शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

वेळ पडल्यास राजीनामाही देणार

By admin | Updated: June 2, 2016 03:16 IST

देशाच्या सभागृहात समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली आहे. त्या संधीचा निश्चितच फायदा होईल.

विकास महात्मे : धनगर आरक्षणाचा लढा सुरूच राहणार नागपूर : देशाच्या सभागृहात समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी मला मिळाली आहे. त्या संधीचा निश्चितच फायदा होईल. परंतु राज्यसभेचे पद मिळाले म्हणून मी चूप बसणार नाही. समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उचलत राहणार. धनगर आरक्षणाचा प्रश्न १२ ते १५ महिन्यात मार्गी लागेल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. तेव्हापर्यंत वाट पाहू त्यानंतर पुन्हा आंदोलन करू. हा प्रश्न राज्य सरकारचा नाही, केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. राज्य सरकारने केंद्राला शिफारस केल्यानंतर माझी भूमिका सुरू होईल, त्यामुळे तिथे प्रश्न मांडत राहणार. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर वेळ पडलीच तर राजीनामा सुद्धा देईल, अशी घोषणा डॉ. विकास महात्मे यांनी केली. भाजपातर्फे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते बुधवारी नागपुरात आले. विमानतळ व त्यांच्या घरी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. विकास महात्मे म्हणाले, मला भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे अनेक लोकं वेगळा अर्थ काढू लागले आहेत. काही जण म्हणत आहेत की धनगरांना आरक्षण द्यायचे नसल्यामुळेच महात्मे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु मी याचे खंडन करतो. कारण कुण्या एकट्यामुळे आंदोलन कधीच संपत नाही. एकाचे तोंड बंद केले म्हणून समाजाचा आवाज दाबता येत नाही. खर तर या खासदारकीमुळे आरक्षणाच्या आम्ही अधिक जवळ आलो आहोत. महाराष्ट्रातून केंद्राकडे शिफारसपत्र जाणारच. तेव्हा केंद्रात पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने एक खासदार म्हणून मी पूर्णत: प्रयत्न करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील ६५ वर्षात धनगर समाजाला पहिल्यांदाच संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे, याचा आनंद आहेच. परंतु १ कोटी २० लाख इतकी आमची संख्या असतांना आजवर केव्हाही राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी समाजाला मिळू शकली नाही, ही दु:खाची बाब सुद्धा आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आता केंद्रात पाठपुरावा करता येईल. महाराष्ट्राला पहिला धनगर खासदार दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले. महादेव जानकर यांना शह देण्यासाठी उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जाते, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जानकर हे भाजपचे मित्रपक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मला तसे वाटत नाही. उलट माझा अर्ज भरताना ते सोबत होते. एकाच मुद्यावर आम्ही दोघेही लढा देत आहोत. ते राज्यात पाठपुरावा करतील मी केंद्रात करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. धनगड व धनगर हे एकच आहेत, याबाबत राज्य सरकार केंद्राला पत्र लिहू शकले नाही. कारण पूर्वीच्या राज्य सरकारने ते एक नाहीत, अशी शिफारस केली होती. त्यामुळे केंद्र सरकार यासंबंधात प्रश्न उपस्थित करेल, तसेच न्यायालयातही ही बाब मान्य केली जाणार नाही. त्यामुळे धनगरांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी संपूर्ण संशोधनानुसार केंद्र सरकारला शिफारस केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)स्वतंत्र विदर्भाची भूमिका कायम स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, ही आपली भूमिका कायम आहे. याशिवाय जीवन कौशल्य हे अभ्यासक्रमात शिकविले जात नाहीत. समाज मानसिकरीत्या सबळ करायचा असेल तर जीवनकौशल्यांचा अंतर्भाव शिक्षणात असायला हवा या विषयावर मला काम करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.