शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

मी चाललोय, पण मंथली रिपोर्ट पाठवा !

By admin | Updated: May 1, 2015 02:22 IST

अमरावती जिल्ह्यातील ‘किसान यात्रा’ आटोपून नागपुरात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सायंकाळी तब्बल एक तास काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला.

कमलेश वानखेडे नागपूरअमरावती जिल्ह्यातील ‘किसान यात्रा’ आटोपून नागपुरात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सायंकाळी तब्बल एक तास काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. पदयात्रेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत विषय पोहचविला. मात्र, मी गेल्यावर त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कुणी जाणार आहे का, असा सवाल राहुल यांनी काँग्रेस नेत्यांना केला. आता स्थानिक नेत्यांवर ही जबाबदारी द्या. मी भेटी दिलेल्या भागात पुढे तुम्ही काय केले याचा दर १५ दिवसांनी किंवा महिनाभराने लेखी रिपोर्ट पाठवा, अशा कडक सूचनाही त्यांनी नेत्यांना दिला. राहुल गांधी पदयात्रा आटोपून नागपूर विमानतळावर सायंकाळी ६.३० वाजता पोहचले. यानंतर व्हीआयपी लाऊंजमध्ये रात्री ७.४५ पर्यंत त्यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतली. सुरुवातीला सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर आपले रोखठोक मत मांडले. या वेळी अ.भा. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. अविनाश पांडे, आ. सुनील केदार, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम, माजी मंत्री अनिस अहमद, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, काँग्रेस नेते नाना गावंडे, अनंतराव घारड, डॉ.बबनराव तायवाडे, के.के. पांडे, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री आदी उपस्थित होते.