शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

वेळ पडल्यास राजीनामाही देणार

By admin | Updated: June 2, 2016 03:16 IST

देशाच्या सभागृहात समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली आहे. त्या संधीचा निश्चितच फायदा होईल.

विकास महात्मे : धनगर आरक्षणाचा लढा सुरूच राहणार नागपूर : देशाच्या सभागृहात समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली आहे. त्या संधीचा निश्चितच फायदा होईल. परंतु राज्यसभेचे पद मिळाले म्हणून मी चूप बसणार नाही. समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उचलत राहणार. धनगर आरक्षणाचा प्रश्न १२ ते १५ महिन्यात मार्गी लागेल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. तेव्हापर्यंत वाट पाहू त्यानंतर पुन्हा आंदोलन करू. हा प्रश्न राज्य सरकारचा नाही, केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. राज्य सरकारने केंद्राला शिफारस केल्यानंतर माझी भूमिका सुरू होईल, त्यामुळे तिथे प्रश्न मांडत राहणार. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर वेळ पडलीच तर राजीनामा सुद्धा देईल, अशी घोषणा डॉ. विकास महात्मे यांनी केली. भाजपातर्फे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते बुधवारी नागपुरात आले. विमानतळ व त्यांच्या घरी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. विकास महात्मे म्हणाले, मला भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे अनेक लोकं वेगळा अर्थ काढू लागले आहेत. काही जण म्हणत आहेत की धनगरांना आरक्षण द्यायचे नसल्यामुळेच महात्मे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु मी याचे खंडन करतो. कारण कुण्या एकट्यामुळे आंदोलन कधीच संपत नाही. एकाचे तोंड बंद केले म्हणून समाजाचा आवाज दाबता येत नाही. खर तर या खासदारकीमुळे आरक्षणाच्या आम्ही अधिक जवळ आलो आहोत. महाराष्ट्रातून केंद्राकडे शिफारसपत्र जाणारच. तेव्हा केंद्रात पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने एक खासदार म्हणून मी पूर्णत: प्रयत्न करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील ६५ वर्षात धनगर समाजाला पहिल्यांदाच संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे, याचा आनंद आहेच. परंतु १ कोटी २० लाख इतकी आमची संख्या असतांना आजवर केव्हाही राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी समाजाला मिळू शकली नाही, ही दु:खाची बाब सुद्धा आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आता केंद्रात पाठपुरावा करता येईल. महाराष्ट्राला पहिला धनगर खासदार दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले. महादेव जानकर यांना शह देण्यासाठी उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जाते, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जानकर हे भाजपचे मित्रपक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मला तसे वाटत नाही. उलट माझा अर्ज भरताना ते सोबत होते. एकाच मुद्यावर आम्ही दोघेही लढा देत आहोत. ते राज्यात पाठपुरावा करतील मी केंद्रात करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. धनगड व धनगर हे एकच आहेत, याबाबत राज्य सरकार केंद्राला पत्र लिहू शकले नाही. कारण पूर्वीच्या राज्य सरकारने ते एक नाहीत, अशी शिफारस केली होती. त्यामुळे केंद्र सरकार यासंबंधात प्रश्न उपस्थित करेल, तसेच न्यायालयातही ही बाब मान्य केली जाणार नाही. त्यामुळे धनगरांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी संपूर्ण संशोधनानुसार केंद्र सरकारला शिफारस केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)स्वतंत्र विदर्भाची भूमिका कायम स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, ही आपली भूमिका कायम आहे. याशिवाय जीवन कौशल्य हे अभ्यासक्रमात शिकविले जात नाहीत. समाज मानसिकरीत्या सबळ करायचा असेल तर जीवनकौशल्यांचा अंतर्भाव शिक्षणात असायला हवा या विषयावर मला काम करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.