शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

तूर, मूग, उडदची आयात खुली; तूरडाळीचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:07 IST

नागपूर : केंद्र सरकारने १५ मे रोजी अधिसूचना काढून तूर, मूग आणि उडद यांच्या आयातीवर असलेले प्रतिबंध शिथिल केले. ...

नागपूर : केंद्र सरकारने १५ मे रोजी अधिसूचना काढून तूर, मूग आणि उडद यांच्या आयातीवर असलेले प्रतिबंध शिथिल केले. त्यामुळे तीन दिवसांतच तूरडाळीचे दर प्रति क्विंटल ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय तूर, मूग आणि उडदच्या दरात प्रत्येकी प्रतिक्विंटल २०० रुपयांची घसरण झाली आहे.

देश डाळींमध्ये आत्मनिर्भर बनावा आणि शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदच्या आयातीवर प्रतिबंध लावले होते. या वस्तूंच्या आयातीसाठी सरकार व्यापाऱ्यांना परवाना द्यायचा आणि वर्षभराचे आयातीचे प्रमाण ठरवून दिले जायचे; पण आता आयातीवरील प्रतिबंध हटविल्याने व्यापाऱ्यांना या वस्तूंची आयात कितीही प्रमाणात करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना या वस्तूंची आधारभूत किंमत मिळणार नाही. त्याचा शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाने बाजारपेठांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. या निर्णयाचा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे. अचानक भाव कमी होऊ लागले आहेत.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी १७ मे रोजी बैठक बोलावून देशात डाळींच्या उपलब्धतेची चर्चा केली. व्यापाऱ्यांना स्टॉकची माहिती द्यावी लागेल, असे त्यांनी बैठकीत सांगितले. सरकारतर्फे अधिसूचना जारी होताच तीन दिवसांतच बाजारात खरेदी कमी आणि विक्री जास्त झाल्याचे होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी तुरीत २०० आणि तूरडाळीच्या किमतीत ३०० रुपयांची घसरण झाली. मुंबई आयातीत लेमन तूर प्रतिक्विंटल ६,५०० ते ६,३००, नागपुरात गावरान तुरीचे दर ७,१५० रुपयांवरून कमी होऊन ६,९५० आणि डाळीचे भाव ८,७०० ते १० हजार १०० रुपये होते. याशिवाय आयातीत उडद मुंबई पोर्टवर २०० रुपयांनी कमी होऊन ६,८००, उडद मोगर ८,४०० ते १० हजार ७०० रुपये आणि चण्यात २०० रुपयांची घसरण झाली. चणाडाळीचे भाव ६,१०० ते ६,७०० रुपयांवर स्थिरावले. मसूरमध्ये ३०० रुपयांची घसरण होऊन डाळीचे भाव ६,६०० ते ६,८०० रुपयांपर्यंत कमी झाले. तर मूग मोगर ८,५०० ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले. केंद्राच्या निर्णयाचा परिणाम पुढेही घसरणीवर होणार आहे. कोरोना लॉकडाऊन काळात सरकारचा निर्णय चुकीचा असून, त्यामुळे व्यवसायात घसरण होऊन व्यापाऱ्यांना आर्थिक फटका होणार असल्याचे मोटवानी यांनी स्पष्ट केले.