शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

पाच वर्षांत साडेपाच लाखावर वृक्षांची अवैध तोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 12:06 IST

मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.

ठळक मुद्दे३४ कोटी ५६ लाखांचे नुकसान२ लाख ३४ हजार सागवान वृक्षांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृक्ष लागवड ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. वृक्ष लागवडीच्या अभियानाचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. जंगल क्षेत्र वाढत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु दुसरीकडे जंगलात अवैध वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागविली. त्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाने दिलेली माहिती धक्कादायक आहे. २०१३ ते मार्च २०१८ यादरम्यान एकूण ५ लाख ६१ हजार ४१० वृक्ष अवैधपणे तोडण्याची आली आहे. यापैकी एकट्या सागवनाची झाडे २ लाख ३४ हजार २१६ इतकी आहेत. वर्षनिहाय विचार केल्यास २०१३ मध्ये एकूण १ लाख ३९ हजार ५६ झाडांची अवैध कटाई झाली. यात सागवान झाडांची संख्या ५४ हजार ४२९ इतकी होती. २०१४ मध्ये एकूण १ लाख २० हजार ५५१ झाडे तोडली गेली. यात ४७ हजार ९३५ सागवानांची झाडे होती. २०१५ मध्ये १ लाख ३ हजार ४१४ झाडे यात ४२ हजार ८०६ सागवानांची झाडे, २०१६ मध्ये ९६ हजार ६२६ झाडे यात ४२ हजार ७२६ सागवान झाडे तर २०१७ मध्ये ८० हजार ६७९ झाडे तोडण्यात आली. यात ३९ हजार ९७९ सागवानाच्या झाडांचा समावेश आहे. या पाच वर्षांत एकूण ३४ कोटी ५६ लाख ८५ हजार रुपये किमतीची ही झाडे आहेत.यामध्ये एकट्या सागवान झाडांची किंमत २५ कोटी ९५ लाख इतकी आहे.

तीन महिन्यात २०,५५४ झाडे तोडली२०१८ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत तब्बल २०,५५४ झाडे तोडण्यात आली. यामध्ये १०,३४१ झाडे ही सागवानाची आहेत. म्हणजे तीन महिन्यातच दीड कोटी रुपये किमतीची झाडे तोडली गेली. यात एकट्या सागवान झाडांची किंमतच सव्वा कोटीच्या जवळपास आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग