शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वेळ पडल्यास राजीनामाही देणार

By admin | Updated: June 2, 2016 03:16 IST

देशाच्या सभागृहात समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली आहे. त्या संधीचा निश्चितच फायदा होईल.

विकास महात्मे : धनगर आरक्षणाचा लढा सुरूच राहणार नागपूर : देशाच्या सभागृहात समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली आहे. त्या संधीचा निश्चितच फायदा होईल. परंतु राज्यसभेचे पद मिळाले म्हणून मी चूप बसणार नाही. समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उचलत राहणार. धनगर आरक्षणाचा प्रश्न १२ ते १५ महिन्यात मार्गी लागेल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. तेव्हापर्यंत वाट पाहू त्यानंतर पुन्हा आंदोलन करू. हा प्रश्न राज्य सरकारचा नाही, केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. राज्य सरकारने केंद्राला शिफारस केल्यानंतर माझी भूमिका सुरू होईल, त्यामुळे तिथे प्रश्न मांडत राहणार. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर वेळ पडलीच तर राजीनामा सुद्धा देईल, अशी घोषणा डॉ. विकास महात्मे यांनी केली. भाजपातर्फे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते बुधवारी नागपुरात आले. विमानतळ व त्यांच्या घरी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. विकास महात्मे म्हणाले, मला भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे अनेक लोकं वेगळा अर्थ काढू लागले आहेत. काही जण म्हणत आहेत की धनगरांना आरक्षण द्यायचे नसल्यामुळेच महात्मे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु मी याचे खंडन करतो. कारण कुण्या एकट्यामुळे आंदोलन कधीच संपत नाही. एकाचे तोंड बंद केले म्हणून समाजाचा आवाज दाबता येत नाही. खर तर या खासदारकीमुळे आरक्षणाच्या आम्ही अधिक जवळ आलो आहोत. महाराष्ट्रातून केंद्राकडे शिफारसपत्र जाणारच. तेव्हा केंद्रात पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने एक खासदार म्हणून मी पूर्णत: प्रयत्न करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील ६५ वर्षात धनगर समाजाला पहिल्यांदाच संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे, याचा आनंद आहेच. परंतु १ कोटी २० लाख इतकी आमची संख्या असतांना आजवर केव्हाही राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी समाजाला मिळू शकली नाही, ही दु:खाची बाब सुद्धा आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आता केंद्रात पाठपुरावा करता येईल. महाराष्ट्राला पहिला धनगर खासदार दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले. महादेव जानकर यांना शह देण्यासाठी उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जाते, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जानकर हे भाजपचे मित्रपक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मला तसे वाटत नाही. उलट माझा अर्ज भरताना ते सोबत होते. एकाच मुद्यावर आम्ही दोघेही लढा देत आहोत. ते राज्यात पाठपुरावा करतील मी केंद्रात करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. धनगड व धनगर हे एकच आहेत, याबाबत राज्य सरकार केंद्राला पत्र लिहू शकले नाही. कारण पूर्वीच्या राज्य सरकारने ते एक नाहीत, अशी शिफारस केली होती. त्यामुळे केंद्र सरकार यासंबंधात प्रश्न उपस्थित करेल, तसेच न्यायालयातही ही बाब मान्य केली जाणार नाही. त्यामुळे धनगरांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी संपूर्ण संशोधनानुसार केंद्र सरकारला शिफारस केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)स्वतंत्र विदर्भाची भूमिका कायम स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, ही आपली भूमिका कायम आहे. याशिवाय जीवन कौशल्य हे अभ्यासक्रमात शिकविले जात नाहीत. समाज मानसिकरीत्या सबळ करायचा असेल तर जीवनकौशल्यांचा अंतर्भाव शिक्षणात असायला हवा या विषयावर मला काम करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.