शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संघ भूमीतच स्वच्छतेकडे दुर्लक्ष !

By admin | Updated: March 2, 2015 02:23 IST

केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबदबा आहे. परंतु संघाची भूमी असलेल्या नागपुरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान उपेक्षित आहे.

लोकमत जागरनागपूर : केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबदबा आहे. परंतु संघाची भूमी असलेल्या नागपुरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान उपेक्षित आहे. कारण येथे लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक शौचालयांची प्रचंड कमतरता आहे. अजूनही शहराच्या सीमेवरील लोकं उघड्यावरच शौचाला जातात. शहरामधील बाजारपेठांमध्ये तर लघुशंकेसाठीही सुविधा नाही. घोषणा व मोठमोठे दावे करण्यात महानगरपालिकेतील भाजपाप्रणीत नागपूर विकास आघाडीची सरकार आघाडीवर आहे. गेल्या दोन ‘टर्म’पासून महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. तरीही गेल्या १० वर्षात अर्धा डझनही शौचालये बांधण्यात आलेली नाहीत. अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली सहा कोटी शौचालये बांधण्याची घोषणा पुन्हा संघभूमीसाठी (नागपूर) दिवास्वप्न बनून राहू नये. महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत ५ वर्षांपूर्वी २७९ शौचालये बांधण्याची घोषणा केली होती. तीन वर्षात चरणबद्ध पद्धतीने ४१ कोटी रुपये खर्चून ही शौचालये बांधण्यात येणार होती. संचालनासाठी कुणी उत्सुक नाही नगरसेवकांच्या सूचनेवर १६ ठिकाणी सुलभ शौचालये बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी काही ठराविक ठिकाणांसाठी निविदा जारी करून बीओटीचा प्रस्तावसुद्धा तयार करण्यात आला होता. परंतु यासाठी कुणीच उत्सुकता दाखविली नाही. गांधी चौक सदरस्थित कस्तुरबा मैदान, नवाबपुरा, ढिवरपुरा येथील जुन्या शौचालयाच्या जागेवर, जयताळा बसस्टॉप, एकात्मतानगर, कस्तुरचंद पार्क, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स समोर, मंगळवारी बाजार येथे मासोळी बाजार आदी ठिकाणी बीओटीचा प्रस्ताव होता. परंतु या प्रस्तावावर कुणीही पुढाकार घेतला नाही. शौचालये संचालित करण्यासाठी कुणीच पुढे आले नाही.