोटा, राजस्थानच्या श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या तांत्रिक टीमचे मोठे सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे या टीमचे बहुतेक सदस्य अपंगच आहेत. दोन्ही हाताने अपंग असलेले देवकीनंदन पायाने पेपर लिहिण्याचे काम करतात तर कृत्रिम पाय जोडलेले देवकिशन अतिशय उत्साहाने दिव्यांगांच्या पायाचा साचा तयार करण्याचे काम करतात. या टीमचे कार्यवाहक प्रवीण भंडारी यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून या सेवाकार्यात स्वत:ला वाहून घेतले.ज्या ठिकाणी उद्धारचे शिबिर होते त्या ठिकाणी महावीर विकलांग सहायता समितीची टीम सहभागी होते. येथे येणाऱ्या अपंगांच्या पायाचे माप घेऊन त्याप्रमाणे साचा तयार केला जातो. त्यानंतर साच्याच्या मदतीने प्लास्टिकचा पाय तयार करुन संबंधित अपंगाच्या निकामी पायाला जोडला जातो. पूर्वी पाय तयार करण्याचे काम राजस्थानमध्ये करण्यात येई, मात्र आता नागपुरातच हे काम केले जाते. आठ दिवसात प्रत्यारोपण केल्यानंतर हा माणूस सामान्य माणसासारखा चालू, फिरु किंवा सायकलही चालवू शकतो. पोलिओग्रस्तांना कॅलीपरचा आधार महत्त्वाचा ठरतो. कुंजबिहारी अग्रवाल यांनी सांगितले की, संस्थेने भारतभर शिबिरे घेतली आहेत. येथे येणारे लोक डोळ््यात अश्रू घेवून आणि रांगत येतात. मात्र प्रत्यारोपणानंतर ते उभे राहून हसत घरी जातात.(प्रतिनिधी)आमदार निवास येथे उद्धारचे शिबिरउद्धार संस्थेतर्फे शनिवारपासून आमदार निवास, सिव्हिल लाईन्स येथे कृत्रिम पाय जोडण्याचे शिबिर लावण्यात आले आहेत. हे शिबिर रविवारपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवशी शंभरच्या जवळपास लोकांनी शिबिराला भेट दिली. ही सेवा संपूर्ण नि:शुल्क असल्याने अपंगांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रवाल यांनी केले.आणि तो सायकल चालवित आलासंस्थेच्या कार्याच्या आठवणी सांगताना कुमकुम अग्रवाल यांनी सांगितले की, साकोली जि. भंडारा येथील एक व्यक्ती अशाच एका शिबिरात आमच्याकडे आला होता. एका अपघातात त्याला पाय गमवावा लागला होता. शिबिरात त्याला कृत्रिम पाय लावण्यात आला होता. त्यानंतर वर्षभरानंतर झालेल्या शिबिरादरम्यान त्याने साकोलीवरून १०० किलोमीटर सायकल चालवित येऊन हात जोडल्याचे त्यांनी सांगितले. अशा अनेक भावनिक आठवणी असल्याचे त्या म्हणाल्या.