शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

लसीकरण न केल्यास मिळणार नाही योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. पॉझिटिव्हचा दर ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे. ...

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. पॉझिटिव्हचा दर ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे. शहराइतकेच मृत्यू आता ग्रामीणमध्ये व्हायला लागले आहे, तरीही ग्रामीण भागात कोरोनाबद्दल बेसावधगिरी दिसून येत आहे. शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी, यासाठी गावोगावी केंद्र उभारले आहे. पण ग्रामस्थांमध्ये चुकीचे संभ्रम पसरविण्यात आल्याने लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे, प्रशासनाने ग्रामीण जनतेला दमच भरला आहे. लसीकरण न केल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट बजावले आहे.

५ एप्रिलपासून ग्रामीण भागात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यासाठी केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. यापूर्वी काही ठराविक ठिकाणी लसीकरण होते. आता उपकेंद्रात लसीकरण सुरू केले आहे. आरोग्य कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत. त्यांच्यासाठी गाड्या बसेसची सुविधा केली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसीलदार, बीडीओपासून संपूर्ण ग्रामीणची यंत्रणा कामाला लागली आहे. १० एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. परंतु लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लसीकरण न केल्यास स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून धान्य मिळणार नाही, ग्रामपंचायत कार्यालयातून कुठल्याही स्वरूपाचे दाखले अथवा काम होणार नाही, महसूल विभागाकडूनदेखील कुठलीच कागदपत्रे मिळणार नाही, असा दमच दिला आहे. घरकुल मंजूर झालेल्यांना, बचत गटातील ४५ वर्षांवरील महिलांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांना लसीकरण करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

प्रतिसादच मिळत नसेल तर काय करणार?

कोरोना वाढतोय, लोक ऐकायला तयार नाही. लसीकरणाबाबत चुकीचे संभ्रम बाळगून आहेत. ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा अशा परिस्थितीत काम करीत आहे. लोकांकडून प्रतिसादच मिळत नसेल तर काय करणार? अशी भावना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.