शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

लसीकरण न केल्यास मिळणार नाही योजनांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. पॉझिटिव्हचा दर ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे. ...

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. पॉझिटिव्हचा दर ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे. शहराइतकेच मृत्यू आता ग्रामीणमध्ये व्हायला लागले आहे, तरीही ग्रामीण भागात कोरोनाबद्दल बेसावधगिरी दिसून येत आहे. शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी, यासाठी गावोगावी केंद्र उभारले आहे. पण ग्रामस्थांमध्ये चुकीचे संभ्रम पसरविण्यात आल्याने लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे, प्रशासनाने ग्रामीण जनतेला दमच भरला आहे. लसीकरण न केल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट बजावले आहे.

५ एप्रिलपासून ग्रामीण भागात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यासाठी केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. यापूर्वी काही ठराविक ठिकाणी लसीकरण होते. आता उपकेंद्रात लसीकरण सुरू केले आहे. आरोग्य कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत. त्यांच्यासाठी गाड्या बसेसची सुविधा केली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसीलदार, बीडीओपासून संपूर्ण ग्रामीणची यंत्रणा कामाला लागली आहे. १० एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. परंतु लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लसीकरण न केल्यास स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून धान्य मिळणार नाही, ग्रामपंचायत कार्यालयातून कुठल्याही स्वरूपाचे दाखले अथवा काम होणार नाही, महसूल विभागाकडूनदेखील कुठलीच कागदपत्रे मिळणार नाही, असा दमच दिला आहे. घरकुल मंजूर झालेल्यांना, बचत गटातील ४५ वर्षांवरील महिलांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांना लसीकरण करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

प्रतिसादच मिळत नसेल तर काय करणार?

कोरोना वाढतोय, लोक ऐकायला तयार नाही. लसीकरणाबाबत चुकीचे संभ्रम बाळगून आहेत. ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा अशा परिस्थितीत काम करीत आहे. लोकांकडून प्रतिसादच मिळत नसेल तर काय करणार? अशी भावना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.