शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तर वेळ पडल्यास राजीनामा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 01:42 IST

धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता राज्य सरकार करीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर धनगर समाजाला झुलवत ठेवले.

ठळक मुद्देपशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर : धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने नागपुरात मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता राज्य सरकार करीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर धनगर समाजाला झुलवत ठेवले. परंतु आता तसे होणार नाही. वेळ पडल्यास समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा देऊ अशी रोखठोक भूमिका राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर रविवारी व्यक्त केली.धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने स्नेहनगर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जानकर बोलत होते.व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संयोजक खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नारायण कुचे, तानाजी मुटकुळे, गणेश हाके, डॉ. राजीव पोतदार, बाबुराव शिंदे यांच्यासह धनगर आरक्षण संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुनिता महात्मे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुभाष लिंगाटे यांनी मानले. या कार्यक्रमास राज्यभरातील धनगर समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.तांत्रिक अडचणींचा विचार : अहिरधनगर समाजाची आरक्षणाची मागणी नवीन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, अशी ग्वाही दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना मंत्रिमंडळात संधी दिली. आरक्षणाची मागणी पूर्ण करताना तांत्रिक अडचणींचा विचार करावा लागेल. आरक्षणासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. आरक्षणासोबतच अन्य मार्गानेही उन्नती शक्य असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले.आरक्षणाचा निर्णय घ्या : महात्मेमेळाव्याचे संयोजक डॉ. विकास महात्मे म्हणाले की, आरक्षणाचे शिफारस पत्र केंद्राकडे पाठविणारे देवेंद्र फडणवीस हे गेल्या ७० वर्षातील पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. महाराष्ट्र शासन या बाबतीत अतिशय योग्य कार्यवाही करत असून धनगर समाजाच्या बाजूने निर्णय घेतला जाईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री हे धनगर आरक्षणासंबंधी सकारात्मक व प्रामाणिक असून टीसचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे ते तातडीने शिफारस करतील. असा विश्वास महात्मे यांनी व्यक्त केला. यासोबतच वसतिगृह, शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्तासाठी स्पर्धा परीक्षा विशेष प्रशिक्षण संस्था, शेफर्ड कमिशनची स्थापना, मेंढपाळचे प्रश्न आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.आता नाही तर कधीच नाही : शिंदेगेल्या ७० वर्षांत धनगर समाजाची फसवणूक झाली. सत्तेसाठी आश्वासन देतात व नंतर विसरून जातात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धनगर समाजामुळे मुख्यमंत्री झाल्याची कबुली दिली. आरक्षणाबाबतही ते गंभीर आहेत. आता अरक्षण मिळाले नाही तर भविष्यात कधीच मिळणार नाही, अशी भूमिका जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मांडली.