शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण न केल्यास मिळणार नाही योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. पॉझिटिव्हचा दर ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे. ...

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. पॉझिटिव्हचा दर ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे. शहराइतकेच मृत्यू आता ग्रामीणमध्ये व्हायला लागले आहे, तरीही ग्रामीण भागात कोरोनाबद्दल बेसावधगिरी दिसून येत आहे. शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी, यासाठी गावोगावी केंद्र उभारले आहे. पण ग्रामस्थांमध्ये चुकीचे संभ्रम पसरविण्यात आल्याने लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे, प्रशासनाने ग्रामीण जनतेला दमच भरला आहे. लसीकरण न केल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट बजावले आहे.

५ एप्रिलपासून ग्रामीण भागात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यासाठी केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. यापूर्वी काही ठराविक ठिकाणी लसीकरण होते. आता उपकेंद्रात लसीकरण सुरू केले आहे. आरोग्य कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत. त्यांच्यासाठी गाड्या बसेसची सुविधा केली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसीलदार, बीडीओपासून संपूर्ण ग्रामीणची यंत्रणा कामाला लागली आहे. १० एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. परंतु लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लसीकरण न केल्यास स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून धान्य मिळणार नाही, ग्रामपंचायत कार्यालयातून कुठल्याही स्वरूपाचे दाखले अथवा काम होणार नाही, महसूल विभागाकडूनदेखील कुठलीच कागदपत्रे मिळणार नाही, असा दमच दिला आहे. घरकुल मंजूर झालेल्यांना, बचत गटातील ४५ वर्षांवरील महिलांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांना लसीकरण करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

प्रतिसादच मिळत नसेल तर काय करणार?

कोरोना वाढतोय, लोक ऐकायला तयार नाही. लसीकरणाबाबत चुकीचे संभ्रम बाळगून आहेत. ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा अशा परिस्थितीत काम करीत आहे. लोकांकडून प्रतिसादच मिळत नसेल तर काय करणार? अशी भावना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.