शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

औरंगाबाद येथेच व्हावे आयआयएम

By admin | Updated: December 17, 2014 00:28 IST

मराठवाड्यावर आजवर सत्ताधाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना गेल्या १५ वर्षात बळावली आहे. यातून जनमानसात रोष वाढत आहे. ही बाब विचारात घेता या भागाला न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने

सर्वपक्षीय आमदारांची मागणी : सभागृहाबाहेर निदर्शनेनागपूर : मराठवाड्यावर आजवर सत्ताधाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना गेल्या १५ वर्षात बळावली आहे. यातून जनमानसात रोष वाढत आहे. ही बाब विचारात घेता या भागाला न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबाद येथच करा, अशी मागणी करीत या भागातील सर्वपक्षीय आमदारांनी मंगळवारी सभागृहाबाहेर नारेबाजी केली.यात डॉ. मधुसूदन केंद्रे, सतीश चव्हाण, धनंजय मुंडे, विजय भांबळे, अर्जुन खोतकर, प्रताप चिखलीकर, संजय शिरसाट, रामराव वडकुते आदींचा समावेश होता.आगामी डीएमआयसी प्रकल्पाच्या दृष्टीने ही संस्था औरंगाबाद येथे असणे हिताचे ठरणार आहे. मराठवाड्यातील जनतेचीही मागणी आहे. या भागातील जनतेच्या भावना विचारात घेता तातडीने याची घोषणा करावी. ही संस्था या भागात स्थापन झाल्यास याचा शैक्षणिकदृष्ट्या फायदा होणार आहे. उच्च शिक्षणासाठी विभागातून बाहेर जाणाऱ्या युवकांची संख्या कमी होईल. भविष्यात येथेच रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होईल. याचा विचार करता सरकारने ही संस्था या भागात देण्याची घोषणा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केल्याची माहिती सदस्यांनी दिली. दरम्यान याच मागणीसाठी १४ डिसेंबरपासून औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयापुढे महाविद्यालयीन विद्यार्थी व विविध ३० संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केल्याची माहिती आमदारांनी पत्रकारांना दिली.(प्रतिनिधी)सर्व सोयींनी उपयुक्त शहरमहाराष्ट्रात नव्याने होऊ घातलेले आयआयएम औरंगाबाद शहरातच उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाचे सदस्य सय्यद इम्तियाज जलील यांनी विधानसभेत मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे केली. महाराष्ट्र शासनाने राज्यात नवीन आयआयएम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. परंतु ते कुठे होईल, याचा कुठेही उल्लेख नाही. औरंगाबाद शहरावर नेहमीच अन्याय होत आला आहे. त्यामुळे आयआयएमसारखी प्रतिष्ठित संस्था औरंगाबाद शहरातच उभारण्यात यावी. यासाठी २०० एकरची आवश्यकता आहे. २०० एकर असलेल्या अशा चार जागा औरंगाबाद शहरात असून त्यांची पाहणीसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर यासाठी सर्व सोयीसुविधांनी उपयुक्त असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.