शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएमए’ही मैदानात

By admin | Updated: March 23, 2017 01:59 IST

योग्य सुरक्षेच्या मागणीसाठी सामूहिक रजेवर गेलेल्या मेयो, मेडिकलच्या ४४० निवासी डॉक्टरांवरील निलंबनाच्या कारवाईला इंडियन मेडिकल असोसिएशन

३,५०० डॉक्टर संपावर : निवासी डॉक्टरांच्या निलंबनाला विरोध नागपूर : योग्य सुरक्षेच्या मागणीसाठी सामूहिक रजेवर गेलेल्या मेयो, मेडिकलच्या ४४० निवासी डॉक्टरांवरील निलंबनाच्या कारवाईला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेने निषेध व्यक्त करीत, बुधवारी दुपारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यात शहरातील ‘आयएमए’चे ३,५०० डॉक्टर सहभागी झाले असून, केवळ आकस्मिक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु दोन दिवसात ही कारवाई मागे न घेतल्यास आपत्कालीन सेवाही बंद करण्यात येईल, अशी माहिती बुधवारी ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य डॉ. अनिल लद्धड, आयएमएच्या सचिव डॉ. अर्चना कोठारी, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वाय. एस. देशपांडे आदी उपस्थित होते. डॉ. लद्धड म्हणाले, शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून शासनाने नेमणूक केली आहे. २४ तास ते रुग्णांच्या सेवेत असतात. यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे. यातच जर योग्य सुरक्षेच्याअभावी त्यांना मारहाण होत असेल तर याला संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय शिक्षण विभाग व सरकार जबाबदार आहे. डॉ. अशोक अढाव म्हणाले, आज दुपारपासून ‘आयएमए’चे सर्व सदस्य डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. शहरातील ६५० क्लिनिक व ३०० वर रुग्णालयांचे ‘बाह्यरुग्ण विभाग’ (ओपीडी) अनिश्चित काळासाठी बंद राहील. केवळ आकस्मिक विभाग सुरू राहील. डॉ. वाय. एस. देशपांडे म्हणाले, निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जाण्यापूर्वी तशी सूचना अधिष्ठात्यांना दिली होती. निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्यानंतर १२ तासांत योग्य सुरक्षा व्यवस्थेत बदलही करणे शक्य होते. परंतु तसे न करता थेट निलंबनाची कारवाई करणे, हे योग्य नाही. सुरक्षेला घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टर मागणी करीत आहे, परंतु सरकार गंभीर नाही. डॉ. प्रशांत निखाडे म्हणाले, दहशतवादी कसाबला फाशी देण्यापूर्वी त्याच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु रुग्णाचा जीव वाचविणाऱ्या डॉक्टरांनी योग्य सुरक्षा मागितली तर त्यांना निलंबनाची शिक्षा ठोठावण्यात आली, हे योग्य नाही. डॉ. मिलिंद नाईक म्हणाले, २०१० पासून ते आतापर्यंत नागपुरातील डॉक्टरांना मारहाण झालेल्या २६ प्रकरणांमधून केवळ एकाच प्रकरणाचा निकाल लागला. यामुळे कायदा हातात घेणाऱ्यांवर वचक राहिला नाही. यामुळे पुन्हा पुन्हा अशा घटना घडतात. (प्रतिनिधी)