शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तीन अट्टल घरफोड्यांना कारावास

By admin | Updated: March 19, 2017 02:59 IST

घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणात शनिवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आय. लोकवानी यांच्या न्यायालयाने

न्यायालय : मानकापूर भागातील तीन वेगवेगळ््या खटल्यांचा निकाल नागपूर : घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणात शनिवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आय. लोकवानी यांच्या न्यायालयाने तीन अट्टल घरफोड्यांना एक वर्ष सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये दंड सुनावला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे हे तिन्ही खटले वेगवेगळे चालून वेगवेगळ्या तीन आदेशान्वये आरोपींना ही शिक्षा सुनावण्यात आली. बबलू अंबादास दांडेकर (१९), व्यंकटी ऊर्फ बंटी मारोती दांडेकर आणि सूरज जयराम जाधव (१९), अशी आरोपींची नावे असून ते कोराडी मार्गावरील वॉक्स कूलरमागील श्रीकृष्णधाम झोपडपट्टी येथील रहिवासी आहेत. पहिली घटना २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान गायत्रीनगर सचिन सोसायटी येथील कोमल राजेश दुबे यांच्याकडे घडली होती.चोरट्यांनी संधी साधून मुख्य दाराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, २५०० रुपये रोख, असा एकूण १ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. तपासा दरम्यान शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक के. डी. भगत यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने तिन्ही आरोपींना भादंविच्या ४५४ कलमांतर्गत एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, कलम ४५७ अंतर्गत एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि कलम ३८०, ३४ अंतर्गत एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. घरफोडीची दुसरी घटना ८ आॅक्टोबर २०१५ रोजी व्यंकटेश एन्क्लेव्ह येथे यश अश्विनकुमार नायडू यांच्याकडे घडली होती. यश नायडू हे इंडस इंड बँकेत व्यवस्थापक आहेत. चोरट्यांनी मुख्य दाराचा कुलूप कोंडा तोडून २५ हजार ७०० रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही चोरट्यांना अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक एल. के. हांडे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ४५४ अंतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि भादंविच्या ३८०, ३४ कलमांतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. घरफोडीची तिसरी घटना १५ जानेवारी २०१६ रोजी गोधनी रोडवरील एमबी टाऊन येथील अर्पण तुषारकांत कटकवार यांच्याकडे घडली होती.चोरट्यांनी मुख्य दाराचा कुलूप कोंडा तोडून रोख २४ हजार, सोने चांदीचे दागिने असा एकूण ७० हजाराचा ऐवज लंपास केला होता. गुन्हे शाखा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून ६१ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. हेड कॉन्स्टेबल बट्टूलाल पांडे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन आरोपींना भादंविच्या कलम ४५४ अंतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि भादंविच्या ३८०, ३४ कलमांतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील रत्ना घाटे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल रवींद्र वैद्य, नायक कॉन्स्टेबल जीवनलाल गुप्ता यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)