शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

पाच वर्षांत साडेपाच लाखावर वृक्षांची अवैध तोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 12:06 IST

मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.

ठळक मुद्दे३४ कोटी ५६ लाखांचे नुकसान२ लाख ३४ हजार सागवान वृक्षांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृक्ष लागवड ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. वृक्ष लागवडीच्या अभियानाचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. जंगल क्षेत्र वाढत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु दुसरीकडे जंगलात अवैध वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागविली. त्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाने दिलेली माहिती धक्कादायक आहे. २०१३ ते मार्च २०१८ यादरम्यान एकूण ५ लाख ६१ हजार ४१० वृक्ष अवैधपणे तोडण्याची आली आहे. यापैकी एकट्या सागवनाची झाडे २ लाख ३४ हजार २१६ इतकी आहेत. वर्षनिहाय विचार केल्यास २०१३ मध्ये एकूण १ लाख ३९ हजार ५६ झाडांची अवैध कटाई झाली. यात सागवान झाडांची संख्या ५४ हजार ४२९ इतकी होती. २०१४ मध्ये एकूण १ लाख २० हजार ५५१ झाडे तोडली गेली. यात ४७ हजार ९३५ सागवानांची झाडे होती. २०१५ मध्ये १ लाख ३ हजार ४१४ झाडे यात ४२ हजार ८०६ सागवानांची झाडे, २०१६ मध्ये ९६ हजार ६२६ झाडे यात ४२ हजार ७२६ सागवान झाडे तर २०१७ मध्ये ८० हजार ६७९ झाडे तोडण्यात आली. यात ३९ हजार ९७९ सागवानाच्या झाडांचा समावेश आहे. या पाच वर्षांत एकूण ३४ कोटी ५६ लाख ८५ हजार रुपये किमतीची ही झाडे आहेत.यामध्ये एकट्या सागवान झाडांची किंमत २५ कोटी ९५ लाख इतकी आहे.

तीन महिन्यात २०,५५४ झाडे तोडली२०१८ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत तब्बल २०,५५४ झाडे तोडण्यात आली. यामध्ये १०,३४१ झाडे ही सागवानाची आहेत. म्हणजे तीन महिन्यातच दीड कोटी रुपये किमतीची झाडे तोडली गेली. यात एकट्या सागवान झाडांची किंमतच सव्वा कोटीच्या जवळपास आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग