शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद येथेच व्हावे आयआयएम

By admin | Updated: December 17, 2014 00:28 IST

मराठवाड्यावर आजवर सत्ताधाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना गेल्या १५ वर्षात बळावली आहे. यातून जनमानसात रोष वाढत आहे. ही बाब विचारात घेता या भागाला न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने

सर्वपक्षीय आमदारांची मागणी : सभागृहाबाहेर निदर्शनेनागपूर : मराठवाड्यावर आजवर सत्ताधाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना गेल्या १५ वर्षात बळावली आहे. यातून जनमानसात रोष वाढत आहे. ही बाब विचारात घेता या भागाला न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबाद येथच करा, अशी मागणी करीत या भागातील सर्वपक्षीय आमदारांनी मंगळवारी सभागृहाबाहेर नारेबाजी केली.यात डॉ. मधुसूदन केंद्रे, सतीश चव्हाण, धनंजय मुंडे, विजय भांबळे, अर्जुन खोतकर, प्रताप चिखलीकर, संजय शिरसाट, रामराव वडकुते आदींचा समावेश होता.आगामी डीएमआयसी प्रकल्पाच्या दृष्टीने ही संस्था औरंगाबाद येथे असणे हिताचे ठरणार आहे. मराठवाड्यातील जनतेचीही मागणी आहे. या भागातील जनतेच्या भावना विचारात घेता तातडीने याची घोषणा करावी. ही संस्था या भागात स्थापन झाल्यास याचा शैक्षणिकदृष्ट्या फायदा होणार आहे. उच्च शिक्षणासाठी विभागातून बाहेर जाणाऱ्या युवकांची संख्या कमी होईल. भविष्यात येथेच रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होईल. याचा विचार करता सरकारने ही संस्था या भागात देण्याची घोषणा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केल्याची माहिती सदस्यांनी दिली. दरम्यान याच मागणीसाठी १४ डिसेंबरपासून औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयापुढे महाविद्यालयीन विद्यार्थी व विविध ३० संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केल्याची माहिती आमदारांनी पत्रकारांना दिली.(प्रतिनिधी)सर्व सोयींनी उपयुक्त शहरमहाराष्ट्रात नव्याने होऊ घातलेले आयआयएम औरंगाबाद शहरातच उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाचे सदस्य सय्यद इम्तियाज जलील यांनी विधानसभेत मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे केली. महाराष्ट्र शासनाने राज्यात नवीन आयआयएम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. परंतु ते कुठे होईल, याचा कुठेही उल्लेख नाही. औरंगाबाद शहरावर नेहमीच अन्याय होत आला आहे. त्यामुळे आयआयएमसारखी प्रतिष्ठित संस्था औरंगाबाद शहरातच उभारण्यात यावी. यासाठी २०० एकरची आवश्यकता आहे. २०० एकर असलेल्या अशा चार जागा औरंगाबाद शहरात असून त्यांची पाहणीसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर यासाठी सर्व सोयीसुविधांनी उपयुक्त असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.