शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

विजय मिळवायचाय, मग आत्मविश्वासानेच खेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST

वन डे मालिका आधीच गमावल्यामुळे भारताची निराशा झाली होती, मात्र अखेरच्या सामन्यातील थरार भारताने १३ धावांनी जिंकला. या विजयाचा ...

वन डे मालिका आधीच गमावल्यामुळे भारताची निराशा झाली होती, मात्र अखेरच्या सामन्यातील थरार भारताने १३ धावांनी जिंकला. या विजयाचा लाभ आज होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात निश्चितपणे होणार आहे. कर्णधार विराटने नाणेफेकीचा कौल बाजूने येताच फलंदाजी घेतली, तरीही आघाडीच्या फळीने सुरुवात चांगली केली नव्हती. विराटचा अपवाद वगळता कुणीही मोठी खेळी करू शकला नाही. शुभमान गिलची फलंदाजी पाहून मी प्रभावित झालो. तो वेगवान प्रगती करणारा खेळाडू आहे. त्याला याचा पुढे लाभ होणार आहे. विराटची संयमी खेळी वगळता श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांचे बाद होणे, नाणेफेक जिंकण्याचा लाभ होण्यास पूरक वाटले नाही. तथापि, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार भागीदारी केली. दोघांच्या खेळीत समजूतदारपणा आणि जबाबदारीची जाणीव दिसून आली. मुरब्बी फलंदाजांसारखे खेळून पडझड थोपवून लावण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली.

हार्दिक या मालिकेत निर्धाराने फलंदाजी करताना दिसतो. मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता येथे दिसली. प्रसंगाचे भान राखून खेळण्याची कला त्याने आत्मसात केली. अखेरपर्यंत मोठे फटके मारण्याच्या भानगडीत न पडतादेखील धावसंख्या उभारणीत योगदान देता येते, हे पांड्याने दाखवून दिले. पांड्याच्या फलंदाजीचे वर्णन दौऱ्यात फलंदाजीत गवसलेला हिरो असेच म्हणावे लागेल.

जडेजाचा खेळ पाहून न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात त्याने ठोकलेल्या अर्धशतकाची आठवण झाली. स्थिरावलेल्या फलंदाजाप्रमाणे फटकेबाजी करताना पाहून त्याच्या खेळीवर विश्वास दाखवता येईल, असे वाटू लागले आहे. जडेजा आणि पांड्या यांच्यामुळेच भारताला ३०० चा आकडा गाठता आला.

यानंतर जसप्रीत बुमराहचे खरे रूप पाहायला मिळाले. दुर्दैवाने पहिल्या स्पेलमध्ये त्याला गडी बाद करता आला नाही. तथापि, त्याच्या चेंडूतील उसळी प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरविणारी होती. जेव्हा बुमराह परतला तेव्हा तो अधिक धोकादायक होता. कसोटी मालिकेत त्याच्याकडून अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. फलंदाजांवर दडपण आणून त्याने बळी घेतले.

टी. नटराजनचे पदार्पणदेखील मी अनुभवले. यूएईत गेली अडीच महिने त्याच्यासोबत घालवल्यामुळे त्याची कामगिरी कशी होईल, याकडे लक्ष होते. शांतचित्ताने सूचना लक्षात घेऊन त्यावर निर्धाराने अमल करणारा हा खेळाडू आहे. शार्दुल ठाकूर हा आणखी एक हिरो. अचूक टप्प्यावर मारा करीत त्याने महत्त्वाच्या क्षणी तीन गडी बाद केले. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर तिसरा पराभव भारतासाठी आत्मविश्वास उंचावणारा ठरला. त्यातही बुमराहला पुन्हा सूर गवसला, हे महत्त्वपूर्ण ठरावे. (गेमप्लान)