शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

ज्येष्ठांना त्रास द्याल तर कोठडीची हवा खाल; तीन महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2023 19:12 IST

Nagpur News माता-पिता व ज्येष्ठ नागरिकाला त्रास देणाऱ्यांना कोठडीत पाठविण्याची तरतूद 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण कायद्यामध्ये आहे.

नागपूर : केंद्र सरकारने भारत (जम्मू व काश्मीर वगळता) व विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी २००७ पासून 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण कायदा' लागू केला आहे. माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करणे आणि त्यांना सन्मानजनक व सुरक्षित आयुष्य जगता यावे, असे वातावरण निर्माण करणे, हे या कायद्याचे उद्देश आहेत. ज्येष्ठ नागरिकाला त्रास देणाऱ्यांना कोठडीत पाठविण्याची तरतूदही कायद्यामध्ये आहे.

ज्येष्ठ नागरिकाचा सांभाळ व संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर आहे, त्या व्यक्तीने संबंधित ज्येष्ठ नागरिकाला पूर्णपणे परित्याग करण्याच्या हेतूने सोडून दिल्यास अशी व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत सश्रम कारावास किंवा पाच हजार रुपयापर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षेसाठी पात्र राहील, असे हा कायदा म्हणतो. ही तरतूद कलम २४ मध्ये करण्यात आली आहे. तसेच या कायद्यांतर्गतचा प्रत्येक गुन्हा दखलपात्र आहे.

निर्वाह भत्ता मागण्याचा अधिकार

स्व:कमाईतून किंवा मालकीच्या मालमत्तेमधून स्वत:चा निर्वाह करण्यास असमर्थ असलेले माता-पिता व ज्येष्ठ नागरिक जबाबदार व्यक्तींकडून निर्वाह भत्ता मिळविण्यासाठी या कायद्यांतर्गत स्थापन सक्षम न्यायाधिकरणात अर्ज दाखल करू शकतात. माता-पित्याला मुलांविरुद्ध, तर मुले नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना नातेवाईकांविरुद्ध हा अर्ज करता येतो. निर्वाह भत्त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय उपचार खर्चाचा समावेश होतो.

नातेवाईकांत यांचा समावेश होतो

अपत्यहीन ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत नातेवाईक म्हणजे कोण, याचे स्पष्टीकरण कायद्यात देण्यात आले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेचा ताबा ज्यांच्याकडे आहे किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता वारसाहक्काने ज्यांना मिळणार आहे, अशी व्यक्ती म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिकाची नातेवाईक होय. असे नातेवाईक अनेक असतील तर त्यांना प्राप्त मालमत्तेच्या समप्रमाणात निर्वाह खर्च द्यावा लागतो.

काय असते न्यायाधिकरण?

या कायद्यांतर्गतची प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्यामध्ये उपविभागीय अधिकारी किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आवश्यक न्यायाधिकरण स्थापन करण्यात आली आहेत. न्यायाधिकरणच्या आदेशाविरुद्ध अपिलीय न्यायाधिकरणकडे दाद मागता येते. जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा त्यावरील दर्जाचे अधिकारी अपिलीय न्यायाधिकरणचे अध्यक्ष असतात.

निर्धनांसाठी वृद्धाश्रमाची सोय

उदरनिर्वाहाची पुरेशी साधने नाहीत, अशा निर्धन ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम स्थापन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकाने स्वत:च्या निर्वाहाकरिता त्याची मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केली असेल आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाच्या निर्वाहास नकार दिला तर मालमत्ता हस्तांतरण रद्द केले जाते.

अधिकारांसाठी लढले पाहिजे

मातापिता व ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:च्या अधिकारांसाठी लढले पाहिजे. त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी तरतुदी या कायद्यात करण्यात आल्या आहेत. करिता, पीडितांनी सक्षम न्यायाधिकरणामध्ये अर्ज दाखल करावा. ते गप्प बसल्यास अन्यायाला पुन्हा चालना मिळेल.

-ॲड. मोहित खजांची, हायकोर्ट.

व्यापक जनजागृती आवश्यक

या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याकरिता या कायद्यासंदर्भात व्यापक जनजागृती केली गेली पाहिजे. सध्या या कायद्याविषयी समाजाला माहितीच नाही. विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून जनजागृती केली जाऊ शकते. तसेच सक्षम न्यायाधिकरणांनीही याकरिता आवश्यक प्रयत्न करावे.

-ॲड. अवधूत पुरोहित, हायकोर्ट.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSenior Citizenज्येष्ठ नागरिक