शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

बिस्किट कंपनीतील कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात प्रलंबित मागण्यांवरून निर्माण झालेला वाद सुटण्याची चिन्हे दिसत नाही. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात प्रलंबित मागण्यांवरून निर्माण झालेला वाद सुटण्याची चिन्हे दिसत नाही. हा वाद साेडविण्यासाठी अप्पर कामगार आयुक्तांनी यात हस्तक्षेप करणे गरजेचे हाेते. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून त्यांची बैठक लावण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आराेप कामगारांनी केला आहे.

हा वाद नांदा-कोराडी (ता. कामठी) येथील साक्षी बिस्किट कंपनीतील आहे. या कंपनीत अंदाजे ३०० कामगार कार्यरत असून, त्यांच्याकडून काेराेना संक्रमण काळात रोज किमान १२ तास काम करवून घेण्यात आले. या काळात काेराेनाची लागण झाल्याने संघपाल काेलते नामक कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पत्नीला कंपनी व्यवस्थापनाने कंपनीच्या सेवेत सामावून घ्यावे, कंपनी नागपूर महानगरापासून २० किमीच्या परिघात असल्याने या कामगारांना परिमंडळ १ चा पगार लागू करावा आदी प्रमुख मागण्या कामगारांनी रेटून धरल्या.

या कामगारांना न्याय मिळावा म्हणून महादुल्याचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी यात हस्तक्षेप केला. त्यांनी हा वाद अप्पर कामगार आयुक्त यांची बैठक बाेलावून निकाली काढावा, अशी सूचनाही कंपनी व्यवस्थापनाला केली. ही बैठक आयाेजित करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याची माहिती कामगार प्रतिनिधींनी दिली. याबाबत त्यांनी अप्पर कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रारही केली. दुसरीकडे, कामगारांच्या समस्यांवर वेळीच ताेडगा न काढल्यास आंदाेलन करण्याचा इशाराही नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी दिला.

...

कामगार संतप्त

ही समस्या मार्गी लावण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी गुरुवारी (दि. २४) बैठक बाेलावण्यात येणार असल्याची माहिती अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगार प्रतिनिधींना देण्यात आली हाेती. वास्तवात, ही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे कामगारांच्या प्रतिनिधींनी अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली. मात्र, यासंदर्भात असंबद्ध उत्तरे देण्यात आल्याचा आराेप कामगार प्रतिनिधींनी केला आहे. या प्रकारामुळे कामगारांमध्ये संताप व्यक्त हाेत आहे.

...

ही समस्या साेडविण्यासाठी गुरुवारी (दि. २४) बैठक बाेलावण्यात आली हाेती. समन्वयाच्या अभावामुळे ही बैठक हाेऊ शकली नाही. कामगारांना न्याय मिळावा, हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी बुधवारी (दि. ३०) कंपनी व्यवस्थापन व कामगार यांची बैठक बाेलावण्यात आली आहे.

- राजदीप धुर्वे,

अप्पर कामगार आयुक्त, नागपूर.