शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘नोटा’ वापरले तर तोटा होईल; सरसंघचालकांचे सूचक वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 10:14 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच्या अखेरच्या विजयादशमी उत्सवातून पाथेय देताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत निवडणुकांवर काही भाष्य करतात का याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते.

ठळक मुद्देकेंद्र सरकारला काढले चिमटे

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच्या अखेरच्या विजयादशमी उत्सवातून पाथेय देताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत निवडणुकांवर काही भाष्य करतात का याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. मतदानादरम्यान ‘नोटा’ वापरले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे सद्यस्थितीत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मत द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण देशात पसरलेले स्वयंसेवक मोठ्या संख्येने नागरिक म्हणून कर्तव्य पूर्ण करुन राष्ट्रहिताच्या बाजूने आपली शक्ती उभे करतील हे सूचक वक्तव्य करत त्यांनी स्वयंसेवकांना लोकसभा निवडणुकांसाठी अप्रत्यक्षपणे द्यायचा तो संदेशच दिला.पक्षीय राजकारण, जातिसंप्रदायांच्या प्रभावाचे राजकारण यापासून संघ सुरुवातीपासूनच दूर राहत आला आहे व पुढेदेखील दूरच राहणार. मात्र संघाचे स्वयंसेवक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडत असतात. मतदारांनी राष्ट्रहिताला सर्वतोपरी मानत स्वार्थ, संकुचित भावना, भाषा, प्रांत, जाती यापलिकडे जाऊन विचार केला पाहिजे.उमेदवाराची प्रामाणिकता व क्षमता, पक्षाच्या धोरणाची राष्ट्रहितासोबतची प्रतिब्धता तसेच वर्तमान कार्यांचे अनुभव याआधारावर मतदारांनी मत दिले पाहिजे. मतदान न करणे किंवा ‘नोटा’च्या अधिकाराचा उपयोग करणे हे सर्वात अयोग्य असलेल्या उमेदवाराला फायदा पोहोचविणारे ठरते.त्यामुळेच १०० टक्के मतदान आवश्यक आहे. भारताच्या निवडणूक आयोगाकडून १०० टक्के मतदानाचा आग्रह धरला जातो. या कर्तव्याचे पालन संघाचे स्वयंसेवक नेहमीप्रमाणे यंदादेखील करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारला काढले चिमटेयावेळी सरसंघचालकांनी केंद्र शासनाच्या कामाच्या गतीवरुन चिमटे काढले. स्वातंत्र्यानंतर कुठल्याच सरकारच्या कामाची गती वेगवान राहिली नाही. वर्तमान स्थितीतदेखील हेच चित्र आहे. शासनाच्या चांगल्या धोरणांवर प्रशासनाकडून तत्परता, संवेदनशीलता, पारदर्शकता व संपूर्णता दाखवत पावले उचलली गेली पाहिजे. मात्र असे आवश्यक त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येते. इंग्रज केवळ आपल्या राज्यांवर सत्ता चालविण्याचे काम करायचे. आता स्वतंत्र भारतात आपल्या शासकांनी प्रशासनाला प्रजापालक प्रशासन बनवावे ही अपेक्षा आहे, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकMohan Bhagwatमोहन भागवत