शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची प्रतिमा स्वच्छ असायला हवी : गृहमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST

गडचिरोलीच्या भेटीनंतर नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाने निर्माण ...

गडचिरोलीच्या भेटीनंतर नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाने निर्माण झालेले वातावरण आणि अशात आपल्याकडे आलेली गृहमंत्रीपदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान आहे, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना नोंदविले. सोबतच पोलिसांची प्रतिमा स्वच्छ असायला हवी, अशी टिपणीही त्यांनी केली.

गृहमंत्र्यांचा पदभार सांभाळल्यानंतर वळसे पाटील पहिल्यांदाच नागपुरात आले. आज सकाळी गडचिरोलीत घडलेल्या चकमकीचे वृत्त कळताच ते तिकडे गेले. सायंकाळी गडचिरोलीतून परतल्यानंतर, त्यांनी स्थानिक शीर्षस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

यानंतर, पोलीस जिमखान्यात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, सध्या राज्य पोलीस दलात एका वेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. पोलिसांनी आपली प्रतिमा प्रामाणिक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, तरच नागरिक त्यांच्यावर विश्वास करतील. त्यांचा हा कटाक्ष राज्य पोलीस दलातील भ्रष्टाचाराचे आरोप जडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधाने होता. आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्याच्या संबंधाने लागलेले आरोप-प्रत्यारोप आणि घडणाऱ्या घडामोडी या संबंधाने गृहमंत्री वळसे-पाटील फारसे बोलले नाही. मात्र, कोरोनामुळे राज्य एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. अशात आपल्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी येणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले. अभ्यास आणि नियोजन करून आपण पोलीस विभागासाठी काही नवीन उपाययोजना अंमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरात शारीरिक दुखापतीचे गुन्हे जास्त आहेत. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि त्यांचे सहकारी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले. पोलीस भरतीसाठी तीन लाख अर्ज आले. भरती प्रक्रियेच्या संबंधाने लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार हजर होते.

--

गडचिरोली पोलिसांचे कौतुक

२१ मे, २००९ रोजी नक्षल्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. गडचिरोली पोलिसांनी केलेली आजची ही कारवाई बदला नव्हे, तर एक योगायोग आहे. नक्षल्यांना कंठस्थान घालणाऱ्या आजच्या कारवाईबद्दल त्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.

---