शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

‘आयआयएम-नागपूर’; विद्यार्थिनींचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:06 IST

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील तीन वर्षांपासून विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा चित्र बदलले आहे.

ठळक मुद्देप्रथमच ओलांडला २० टक्क्यांचा टप्पा

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील तीन वर्षांपासून विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा चित्र बदलले आहे. २०१८-२० च्या या चौथ्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्थापनेपासून प्रथमच ‘आयआयएम’मध्ये विद्यार्थिनींची संख्या ही २० टक्क्यांच्यावर गेली आहे हे विशेष.केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे घोषणा झाल्यानंतर सर्वात वेगाने ‘आयआयएम-नागपूर’चे वर्ग २०१५ मध्ये प्रत्यक्षात सुरू झाले. देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे संस्थेचे पालकत्व देण्यात आल्याने व देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने विद्यार्थिनींची संख्या जास्त असेल असा अंदाज होता. मात्र पहिल्या वर्षीपासून विद्यार्थिनींची संख्या कमीच दिसून आली. पहिल्या वर्षी संस्थेत ‘पीजीपी’ (पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेन्ट) या अभ्यासक्रमात केवळ तीन विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. एकूण प्रवेशांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ ५.६६ टक्के होती.मागील वर्षी तर एकूण प्रवेश क्षमतेच्या केवळ ३ टक्के व झालेल्या प्रवेशांच्या तुलनेत ३.५० इतकी विद्यार्थिनींची टक्केवारी होती. मागील चार वर्षात विद्यार्थिनींची सर्वाधिक टक्केवारी २०१६ च्या ‘बॅच’मध्ये दिसून आली.एकूण प्रवेशांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या तेव्हा १२.९६ टक्के इतकी होती.यंदा ‘आयआयएम-नागपूर’मध्ये १११ विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रवेश झाले. यातील ७८ टक्के जागांवर विद्यार्थी तर २२ टक्के जागांवर विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या जागांमध्ये १८.४९ टक्के वाढझाली आहे.

आणखी प्रयत्नांची आवश्यकता‘आयआयएम-अहमदाबाद’सह विविध ‘आयआयएम’मध्ये काही वर्षांपूर्वी विद्यार्थिनींची संख्या फारच कमी होती. मात्र ही टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘आयआयएम-नागपूर’मध्ये मागील वर्षीपासून याबाबत पुढाकार घेण्यात आला. मात्र ही संख्या आणखी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे. दरम्यान, ‘आयआयएम-नागपूर’कडून भविष्यात काय पुढाकार घेण्यात येतील, याबाबत ‘आयआयएम-अहमदाबाद’चे ‘कम्युनिकेशन मॅनेजर’ दीपक भट यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र