शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पतीपासून स्वेच्छेने विभक्त झाल्यास ‘पोटगी’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:44 IST

महिलांनो, पतीपासून स्वेच्छेने विभक्त होण्याचा विचार करीत असाल तर, सावधान! कारण, अशा महिला फौजदारी प्रक्रिया संहिता(सीआरपीसी)अंतर्गत पोटगी मिळण्यास अपात्र असल्याचा निर्वाळा....

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांनो, पतीपासून स्वेच्छेने विभक्त होण्याचा विचार करीत असाल तर, सावधान! कारण, अशा महिला फौजदारी प्रक्रिया संहिता(सीआरपीसी)अंतर्गत पोटगी मिळण्यास अपात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे. हा निर्णय लागू झाल्यास महिलेला पोटगीपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे तिच्यावर स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन शोधण्याची वेळ येईल.न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी नुकताच हा निर्णय दिला. पती पालनपोषण करण्यास तयार नसल्यास पत्नीला फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १२५ अंतर्गत पोटगीसाठी दावा करता येतो. परंतु, पत्नी पतीपासून स्वेच्छेने विभक्त झाली असेल, ती चारित्र्यहीन असेल किंवा ती कोणत्याही ठोस कारणाशिवाय पतीसोबत राहण्यास तयार नसेल तर, अशा वेळी पत्नी कलम १२५(४)अनुसार पोटगीसाठी अपात्र ठरते. उच्च न्यायालयाने ही तरतूद लक्षात घेता, एका प्रकरणामध्ये स्वेच्छेने पतीपासून विभक्त झालेल्या पत्नीला पोटगीसाठी अपात्र ठरविले आहे.हे प्रकरण नागपुरातील दाम्पत्याशी संबंधित आहे. १९७५ मध्ये त्यांचे लग्न झाले तर, १९७९ मध्ये त्यांनी स्वेच्छेने विभक्त होण्याचा लेखी करार केला. पत्नीने पोटगी न मागण्याची ग्वाहीही दिली. परंतु, २००४ मध्ये पत्नीने अचानक पोटगीसाठी कायदेशीर नोटीस पाठविली. पतीने तिला दाद दिली नाही. त्यामुळे तिने फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १२५ अंतर्गत पोटगी मिळण्यासाठी जेएमएफसी न्यायालयात अर्ज दाखल केला. तो अर्ज अर्ज खारीज झाला. परिणामी तिने सत्र न्यायालयात अपील दाखल केले. सत्र न्यायालयाने जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय रद्द करून, पत्नीला ७०० रुपये महिना पोटगी मंजुर केली होती. त्या निर्णयाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने कायद्यातील तरतूद लक्षात घेता, सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला व पत्नी पोटगी मिळण्यास अपात्र असल्याचे जाहीर केले.विभक्ततेला झाली ३८ वर्षेप्रकरणातील दाम्पत्याच्या विभक्ततेला ३८ वर्षे झाली आहेत. पतीने दुसरे लग्न केले असून, दुसºया पत्नीपासून त्याला तीन अपत्ये आहेत. पहिल्या पत्नीने स्वत:ची चूक उमगल्यामुळे विभक्ततेनंतर २५ वर्षांनी पोटगीचा दावा केला होता. परंतु, तिला पोटगीची तरतूद लागू झाली नाही.